बोरिवलीत ट्रॅफिक पोलिसावर रिक्षाचालक का संतापला? गुन्हा दाखल

मुंबई : बोरिवली परिसरात वाहतूक नियंत्रणाचं कर्तव्य बजावत असलेल्या ट्रॅफिक पोलिस कर्मचाऱ्यावर एका व्यक्तीने शिवीगाळ करत मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक करून गुन्हा दाखल केला आहे.


तक्रार दाखल करणारे कॉन्स्टेबल शरीफ अब्दुल गनी शेख हे बोरिवली ट्रॅफिक विभागात कार्यरत आहेत. १८ ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारे १२ वाजता, चंदावरकर रोडवरील बीएमसी आर सेंट्रल डिपार्टमेंट कार्यालयाजवळ ते टोइंग ऑपरेशनमध्ये व्यस्त होते. याचवेळी एका ऑटोरिक्षातून आलेल्या व्यक्तीने अचानक रागाने आरडा-ओरडा करायला सुरुवात केली.


वाहतूक कोंडीसाठी ट्रॅफिक पोलिसांना दोष देत त्या व्यक्तीने अश्लील भाषेत शिवीगाळ केली. यानंतर त्याने आपली रिक्षा थोड्या अंतरावर उभी करून शेख यांच्याशी थेट वाद घालण्यास सुरुवात केली. शांततेने परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करत असतानाच, त्या व्यक्तीने कॉन्स्टेबल शेख यांची कॉलर पकडली आणि त्यांना ढकलले. इतक्यावरच न थांबता, त्याने आपला मोबाईल फोन काढून संपूर्ण प्रसंगाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला व तो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली.


जवळच उपस्थित असलेल्या नागरिकांच्या मदतीने कॉन्स्टेबल शेख यांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतले आणि पोलिस ठाण्यात नेले. सुरेश राजा चेट्टीयार (वय ३९) अशी आरोपीची ओळख आहे.


सरकारी कर्तव्य बजावत असलेल्या अधिकाऱ्याला अडवणे आणि त्यांच्यावर हल्ला करणे या आरोपांखाली चेट्टीयार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपीविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane on Nashik Tree Cutting : 'वृक्षतोडीवर आक्षेप, मग बकरी कापताना गप्प का?' पर्यावरणाच्या नावाखाली राजकारण करणाऱ्यांना मंत्री नितेश राणेंचा तिखट सवाल!

मुंबई : नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा २०२७ (Kumbh Mela 2027) च्या भव्य तयारीला सुरुवात झाली असताना, साधूग्राम उभारणीसाठी

हनुमान रोड मेट्रो स्टेशनला डॉ. रमेश प्रभू यांचे नाव देणार

मुंबई : शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे विलेपार्ल्याचे माजी आमदार व

गोरेगावमधील मलनिस्सारण वाहिनीच्या खोदकामामुळे नागरिक हैराण

भाजपच्या माजी नगरसेविकेने अधिकाऱ्यांना घेतले फैलावर मुंबई  : गोरेगाव पूर्व येथील आरे भास्कर मार्गावर मल जल

आज-उद्या-परवा समुद्रकिनाऱ्यावर काळजी घ्या!

४ ते ७ डिसेंबर दरम्यान सलग तीन दिवस मोठी भरती मुंबई : मुंबईमधील समुद्रकिनाऱ्यांवर फेरफटका कारण्यासाठी जाणारे

निकाल लागून ४५ दिवसांनंतरही भरती प्रक्रिया मंदावलेलीच!

वैद्यकीय आरोग्य अधिकारी भरती प्रक्रियेत गोंधळ निकालानंतर ‘अतिरिक्त गुण’ नियम बदलाचा निर्णय वैद्यकीय आरोग्य

‘राजगृह’सह चैत्यभूमीवर नागरी सेवा-सुविधा उपलब्ध

सुमारे ८ हजारांहून अधिक अधिकारी - कर्मचारी तैनात मुंबई  : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९व्या महापरिनिर्वाण