घोडबंदर रोडवर भीषण अपघात; एका महिलेचा जागीच मृत्यू, दुचाकीचालक गंभीर जखमी


ठाणे : घोडबंदर वाहिनीवरील विजय गार्डन स्काय वॉक ब्रिजखाली, रविवार रात्री उशिरा सुमारे ११:३० वाजताच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघात एका महिलेला आपला जीव गमवावा लागला, तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. मुंबई फ्युजन वाइन अँड डाईन पार्टीहून परतणाऱ्या एका दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला.


मिळालेल्या माहितीनुसार, मोटारसायकल क्रमांक MH04/GQ-0353 वर स्वार असलेले दुचाकीचालक मनोज जयमंगल ठाकूर आणि त्यांच्या पाठीमागे बसलेली स्वाती हे दोघे मुंबई फ्युजन वाइन अँड डाईन पार्टीहून परतत होते. विजय गार्डन स्काय वॉक ब्रिजच्या खाली, घोडबंदर वाहिनीवर त्यांच्या दुचाकीला एका भरधाव अज्ञात वाहनाने मागून जोरदार धडक दिली.


या धडकेमुळे दुचाकीवरून खाली पडलेली महिला, स्वाती, गाडीच्या टायरखाली आल्याने तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी तिचा मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी आणि शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवला आहे.


दुचाकी चालक मनोज जयमंगल ठाकूर यांच्या हाताला गंभीर फ्रॅक्चर झाले आहे. अपघातानंतर लगेचच स्थानिक नागरिक आणि तेथून जाणाऱ्या पोलिसांच्या मदतीने त्यांना तातडीने ऑस्कर हॉस्पिटल, वडवली येथे उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे, परंतु त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.


दुचाकीला धडक देणारे वाहन अपघात होताच घटनास्थळावरून पळून गेले, त्यामुळे ते नेमके कोणते वाहन होते, हे समजू शकलेले नाही.


या अपघाताची नोंद घेऊन पोलिसांनी तातडीने पंचनामा केला. अज्ञात वाहनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. या भागात बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे आणि स्थानिक नागरिकांकडून माहिती घेऊन अज्ञात वाहनाचा व त्याच्या चालकाचा कसून शोध सुरू आहे.


Comments
Add Comment

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार