मध्य रेल्वेच्या कर्जत यार्डचे आधुनिकीकरण, प्रवास होणार वेगवान!

कर्जत: मध्य रेल्वेने कर्जत यार्ड आधुनिकीकरणाच्या दिशेने मोठे आणि महत्वाचे पाऊल टाकले आहे. यामुळे केवळ रेल्वे वाहतुकीत सुधारणा होणार नसून प्रत्येक गाडीच्या हालचालीत सुमारे १० मिनिटांची बचतही होणार आहे. हेच या प्रकल्पाचं सर्वात उल्लेखनीय वैशिष्ट्य आहे. तसेच नव्याने तयार करण्यात आलेल्या चौथ्या मार्गिकेमुळे प्रवासी आणि मालगाड्यांची वाहतूक वेगळी झाली आहे.


कर्जत यार्ड आधुनिकीकरणामुळे जुनी आणि कार्यरत इलेक्ट्रिकल सिग्नल प्रणाली पूर्णपणे बदलणार असून डिजिटल प्रणाली सुरु करण्यात येणार आहे. ही प्रणाली कम्प्यूटरवर आधारित असून ती गाड्यांची स्थिती रिअल-टाईममध्ये ट्रॅक करते. सिग्नल बदलते आणि ट्रॅक व्यवस्थापन आपोआप नियंत्रित करते. यामुळे सिग्नल बदलण्यासाठी कोणत्याही माणसाची गरज भासणार नाही. पूर्वी सिग्नल बदलण्यामध्ये जास्त वेळ जायचा.  काहीवेळा अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या चुकांमुळे गाड्या थांबून प्रवाशांचे हाल व्हायचे. मात्र आता नव्या प्रणालीमुळे अचूक संकेत मिळणार आहेत. ज्यामुळे वेळ वाचणार आहे.


या प्रकल्पाचा आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे कर्जत आणि पलसदरीदरम्यान नवी चौथी मार्गिका सुरू करण्यात आली आहे. या नवीन लाईनमुळे प्रवासी आणि मालगाड्यांची वाहतूक पूर्णपणे वेगळी होणार आहे. पूर्वी मालगाड्या आणि प्रवासी गाड्या एकाच मार्गावरून जात असल्याने सिग्नलनुसार थांबावे लागायचे. ज्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावायचा. मात्र आता स्वतंत्र मार्गिकेमुळे मालगाड्यांची हालचाल मुख्य घाट विभागापासून वेगळी ठेवता येणार आहे. त्यामुळे प्रवासी गाड्यांचा प्रवास वेळेवर होईल.




तसेच, कर्जत यार्डमध्ये रिसेप्शन आणि डिस्पॅच लाईन्सचा विस्तार करण्यात आला आहे. पूर्वी गाड्यांना ट्रॅक मोकळा होण्यासाठी वेळ लागत असे. परंतु आता या सुधारणा झाल्यामुळे एकाच वेळी अधिक गाड्या हाताळणे शक्य झाले आहे. परिणामी, कर्जत यार्डची एकूण क्षमता तब्बल २५ टक्क्यांनी वाढली आहे. या सुधारणेमुळे आता पनवेलमधून येणाऱ्या मालगाड्यांचे रिसेप्शन मुख्य लाईन्स ओलांडल्याशिवाय करता येईल ज्यामुळे वाहतुकीचा प्रवाह अखंड राहणार असून गाड्यांना थांबावे लागणार नाही. या प्रकल्पासाठी कोटींमध्ये खर्च करण्यात येणार आहे.
Comments
Add Comment

Maharashtra Government : बागणीतील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लागणार; नियमानुकूलतेसाठी शासनाची परवानगी

मुंबई : सांगली जिल्ह्यातील बागणी गावातील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आता

Malegaon : मालेगावमध्ये दीड लाखाचे एमडी जप्त

मालेगाव : शहरालगतच्या द्याने रमजानपुरा पोलिसांनी अवैध अमली पदार्थाची विक्री आणि तस्करी करणाऱ्यांवर मोठी

Indian Service Sector : भारतात सेवा क्षेत्रातले ५० टक्के कर्मचारी सतत नव्या नोकरीच्या शोधात

नवी दिल्ली : भारतातील व्यावसायिक सेवा क्षेत्रात ५० टक्के कर्मचारी सतत नव्या नोकरीच्या शोधात असतात. जास्त पगार

INDvsSL : भारताविरुद्धच्या कोलंबो कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर श्रीलंका पिछाडीवर

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना कोलंबो

Prabhadevi Water Pipeline : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटली

मुंबई : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाहून गेले. सेनापती बापट मार्गावर ही

Healthy Drinks : चहा महागला म्हणून चिंता सोडा! सकाळी चहाऐवजी प्या 'हे' पेय; शरीर होईल डिटॉक्स अन् वजनही घटेल

साखर आणि चहाचे भाव वाढल्याने खिशावर पडणारा ताण कमी करण्यासाठी आणि आरोग्याला उत