आता पावसाळ्यात मध्य रेल्वेच्या रुळावर पाणी साचणार नाही! भुयारी टाकी बसवण्याचा मुंबई पालिकेचा नवा प्रकल्प

मुंबई: पावसाळ्यात दरवर्षी मुंबईत अनेक सखल भागांमध्ये पाणी भरते. तसेच अती पाऊस पडल्यावर मुंबईतील रेल्वेच्या रुळांवर पाणी साचण्यास सुरुवात होते. त्यामुळे लोकलचा खोळंबा होतो आणि नागरिकांचे प्रचंड हाल होतात. विशेषत: पावसाळ्यात मध्य रेल्वेला मोठा फटका बसतो. या समस्येवर मध्य रेल्वे कायमस्वरूपी तोडगा काढणार आहे. आयआयटी मुंबईच्या शिफारशीनुसार, कुर्ला-एलटीटी परिसरात १० कोटी लिटर क्षमतेची भुयारी टाकी उभारली जाणार आहे. यामुळे रुळांवर साचलेले पाणी भुयारी टाकीमध्ये सोडण्यात येईल.


मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या सूचनेनूसार आयआटी मुंबईकडून रेल्वे रुळांवर पाणी भरण्याची ठिकाणे व त्यावरील उपायांबाबत अभ्यास करून शिफारसी सुचवण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेवरील कुर्ला ते एलटीटी व पश्चिम रेल्वेवरील दादर ते लोअर परळ यादरम्यान विभागांची पाहणी करण्यात आली असून त्यात पूर व्यवस्थापनासाठी प्रभावी व परवडणाऱ्या उपायांसह पाण्याच्या प्रवाहाचे विश्लेषण करण्यात आले. याबाबत सविस्तर सर्वेक्षण अहवाल रेल्वे प्रशासनाकडे सादर करण्यात आला. यानुसार मुंबई महानगरपालिकेने कुर्ला-एलटीटी परिसरात १० कोटी लिटर क्षमतेची भुयारी टाकी बसवण्याची तयारी सुरू केली आहे.




कुर्ला ते एलटीटी हा मध्य रेल्वेवरील असा भाग आहे, जिथे मुसळधार पावसाने गुडघाभर पाणी साचण्यास वेळ लागत नाही. यामुळे रेल्वे वाहतुकीवरही मोठा परिणाम होतो. या समस्येवर मात करण्यासाठीच साचणारे पाणी भुयारी टाक्यांमध्ये जमा केले जाणार आहे. टाकीमध्ये साठलेले पाणी पाऊस ओसरल्यावर पंपांच्या साहाय्याने समुद्रात सोडले जाईल. या प्रकल्पासाठी ५६ कोटींचा खर्च करण्यात येणार आहे.


दरम्यान, सध्या सेंट झेवियर्स ग्राउंड व प्रमोद महाजन कला पार्क इथे पाणी साठवण्यासाठी टाक्या आहेत. परंतु, या टाक्यांची क्षमता कमी असल्याने पूरस्थिती निर्माण झाल्यास त्या पूर्ण भरून जातात व रुळांवर पाणी साचते. यामुळेच अहवालात इतर ठिकाणीही पाणी साठवण टाक्या उभारण्याची शिफारस करण्यात आली असून रेल्वेच्या मालकीच्या नसलेल्या जमिनींवर महानगरपालिकेकडून दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : इंधनाचा काळाबाजार रोखण्यासाठी राज्य सरकार ॲक्शन मोडवर

मुंबई : इराण-अमेरिका युद्धामुळे जागतिक इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, त्याचा परिणाम देशातील पेट्रोलियम

Mrinal Tai Gore Flyover Extension : अंधेरी,जोगेश्वरी, गोरेगावकरांचा वेळ वाचणार, मृणालताई गोरे विस्तारीत उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गोरेगाव पश्चिम येथील राम मंदिर मार्ग ते रिलीफ रोडदरम्यानच्या मृणालताई गोरे

The Fort owners : किल्लेदारांनी बोटीतून केली मिठी नदीची सैर... दाखवला नदीत कचऱ्यासह तीन फुटांपर्यंतचा गाळ

मुंबई : मान्सूनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सध्या नालेसफाईच्या कामाला सुरुवात असून सत्ताधारी पक्षाकडून प्रत्येक

Chandrashekar Bawankule : देवस्थान इनाम निर्मूलन कायद्याच्या प्रारूपाला स्थगिती

सुधारित प्रारूपासाठी खारगे समिती स्थापन; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : महाराष्ट्रातील

Weekly Public Transport Day in BKC : बीकेसीमध्ये दर शुक्रवारी पाळणार ‘साप्ताहिक सार्वजनिक वाहतूक दिन’

- इंधन बचतीसाठी निर्णय; २ लाख कर्मचारी करणार सार्वजनिक प्रवासी वाहनांचा वापर मुंबई : जागतिक इंधन तुटवड्याच्या

Mumbai News : मुंबईत १५ वर्षांपासून बेकायदेशीर वास्तव्य? सात बांगलादेशी नागरिक अटकेत, पोलिसांचा तपास सुरू

मुंबई : मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अवैध स्थलांतराविरोधात मोठी कारवाई करत सात बांगलादेशी (Bangladeshi) नागरिकांना अटक केली