सलग तीन पराभवानंतरही भारताच्या आशा कायम, सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी हा आहे रस्ता

इंदूर: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ मध्ये यजमान भारताला रविवारी इंग्लंडविरुद्धच्या थरारक सामन्यात अवघ्या ४ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. भारताचा हा सलग तिसरा पराभव होता, ज्यामुळे त्यांच्या उपांत्य फेरीतील प्रवेशाची समीकरणे आता अधिक गुंतागुंतीची झाली आहेत.


भारताविरूद्धच्या विजयानंतर इंग्लंडने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेनंतर उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. तर, भारताचा सलग तिसरा पराभव झाल्यामुळे उपांत्य फेरीतील चौथा आणि शेवटचा स्पॉट मिळवण्यासाठी त्यांची धावपळ सुरू झाली आहे.


भारताने आतापर्यंत खेळलेल्या पाच सामन्यांत २ विजय आणि ३ पराभवांसह ४ गुण मिळवले आहेत. गुणतालिकेत ते सध्या चौथ्या स्थानावर आहेत. उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी भारताला त्यांचे उर्वरित दोन्ही सामने जिंकणे आवश्यक आहे. भारताचे पुढील सामने न्यूझीलंड (२३ ऑक्टोबर) आणि बांगलादेश (२६ ऑक्टोबर) विरुद्ध नवी मुंबईतील डी.वाय.पाटील स्टेडियमवर होणार आहेत.


न्यूझीलंडविरुद्धचा पुढील सामना भारतासाठी 'करो वा मरो' असा असेल. या सामन्यातील विजय भारताचा उपांत्य फेरीतील प्रवेश जवळपास निश्चित करेल.सामन्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने पराभवाबद्दल दुःख व्यक्त केले. "आम्ही खूप मेहनत घेतली, पण शेवटच्या ५-६ षटकांमध्ये योजना व्यवस्थित अंमलात आणू शकलो नाही. मानधनाची विकेट हा टर्निंग पॉईंट होता," असे ती म्हणाली. मानधनानेही चुकीच्या शॉट निवडीची जबाबदारी स्वीकारली.


हा पराभव अतिशय निराशाजनक असला तरी, भारताची उपांत्य फेरीची आशा अजूनही कायम आहे, परंतु त्यासाठी त्यांना आपल्या शेवटच्या दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवावा लागेल.

Comments
Add Comment

INDvsSL : भारत - श्रीलंका कसोटीच्या वेळेबाबत मोठा निर्णय, गॉल कसोटीत रविवारचा खेळ किती वाजता सुरू होणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात रविवारी सकाळी ९.४५ वाजता खेळ सुरू होणार

Sourav Ganguly : फोन नंबर कोलकातामधीलच, पोलीस कारवाई करतील; जीवे मारण्याच्या धमकीवर सौरव गांगुलीची प्रतिक्रिया

कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने गेल्या सहा महिन्यांपासून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला

Devdutt Padikkal : पडिक्कलचे शतक, श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत पहिल्या दिवशीच भारताने केल्या एवढ्या धावा

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे खेळवला

INDvsSL : भारत विरुद्ध श्रीलंका, पहिल्या कसोटी सामन्यात कोण खेळणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. श्रीलंकेत होणार असलेल्या या मालिकेतील

IND vs SL Test : गॉलमध्ये टीम इंडियाची ‘फिरकी परीक्षा’; जयसूर्या-मेंडिस ठरणार मोठे आव्हान

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला १५ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला

UEFA Super Cup 2026 : PSG चा Aston Villa वर 2-1 ने विजय; सलग दुसऱ्यांदा Super Cup वर नाव!

साल्झबर्ग : Paris Saint-Germain (PSG) ने Aston Villa वर 2-1 असा रोमांचक विजय मिळवत 2026 UEFA Super Cup आपल्या नावावर केला. 12 ऑगस्ट 2026 रोजी ऑस्ट्रियातील