यंदाच्या दिवाळीत प्रदूषण नियंत्रण मंडळ १५८ ठिकाणी फटाक्यांच्या आवाजाची तीव्रता मोजणार

मुंबई : दिवाळीच्या काळात फटाक्यांच्या आवाजामुळे मोठ्या प्रमाणात वायू आणि ध्वनी प्रदूषण होते. त्यामुळे पर्यावरण विषयक जनजागृतीचा उपक्रम म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दरवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील दिवाळीमध्ये बाजारात उपलब्ध असलेल्या फटाक्यांच्या आवाजाच्या तीव्रतेचे मापन केले. तसेच दिवाळी दरम्यान ध्वनीची पातळी राज्यातील एकूण १५८ ठिकाणी मोजण्याचे नियोजन केले आहे.


प्रदूषण नियंत्रण मंडळाने फटाक्यांच्या आवाजाची कमाल तीव्रता १२५ डेसिबल निश्चित केली आहे. दिवाळीआधी प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या चाचणीत काही फटाक्यांचा आवाज कमाल मर्यादेपेक्षा कमी तर निवडक फटाक्यांचा आवाज कमाल मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे आढळले.


फटाक्यांच्या ध्वनीची मर्यादा कोणत्या भागात किती असावी ?


नागरी वस्ती भागात दिवसा ५५ तर रात्री ४५ डेसिबल पर्यंतचा आवाज हा प्रदूषण म्हणून ग्राह्य धरला जातो. तर शांतता क्षेत्र असलेल्या भागात हा आवाज दिवसा ५० आणि रात्री ४० पर्यंत प्रदूषण म्हणून धरला जातो. व्यावसायिक क्षेत्रात दिवसा ६५ तर रात्री ५५ आणि औद्योगिक क्षेत्रात दिवसा ७५ तर रात्री ७० डेसिबल ध्वनिमर्यादा आहे.

Comments
Add Comment

CM Devendra Fadnavis Cabinet Mumbai : पाचव्या वित्त आयोगाला मुदतवाढ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटचे ५ महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (मंगळवार) राज्य मंत्रिमंडळाची (Cabinet) महत्त्वपूर्ण

Delhi Bomb Blast : दिल्ली स्फोटानंतर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ मंदिराच्या सुरक्षेत वाढ; सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशनवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त

पुणे : भारताची राजधानी दिल्लीमध्ये (New Delhi)  सोमवारी, १० नोव्हेंबर रोजी संध्याकाळी झालेल्या दोन बॉम्बस्फोटांमुळे (Bomb

क्रिकेटच्या वादातून गोळीबारात तरुणाचा मृत्यू

जळगाव : शहरातील कांचन नगरातील विलास चौकात क्रिकेटच्या वादातून झालेल्या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाला. आकाश

पुण्यातून २०६ किमी लांबीचा सहापदरी महामार्गाचा प्रस्ताव

पुणे : पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी सरकारनं नवा प्रकल्प हातात घेतलाय. सहापदरी रस्त्याचा हा

ठोंबरे आणि मिटकरींना पक्षातून 'दे धक्का', प्रवक्ते पदावरून उचलबांगडी!

सूरज चव्हाण यांना मात्र 'अभय'; राष्ट्रवादी अजित पवार गटातील अंतर्गत वादाला नवे वळण मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस

इमारतीला आग, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

सांगली : विटा शहरात एका तीन मजली इमारतीला आग लागली. इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या स्टील फर्निचरच्या दुकानातून