यंदाच्या दिवाळीत प्रदूषण नियंत्रण मंडळ १५८ ठिकाणी फटाक्यांच्या आवाजाची तीव्रता मोजणार

मुंबई : दिवाळीच्या काळात फटाक्यांच्या आवाजामुळे मोठ्या प्रमाणात वायू आणि ध्वनी प्रदूषण होते. त्यामुळे पर्यावरण विषयक जनजागृतीचा उपक्रम म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दरवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील दिवाळीमध्ये बाजारात उपलब्ध असलेल्या फटाक्यांच्या आवाजाच्या तीव्रतेचे मापन केले. तसेच दिवाळी दरम्यान ध्वनीची पातळी राज्यातील एकूण १५८ ठिकाणी मोजण्याचे नियोजन केले आहे.


प्रदूषण नियंत्रण मंडळाने फटाक्यांच्या आवाजाची कमाल तीव्रता १२५ डेसिबल निश्चित केली आहे. दिवाळीआधी प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या चाचणीत काही फटाक्यांचा आवाज कमाल मर्यादेपेक्षा कमी तर निवडक फटाक्यांचा आवाज कमाल मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे आढळले.


फटाक्यांच्या ध्वनीची मर्यादा कोणत्या भागात किती असावी ?


नागरी वस्ती भागात दिवसा ५५ तर रात्री ४५ डेसिबल पर्यंतचा आवाज हा प्रदूषण म्हणून ग्राह्य धरला जातो. तर शांतता क्षेत्र असलेल्या भागात हा आवाज दिवसा ५० आणि रात्री ४० पर्यंत प्रदूषण म्हणून धरला जातो. व्यावसायिक क्षेत्रात दिवसा ६५ तर रात्री ५५ आणि औद्योगिक क्षेत्रात दिवसा ७५ तर रात्री ७० डेसिबल ध्वनिमर्यादा आहे.

Comments
Add Comment

Ahilyanagar: लग्नाच्या आमिषाने तरुणीचे लैंगिक शोषण; श्रीरामपूरात गुन्हा दाखल

श्रीरामपूर: लग्नाचे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरुणीचे दीर्घकाळ लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अक्षय विश्वनाथ गवळी

बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा पुढाकार

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, भारत पेट्रोलियम

Nitesh Rane: मंत्री नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला राष्ट्रीय सागरी दिन

मुंबई: भारताच्या आर्थिक महासत्तेकडे होणाऱ्या वाटचालीत सागरी क्षेत्राचा वाटा मोलाचा असून, बंदरांच्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कोयना महोत्सवाची यशस्वी सांगता

सातारा: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अग्रस्थानी नेण्याचा निर्धार व्यक्त करत पर्यटन, शेती आणि रोजगार

मुख्यमंत्र्यांच्या पाठबळामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पर्यावरणीय पुनरुज्जीवन प्रकल्पाला मिळाली चालना

मुंबई: जैवविविधतेने समृद्ध अशा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील जागेचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन

‘पीएनजी’ क्षेत्रातील नागरिकांना ३० जूननंतर ‘एलपीजी’ गॅस पुरवठा बंद; पर्यायी इंधन म्हणून केरोसीनचे वाटप होणार

मुंबई: राज्यातील ज्या शहरी भागांमध्ये पाइपद्वारे गॅस (पीएनजी) जोडणीची सुविधा उपलब्ध आहे, तिथे नागरिकांनी पीएनजी