यंदाच्या दिवाळीत प्रदूषण नियंत्रण मंडळ १५८ ठिकाणी फटाक्यांच्या आवाजाची तीव्रता मोजणार

मुंबई : दिवाळीच्या काळात फटाक्यांच्या आवाजामुळे मोठ्या प्रमाणात वायू आणि ध्वनी प्रदूषण होते. त्यामुळे पर्यावरण विषयक जनजागृतीचा उपक्रम म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दरवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील दिवाळीमध्ये बाजारात उपलब्ध असलेल्या फटाक्यांच्या आवाजाच्या तीव्रतेचे मापन केले. तसेच दिवाळी दरम्यान ध्वनीची पातळी राज्यातील एकूण १५८ ठिकाणी मोजण्याचे नियोजन केले आहे.


प्रदूषण नियंत्रण मंडळाने फटाक्यांच्या आवाजाची कमाल तीव्रता १२५ डेसिबल निश्चित केली आहे. दिवाळीआधी प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या चाचणीत काही फटाक्यांचा आवाज कमाल मर्यादेपेक्षा कमी तर निवडक फटाक्यांचा आवाज कमाल मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे आढळले.


फटाक्यांच्या ध्वनीची मर्यादा कोणत्या भागात किती असावी ?


नागरी वस्ती भागात दिवसा ५५ तर रात्री ४५ डेसिबल पर्यंतचा आवाज हा प्रदूषण म्हणून ग्राह्य धरला जातो. तर शांतता क्षेत्र असलेल्या भागात हा आवाज दिवसा ५० आणि रात्री ४० पर्यंत प्रदूषण म्हणून धरला जातो. व्यावसायिक क्षेत्रात दिवसा ६५ तर रात्री ५५ आणि औद्योगिक क्षेत्रात दिवसा ७५ तर रात्री ७० डेसिबल ध्वनिमर्यादा आहे.

Comments
Add Comment

President Draupadi Murmu: राष्ट्रपती २५ फेब्रुवारी रोजी करणार राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन

अकोला :  भारत सरकारचे आयुष मंत्रालय, अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २५ ते २८

महाराष्ट्राचा सुपुत्र गुजरातच्या मुख्य निवडणूकअधिकारीपदी

अकोला : भारतीय निवडणूक आयोगाने ज्येष्ठ आयएएस अधिकारी संदीप सागळे यांची गुजरात राज्याचे नवीन मुख्य निवडणूक

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने गोदावरी इम्पॅक्ट इन्व्हेस्टमेंट कॉन्क्लेव्हचे आयोजन

नाशिक :  सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने उद्योजक आणि इनोव्हेटर्स तसेच स्टार्ट अप्स यांनी नाशिक शहरातील

लंडन ते हैद्राबाद विमानात तांत्रिक बिघाड; १६९ प्रवाशांचा जीव टांगणीला

नागपूर : ब्रिटिश एअरवेज बोईंग ७८७ हा विमान लंडनहुन हैद्राबादला येत होते. या विमानाची डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Beed: दहावीच्या मुलीचं अपहरण करत...; पीकअप चालकाच्या कृत्याने परिसरात तीव्र संताप

बीड: गेल्या काही काळात बीड जिल्हा गुन्हेगारी घटनांमुळे चर्चेत आहे. आता केज तालुक्यातून एक संतापजनक घटना समोर आली

महाराष्ट्र भाजपची प्रदेश कार्यकारिणी जाहीर; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची घोषणा

मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आटोपताच महाराष्ट्र भाजपने संघटनात्मक फेरबदल केले आहे.