यंदाच्या दिवाळीत प्रदूषण नियंत्रण मंडळ १५८ ठिकाणी फटाक्यांच्या आवाजाची तीव्रता मोजणार

मुंबई : दिवाळीच्या काळात फटाक्यांच्या आवाजामुळे मोठ्या प्रमाणात वायू आणि ध्वनी प्रदूषण होते. त्यामुळे पर्यावरण विषयक जनजागृतीचा उपक्रम म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दरवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील दिवाळीमध्ये बाजारात उपलब्ध असलेल्या फटाक्यांच्या आवाजाच्या तीव्रतेचे मापन केले. तसेच दिवाळी दरम्यान ध्वनीची पातळी राज्यातील एकूण १५८ ठिकाणी मोजण्याचे नियोजन केले आहे.


प्रदूषण नियंत्रण मंडळाने फटाक्यांच्या आवाजाची कमाल तीव्रता १२५ डेसिबल निश्चित केली आहे. दिवाळीआधी प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या चाचणीत काही फटाक्यांचा आवाज कमाल मर्यादेपेक्षा कमी तर निवडक फटाक्यांचा आवाज कमाल मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे आढळले.


फटाक्यांच्या ध्वनीची मर्यादा कोणत्या भागात किती असावी ?


नागरी वस्ती भागात दिवसा ५५ तर रात्री ४५ डेसिबल पर्यंतचा आवाज हा प्रदूषण म्हणून ग्राह्य धरला जातो. तर शांतता क्षेत्र असलेल्या भागात हा आवाज दिवसा ५० आणि रात्री ४० पर्यंत प्रदूषण म्हणून धरला जातो. व्यावसायिक क्षेत्रात दिवसा ६५ तर रात्री ५५ आणि औद्योगिक क्षेत्रात दिवसा ७५ तर रात्री ७० डेसिबल ध्वनिमर्यादा आहे.

Comments
Add Comment

नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेला इन्क्यूबेशन सेंटर म्हणून मान्यता

मुंबई: विदर्भातील नवउद्योग (स्टार्टअप) परिसंस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत,

नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; कृषीमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून, नमो

‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक’ विधानपरिषदेत मंजूर

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून चर्चेत असलेले आणि अत्यंत कडक तरतुदी असलेले ‘महाराष्ट्र

सिंधुदुर्गच्या विकासाला बुस्टर; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १०० टक्के 'व्हिजीएफ'ला मंजुरी

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला आणि अर्थव्यवस्थेला मोठी गती देणारा निर्णय मंगळवारी राज्य

नंदूरबार,छत्रपती संभाजीनगरमधील गैरव्यवहारासाठी 'एसआयटी स्थापन; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधान परिषदेत घोषणा

​मुंबई: नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर येथील भूसंपादन गैरव्यवहार आणि छत्रपती संभाजीनगरमधील ब्रिजवाडी येथील ५४

रब्बी हंगामातील 'ई-पीक पाहणी'ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

- ४५ टक्के शेतकरी अजूनही प्रक्रियेबाहेर; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील रब्बी