बिहारमधून निवडणूक लढवणार ७२ वर्षांचे आजोबा

पाटणा : बिहारमध्ये विधानसभेची निवडणूक होत आहे. यंदा बडा खोदाबंदपूर गावात राहणारे राम स्वार्थ प्रसाद हे ७२ वर्षांचे आजोबा निवडणूक लढवत आहेत. सर्वपक्षीय नेत्यांना जे जमले नाही ते काम करणार, मतदारसंघाचा विकास करणार असे आश्वासन देत राम स्वार्थ प्रसाद यांनी निवडणूक लढवत असल्याचे जाहीर केले आहे.


चेहऱ्यावर सुरकुत्या जरी आल्या असल्या तरी राम स्वार्थ प्रसाद यांचा आत्मविश्वास एखाद्या मोठ्या नेत्यासारखा आहे. निवडणुकीत विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.



कुठून लढणार आहेत निवडणूक ?


बिहारमध्ये बडा खोदाबंदपूर गावात राहणारे राम स्वार्थ प्रसाद चेरिया बेरिया विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. शेतकऱ्यांना उद्योजकाचा दर्जा देणार, मुलांना मोफत शिक्षण देणार, गावातील उद्योग अडचणीत आणणाऱ्या परकीय मालावर बंदी घालणार, अशी आश्वासने त्यांनी दिली आहेत. मतदारसंघात जास्तीत जास्त लघुउद्योग सुरू करणार असल्याचेही आश्वासन त्यांनी दिले.

Comments
Add Comment

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना

Magh Mela 2026 : जणू महाकुंभच! हा केवळ माघ मेळा नाही, तर... प्रयागराजमध्ये भाविकांच्या अलोट गर्दीने मोडले सर्व जुने विक्रम; पाय ठेवायलाही जागा मिळेना

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील पवित्र त्रिवेणी संगमावर सुरू असलेल्या 'माघ मेळ्या'ने यंदा गर्दीचे

Andhra Pradesh Train Accident : आंध्र प्रदेशात रेल्वे अपघात! नेल्लोरमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले; रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता

नेल्लोर : आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातून रेल्वे अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. येथे एका धावत्या

Street Dogs: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा कडक निर्णय, खाऊ घालणाऱ्यांनाही जबाबदार ठरवणार

नवी दिल्ली: देशभरात रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे हल्ल्याचे प्रकरण वाढताना दिसत आहेत यावर सर्वोच्च