EPFO 3.0: PF क्लेम आता 3 दिवसांत पूर्ण होणार, कसं ते जाणून घेऊया...

नवी दिल्ली: देशातील लाखो नोकरदारांसाठी श्रम मंत्रालयाने 'EPFO 3.0' ही अत्यंत महत्त्वाची आणि फायदेशीर योजना सुरू केली आहे. अनेकदा कर्मचारी जुनी नोकरी सोडल्यानंतर जुन्या पीएफ खात्यातील शिल्लक रक्कम काढण्यास विसरतात. अशा प्रलंबित रक्कमेसाठी आता सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला असून, ज्या खात्यांमध्ये एक हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी रक्कम आहे, ती रक्कम सरकार स्वतःहून कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.


या नव्या सुविधेमुळे कर्मचाऱ्यांना कोणत्याही सरकारी कार्यालयात हेलपाटे मारण्याची किंवा अर्ज भरण्याची गरज भासणार नाही. तुमचे पीएफ पैसे थेट तुमच्या व्हेरिफाईड बँक खात्यात ट्रान्सफर केले जातील. तसेच, ईपीएफओच्या नव्या प्रणालीमुळे क्लेम सेटलमेंटचा कालावधी कमी होऊन तो आता केवळ ३ दिवसांवर आला आहे. ईपीएफओच्या नियमांनुसार, ज्या पीएफ खात्यात सलग ४६ महिने (३ वर्षे) कोणताही नवा हिस्सा जमा होत नाही, ते खाते 'इनऑपरेटिव्ह' मानले जाते.


ईपीएफओकडे सध्या अशा ३१.८६ लाख खात्यांमध्ये एकूण १०,९०३ कोटी रुपये पडून आहेत. पहिल्या टप्प्यात १,००० रुपयांपेक्षा कमी शिल्लक असलेली ७.११ लाख खाती निवडण्यात आली असून, त्यातील ३०.५२ कोटी रुपये थेट कर्मचाऱ्यांना परत दिले जाणार आहेत. अनेकजण छोटी रक्कम असल्याने पीएफ काढण्याचा कंटाळा करतात, यामुळे हजारो कोटी रुपये ईपीएफओकडे पडून आहेत. आता सरकारने हे पैसे थेट खातेदारांना देण्याचे अभियान हाती घेतले आहे.


इतकेच नाही, तर आता पीएफ क्लेम अवघ्या ७२ तासांत (३ दिवसांत) सेटल होणार आहे. यामुळे तातडीच्या वेळी पैशांची गरज असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात सरकारने अशा ७.११ लाख खात्यांची ओळख पटवली आहे. ज्यामध्ये १००० रुपयांपेक्षा कमी शिल्लक आहे. या मोहिमेमुळे लाखो कर्मचाऱ्यांच्या खिशात हक्काचे पैसे विनासायास परत येणार आहेत. जर तुमचे खाते ३ वर्षांपासून बंद असेल, तर आता तुमच्या मोबाईलवर लवकरच पैसे जमा झाल्याचा मेसेज येऊ शकतो.

Comments
Add Comment

Baruipur Murder Case : गुप्तांगांवर जखमा, डोक्यावर प्रहार अन् १२ वर्षीय मुलीवर पाशवी बलात्कार; पश्चिम बंगाल हादरले!

पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील बारुईपूर येथे एका १२ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार

Cloudburst : ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यास काय करावे? जाणून घ्या आपत्कालीन व्यवस्थापन आणि सुरक्षेचे उपाय

Cloudburst : सध्या राज्यात पावसाचा वेग वाढला आहे. नाशिकमध्ये तर ढगसदृश्य पाऊस सांगितला आहे. अशावेळेस नागरिकांनी घाबरून

Indian Navy : भारतीय नौदलाची ताकद वाढणार; 'आयएनएस महेंद्रगिरी' आणि 'आयएनएस मालवण' लवकरच ताफ्यात येणार

नवी दिल्ली : भारतीय नौदलाची सागरी ताकद आणखी वाढणार असून लवकरच ‘आयएनएस महेंद्रगिरी’ आणि ‘आयएनएस मालवण’ या दोन

Indian Navy : भारतीय नौदलाच्या युद्धनौकांच्या सिंगापूर भेटीची यशस्वी सांगता

नवी दिल्ली : भारत आणि सिंगापूर यांच्यातील दृढ सामरिक आणि सागरी भागीदारी अधिक मजबूत करत भारतीय नौदलाच्या पूर्व

Mumbai Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती; विक्रोळी येथे बोअरिंगचे काम सुरू

मुंबई (Mumbai): मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे (बुलेट ट्रेन) प्रकल्पासाठी, पहिल्या टनेल बोरिंग मशीनने (TBM) आज विक्रोळी

VB-G-RAM-G च्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारकडून राज्यांना २५ हजार ८६३ कोटी रुपयांचा पहिला हप्ता वितरित

नवी दिल्ली : केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राज्यांच्या