EPFO 3.0: PF क्लेम आता 3 दिवसांत पूर्ण होणार, कसं ते जाणून घेऊया...

नवी दिल्ली: देशातील लाखो नोकरदारांसाठी श्रम मंत्रालयाने 'EPFO 3.0' ही अत्यंत महत्त्वाची आणि फायदेशीर योजना सुरू केली आहे. अनेकदा कर्मचारी जुनी नोकरी सोडल्यानंतर जुन्या पीएफ खात्यातील शिल्लक रक्कम काढण्यास विसरतात. अशा प्रलंबित रक्कमेसाठी आता सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला असून, ज्या खात्यांमध्ये एक हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी रक्कम आहे, ती रक्कम सरकार स्वतःहून कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.


या नव्या सुविधेमुळे कर्मचाऱ्यांना कोणत्याही सरकारी कार्यालयात हेलपाटे मारण्याची किंवा अर्ज भरण्याची गरज भासणार नाही. तुमचे पीएफ पैसे थेट तुमच्या व्हेरिफाईड बँक खात्यात ट्रान्सफर केले जातील. तसेच, ईपीएफओच्या नव्या प्रणालीमुळे क्लेम सेटलमेंटचा कालावधी कमी होऊन तो आता केवळ ३ दिवसांवर आला आहे. ईपीएफओच्या नियमांनुसार, ज्या पीएफ खात्यात सलग ४६ महिने (३ वर्षे) कोणताही नवा हिस्सा जमा होत नाही, ते खाते 'इनऑपरेटिव्ह' मानले जाते.


ईपीएफओकडे सध्या अशा ३१.८६ लाख खात्यांमध्ये एकूण १०,९०३ कोटी रुपये पडून आहेत. पहिल्या टप्प्यात १,००० रुपयांपेक्षा कमी शिल्लक असलेली ७.११ लाख खाती निवडण्यात आली असून, त्यातील ३०.५२ कोटी रुपये थेट कर्मचाऱ्यांना परत दिले जाणार आहेत. अनेकजण छोटी रक्कम असल्याने पीएफ काढण्याचा कंटाळा करतात, यामुळे हजारो कोटी रुपये ईपीएफओकडे पडून आहेत. आता सरकारने हे पैसे थेट खातेदारांना देण्याचे अभियान हाती घेतले आहे.


इतकेच नाही, तर आता पीएफ क्लेम अवघ्या ७२ तासांत (३ दिवसांत) सेटल होणार आहे. यामुळे तातडीच्या वेळी पैशांची गरज असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात सरकारने अशा ७.११ लाख खात्यांची ओळख पटवली आहे. ज्यामध्ये १००० रुपयांपेक्षा कमी शिल्लक आहे. या मोहिमेमुळे लाखो कर्मचाऱ्यांच्या खिशात हक्काचे पैसे विनासायास परत येणार आहेत. जर तुमचे खाते ३ वर्षांपासून बंद असेल, तर आता तुमच्या मोबाईलवर लवकरच पैसे जमा झाल्याचा मेसेज येऊ शकतो.

Comments
Add Comment

RAW : 'रॉ' अधिकारी असल्याचे भासवून लाखोंची खंडणी मागणारा जेरबंद

गुजरात : गुजरातमधील(GUJRAT)राजकोट येथील एका धान्य व्यापाऱ्याचे बँक खाते ऑनलाईन व्यवहारानंतर गोठवून,स्वतःला

Transportation Guidelines : विद्यार्थी वाहतूक अधिक सुरक्षित करण्यासाठी सरकारची नवी नियमावली;उल्लंघन करणाऱ्या चालकांवर होणार कठोर कारवाई

मुंबई : राज्य शासनाने शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी महाराष्ट्र मोटार वाहन नियम,२०२६ अंतर्गत

Mirabai Chanu : मीराबाई चानूचा सुवर्ण जलवा! ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत हॅट्रिक, पंतप्रधान मोदींसह देशभरातून कौतुकाचा वर्षाव

नवी दिल्ली : भारतीय वेटलिफ्टिंगची स्टार खेळाडू मीराबाई चानूने (Mirabai Chanu) पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. ग्लासगो येथे

NTA : पेपरफुटीवर केंद्राचा 'मास्टरप्लॅन'! NTA साठी 'सुपर 6' समितीची नियुक्ती

पेपर लीकवर केंद्राचा मोठा प्रहार! दोषींना १० वर्षांपर्यंत तुरुंगवास, ₹१० कोटींपर्यंत दंड; संसदेत सोमवारी

PM Narendra Modi : 'युवकांना स्वावलंबी बनवणे हे सरकारचे ध्येय'

नवी दिल्ली: 'विकसित वायब्रंट व्हिलेज कार्यक्रम २०२६' च्या सहभागींसोबत रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे

Amit Shah : युवा पिढी आणि विद्यार्थी आमच्यासाठी महत्वाचे : अमित शाह

धर्मेंद्र प्रधान यांनी केलेल्या कामाचंही कौतुक नवी दिल्ली : भाजप कार्यकर्त्यांसाठी पदापेक्षा देश खूप जास्त