फटाक्यांच्या दरात २० टक्क्यांनी वाढ

मुंबई  : दिवाळीचा सण अगदीच एक-दोन दिवसांवर आला असताना यंदा देशभरातील बाजारात फटाक्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी फटाक्यांच्या किमती तब्बल २० टक्क्यांनी वाढल्या आहेत. यामुळे फटाके फोडून दिवाळी साजरी करणाऱ्यांच्या खिशाला कात्री लागत आहे.दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांच्या होलसेल बाजारात किरकोळ खरेदीदारांची खरेदीसाठी लगबग सुरू आहे. लहान-मोठे फटाके खरेदीसाठी बाजारात उपलब्ध झाले आहेत. मात्र दरवर्षीच्या तुलनेत यंदा फटाक्यांचे उत्पादन कमी झाल्याने याचा फटाक्यांच्या उपलब्धतेवर परिणाम झाला आहे.


दिवाळीच्या पाच ते सहा महिने अगोदर फटाके निर्मितीस प्रारंभ होतो. यंदा फटाके निर्मितीचे केंद्र असलेल्या तमिळनाडूमधील शिव काशी येथे अतिवृष्टी झाली. त्यामुळे फटाके निर्मितीमध्ये अडचणी आल्या. फटाके सुकण्यासाठी ऊन गरजेचे असते. मात्र यंदा तेथे पावसामुळे फटाके सुकवण्यात अडचण निर्माण झाली. यामुळे तेथील कारखानदारांनी उत्पादन बंद ठेवले होते. परिणामी देशात फटाक्यांची टंचाई निर्माण झाली असल्याचे, होलसेल विक्रेते राहुल घोणे यांनी सांगितले.कच्चे साहित्य महाग झाल्यानेही फटाक्यांच्या किमतीमध्ये सुमारे २० टक्के वाढ झाली आहे. यातच फटाक्यांची वात तयार करणाऱ्या नागपूर येथील कंपनीला आग लागली होती. त्याचा फटाक्यांच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला. यातच वातेची किंमत १० टक्क्यांनी वाढल्याचा परिणाम म्हणून फटाक्यांच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. माल कमी आल्याने फटाक्यांच्या किमतीवरही याचा परिणाम झाल्याचे घोणे म्हणाले.


‘पॉप पॉप’ फटाक्याला मागणी
दरवर्षी फटाके बाजारात रंगीबेरंगी, विविध आवाज करणारे फटाके येतात. लहान मुलांना आकर्षक ठरणारे फटाके यंदाही बाजारात उपलब्ध आहेत. यामध्ये लहान मुलांच्या आवडीच्या ‘पॉप पॉप’ फटाक्याला अधिक मागणी आहे. या फटाक्याच्या किमतीमध्येही वाढ झाली असल्याचेही घोणे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

X अर्थात Twitter बंद पडलं, युझर त्रस्त

मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) जो आधी ट्विटर (Twitter) या नावाने ओळखला जात होता तो शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी

काँग्रेसमुळे मुंबईत ठाकरे बंधूंच्या ७ जागा पडल्या

मुंबई : ज्या काँग्रेसपायी उबाठाने भाजपशी नाते तोडले, त्याच काँग्रेसमुळे मुंबई पालिका निवडणुकीत त्यांना ७

भावनिक आवाहनाला न फसता महाराष्ट्राच्या विकासाला मतदारांची पसंती - भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

मुंबई : वर्षानुवर्षे भाजपा कार्यकर्त्याने यशाच्या दिशेने पार्टीला नेण्याचे स्वप्न पाहिले आणि ते स्वप्न साकार

BMC Election 2026 : भाजपची ऐतिहासिक मुसंडी तर ठाकरे, काँग्रेसचं काय? २९ महापालिकांच्या रणसंग्रामाचे 'A to Z' अपडेट्स!

मुंबई : भाजपचे निर्विवाद वर्चस्व राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) दणदणीत

 कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मलबार हिलचा गड राखला, भाजपाचे पाचही उमेदवार विजयी - मलबार हिल मध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दक्षिण मुंबईतला आपला मलबार हिलचा गड राखला आहे. त्यांच्या

BMC Election 2026 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची २९ पैकी १४ महापालिकेत घसरगुंडी! पुणे-पिंपरी चिंचवडमध्येही भोपळा फुटला नाही

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल आज समोर येत असून, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील