फटाक्यांच्या दरात २० टक्क्यांनी वाढ

मुंबई  : दिवाळीचा सण अगदीच एक-दोन दिवसांवर आला असताना यंदा देशभरातील बाजारात फटाक्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी फटाक्यांच्या किमती तब्बल २० टक्क्यांनी वाढल्या आहेत. यामुळे फटाके फोडून दिवाळी साजरी करणाऱ्यांच्या खिशाला कात्री लागत आहे.दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांच्या होलसेल बाजारात किरकोळ खरेदीदारांची खरेदीसाठी लगबग सुरू आहे. लहान-मोठे फटाके खरेदीसाठी बाजारात उपलब्ध झाले आहेत. मात्र दरवर्षीच्या तुलनेत यंदा फटाक्यांचे उत्पादन कमी झाल्याने याचा फटाक्यांच्या उपलब्धतेवर परिणाम झाला आहे.


दिवाळीच्या पाच ते सहा महिने अगोदर फटाके निर्मितीस प्रारंभ होतो. यंदा फटाके निर्मितीचे केंद्र असलेल्या तमिळनाडूमधील शिव काशी येथे अतिवृष्टी झाली. त्यामुळे फटाके निर्मितीमध्ये अडचणी आल्या. फटाके सुकण्यासाठी ऊन गरजेचे असते. मात्र यंदा तेथे पावसामुळे फटाके सुकवण्यात अडचण निर्माण झाली. यामुळे तेथील कारखानदारांनी उत्पादन बंद ठेवले होते. परिणामी देशात फटाक्यांची टंचाई निर्माण झाली असल्याचे, होलसेल विक्रेते राहुल घोणे यांनी सांगितले.कच्चे साहित्य महाग झाल्यानेही फटाक्यांच्या किमतीमध्ये सुमारे २० टक्के वाढ झाली आहे. यातच फटाक्यांची वात तयार करणाऱ्या नागपूर येथील कंपनीला आग लागली होती. त्याचा फटाक्यांच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला. यातच वातेची किंमत १० टक्क्यांनी वाढल्याचा परिणाम म्हणून फटाक्यांच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. माल कमी आल्याने फटाक्यांच्या किमतीवरही याचा परिणाम झाल्याचे घोणे म्हणाले.


‘पॉप पॉप’ फटाक्याला मागणी
दरवर्षी फटाके बाजारात रंगीबेरंगी, विविध आवाज करणारे फटाके येतात. लहान मुलांना आकर्षक ठरणारे फटाके यंदाही बाजारात उपलब्ध आहेत. यामध्ये लहान मुलांच्या आवडीच्या ‘पॉप पॉप’ फटाक्याला अधिक मागणी आहे. या फटाक्याच्या किमतीमध्येही वाढ झाली असल्याचेही घोणे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

ट्रेन तिकीट बुकिंगमध्ये तांत्रिक बिघाड, पेमेंट अडकले? रिफंडसाठी ‘ही’ पद्धत अवलंबा.

दिवाळीसाठी रेल्वेने गावी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा धक्का बसला आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम

आता पोस्ट ऑफिसमध्येही रेल्वे तिकीट मिळणार

मुंबई: दिवाळी आणि छठ पूजा यासारख्या सणांमध्ये रेल्वे तिकिटे मिळविण्यासाठी संघर्ष करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी

Rain Alert : दिवाळीच्या उत्साहात पावसाचं विघ्न? मुंबई-कोकण किनारपट्टीवरील हवामान बदलणार, कसा असेल अंदाज?

मुंबई : महाराष्ट्रासह देशातील बहुतांश राज्यांतून मान्सूनने आता माघार घेतली असली तरीही, अनेक ठिकाणी अद्याप

मढ-वर्सोवा पूल प्रकल्पासाठी पर्यावरणीय मंजुरी

मुंबई  : केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने २४०० कोटी रुपयांच्या मढ-वर्सोवा पूल प्रकल्पासाठी पर्यावरणीय मंजुरी दिली

मुंबईत जलवाहतुकीत नवी क्रांती! ना लाटांचे धक्के, ना आवाज मुंबईत येतेय भविष्याची ‘कॅन्डेला’ बोट

कॅन्डेला कंपनीच्या नवीन तंत्रज्ञानाने युक्त बोटी लवकरच मुंबईच्या जलवाहतूक क्षेत्रात दाखल होणार आहेत.

दिवाळीच्या तोंडावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक, नागरिकांचा प्रवास होणार उशिराने

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवार, १९ ऑक्टोबर रोजी