ऐन दिवाळीत पाऊस पडणार! हवामान खात्याचा अंदाज

मुंबई: राज्यात सध्या उन्हाचा कडाक आणि ढगाळ वातावरण असे मिश्र हवामान अनुभवयाला मिळत आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे पावसाचा जोर पुन्हा वाढून कापणीला आलेल्या शेतीचे नुकसान होणार का? असा प्रश्न पडला आहे.


एकाबाजूला हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तवली असताना, सांताक्रूझ येथे शुक्रवार, १७ ऑक्टोबरला ३७ अंश सेल्सिअस कमाल तापामानाची नोंद झाली. संपूर्ण राज्यातील तापमानाची नोंद पाहता शुक्रवारी सांताक्रूझ येथे सर्वाधिक तापमान असल्याचे नोंदले गेले.


राज्यात मोसमी पावसाने माघार घेतल्यामुळे समुद्रावरून येणारे वारे उशिरा वाहत आहेत. यामुळे तापमानात वाढ झाली असल्याचे हवामान खात्याने सांगितले. त्यामुळे अनेक भागात ३४ ते ३६ अंशादरम्यान तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच दक्षिण भारतात ईशान्य मोसमी वारे सक्रिय झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले.


दरम्यान गणेशोत्सव आणि नवरात्रीमध्ये पावसाची संततधार सुरु होती. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडून सणांचा आनंद घेता आला नाही. नुकतेच हवामान खात्याने दिवाळीमध्येही पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवल्यामुळे नागरिकांनी दिवाळी साजरी करताना सुद्धा मज्जा घेता येणार नसल्याचे दिसते.


Comments
Add Comment

Ahilyanagar: लग्नाच्या आमिषाने तरुणीचे लैंगिक शोषण; श्रीरामपूरात गुन्हा दाखल

श्रीरामपूर: लग्नाचे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरुणीचे दीर्घकाळ लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अक्षय विश्वनाथ गवळी

बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा पुढाकार

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, भारत पेट्रोलियम

Nitesh Rane: मंत्री नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला राष्ट्रीय सागरी दिन

मुंबई: भारताच्या आर्थिक महासत्तेकडे होणाऱ्या वाटचालीत सागरी क्षेत्राचा वाटा मोलाचा असून, बंदरांच्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कोयना महोत्सवाची यशस्वी सांगता

सातारा: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अग्रस्थानी नेण्याचा निर्धार व्यक्त करत पर्यटन, शेती आणि रोजगार

मुख्यमंत्र्यांच्या पाठबळामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पर्यावरणीय पुनरुज्जीवन प्रकल्पाला मिळाली चालना

मुंबई: जैवविविधतेने समृद्ध अशा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील जागेचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन

‘पीएनजी’ क्षेत्रातील नागरिकांना ३० जूननंतर ‘एलपीजी’ गॅस पुरवठा बंद; पर्यायी इंधन म्हणून केरोसीनचे वाटप होणार

मुंबई: राज्यातील ज्या शहरी भागांमध्ये पाइपद्वारे गॅस (पीएनजी) जोडणीची सुविधा उपलब्ध आहे, तिथे नागरिकांनी पीएनजी