ऐन दिवाळीत पाऊस पडणार! हवामान खात्याचा अंदाज

मुंबई: राज्यात सध्या उन्हाचा कडाक आणि ढगाळ वातावरण असे मिश्र हवामान अनुभवयाला मिळत आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे पावसाचा जोर पुन्हा वाढून कापणीला आलेल्या शेतीचे नुकसान होणार का? असा प्रश्न पडला आहे.


एकाबाजूला हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तवली असताना, सांताक्रूझ येथे शुक्रवार, १७ ऑक्टोबरला ३७ अंश सेल्सिअस कमाल तापामानाची नोंद झाली. संपूर्ण राज्यातील तापमानाची नोंद पाहता शुक्रवारी सांताक्रूझ येथे सर्वाधिक तापमान असल्याचे नोंदले गेले.


राज्यात मोसमी पावसाने माघार घेतल्यामुळे समुद्रावरून येणारे वारे उशिरा वाहत आहेत. यामुळे तापमानात वाढ झाली असल्याचे हवामान खात्याने सांगितले. त्यामुळे अनेक भागात ३४ ते ३६ अंशादरम्यान तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच दक्षिण भारतात ईशान्य मोसमी वारे सक्रिय झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले.


दरम्यान गणेशोत्सव आणि नवरात्रीमध्ये पावसाची संततधार सुरु होती. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडून सणांचा आनंद घेता आला नाही. नुकतेच हवामान खात्याने दिवाळीमध्येही पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवल्यामुळे नागरिकांनी दिवाळी साजरी करताना सुद्धा मज्जा घेता येणार नसल्याचे दिसते.


Comments
Add Comment

नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेला इन्क्यूबेशन सेंटर म्हणून मान्यता

मुंबई: विदर्भातील नवउद्योग (स्टार्टअप) परिसंस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत,

नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; कृषीमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून, नमो

‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक’ विधानपरिषदेत मंजूर

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून चर्चेत असलेले आणि अत्यंत कडक तरतुदी असलेले ‘महाराष्ट्र

सिंधुदुर्गच्या विकासाला बुस्टर; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १०० टक्के 'व्हिजीएफ'ला मंजुरी

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला आणि अर्थव्यवस्थेला मोठी गती देणारा निर्णय मंगळवारी राज्य

नंदूरबार,छत्रपती संभाजीनगरमधील गैरव्यवहारासाठी 'एसआयटी स्थापन; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधान परिषदेत घोषणा

​मुंबई: नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर येथील भूसंपादन गैरव्यवहार आणि छत्रपती संभाजीनगरमधील ब्रिजवाडी येथील ५४

रब्बी हंगामातील 'ई-पीक पाहणी'ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

- ४५ टक्के शेतकरी अजूनही प्रक्रियेबाहेर; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील रब्बी