ऐन दिवाळीत पाऊस पडणार! हवामान खात्याचा अंदाज

मुंबई: राज्यात सध्या उन्हाचा कडाक आणि ढगाळ वातावरण असे मिश्र हवामान अनुभवयाला मिळत आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे पावसाचा जोर पुन्हा वाढून कापणीला आलेल्या शेतीचे नुकसान होणार का? असा प्रश्न पडला आहे.


एकाबाजूला हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तवली असताना, सांताक्रूझ येथे शुक्रवार, १७ ऑक्टोबरला ३७ अंश सेल्सिअस कमाल तापामानाची नोंद झाली. संपूर्ण राज्यातील तापमानाची नोंद पाहता शुक्रवारी सांताक्रूझ येथे सर्वाधिक तापमान असल्याचे नोंदले गेले.


राज्यात मोसमी पावसाने माघार घेतल्यामुळे समुद्रावरून येणारे वारे उशिरा वाहत आहेत. यामुळे तापमानात वाढ झाली असल्याचे हवामान खात्याने सांगितले. त्यामुळे अनेक भागात ३४ ते ३६ अंशादरम्यान तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच दक्षिण भारतात ईशान्य मोसमी वारे सक्रिय झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले.


दरम्यान गणेशोत्सव आणि नवरात्रीमध्ये पावसाची संततधार सुरु होती. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडून सणांचा आनंद घेता आला नाही. नुकतेच हवामान खात्याने दिवाळीमध्येही पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवल्यामुळे नागरिकांनी दिवाळी साजरी करताना सुद्धा मज्जा घेता येणार नसल्याचे दिसते.


Comments
Add Comment

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार