ऐन दिवाळीत पाऊस पडणार! हवामान खात्याचा अंदाज

मुंबई: राज्यात सध्या उन्हाचा कडाक आणि ढगाळ वातावरण असे मिश्र हवामान अनुभवयाला मिळत आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे पावसाचा जोर पुन्हा वाढून कापणीला आलेल्या शेतीचे नुकसान होणार का? असा प्रश्न पडला आहे.


एकाबाजूला हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तवली असताना, सांताक्रूझ येथे शुक्रवार, १७ ऑक्टोबरला ३७ अंश सेल्सिअस कमाल तापामानाची नोंद झाली. संपूर्ण राज्यातील तापमानाची नोंद पाहता शुक्रवारी सांताक्रूझ येथे सर्वाधिक तापमान असल्याचे नोंदले गेले.


राज्यात मोसमी पावसाने माघार घेतल्यामुळे समुद्रावरून येणारे वारे उशिरा वाहत आहेत. यामुळे तापमानात वाढ झाली असल्याचे हवामान खात्याने सांगितले. त्यामुळे अनेक भागात ३४ ते ३६ अंशादरम्यान तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच दक्षिण भारतात ईशान्य मोसमी वारे सक्रिय झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले.


दरम्यान गणेशोत्सव आणि नवरात्रीमध्ये पावसाची संततधार सुरु होती. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडून सणांचा आनंद घेता आला नाही. नुकतेच हवामान खात्याने दिवाळीमध्येही पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवल्यामुळे नागरिकांनी दिवाळी साजरी करताना सुद्धा मज्जा घेता येणार नसल्याचे दिसते.


Comments
Add Comment

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आणखी एक अपघात, वाहतुकीची कोंडीच कोंडी

पुणे : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ पुण्याकडून मुंबईच्या दिशेने प्रोपिलीन वायू

आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तत्काळ तयार करा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल मिसिंग लिंकचे कामही लवकरात लवकर

अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी १२ हेक्टर जागा मंजूर

देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय १०० विद्यार्थी प्रवेश ⁠४३०

पुणे एक्सप्रेस वे अपघात प्रकरणी महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेच्या १३९ फेऱ्या रद्द

मुंबई : पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून या

एक्सप्रेवेवर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी अन् २५ किलोमीटर पर्यंत रांगा; नेमकं पुण्यात घडलं काय ?

लोणावळा : मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर मंगळवारी सायंकाळी घडलेल्या एका अपघातामुळे संपूर्ण मार्गावर

Congress: काँग्रेसमधला वाद चव्हाट्यावर, नगरसेवक थेट दिल्लीत पोहोचले, बैठकीत नेमकं घडलं काय?

दिल्ली: चंद्रपूर महापालिकेत सर्वाधिक जागा जिंकूनही काँग्रेसमध्ये गटातील राजकारणामुळे सत्ता गमावण्याची वेळ