पुणे महापालिकेत ‘कनिष्ठ अभियंता’ भरतीसाठी सुधारित जाहिरात

मुंबई : पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) वर्ग -३ या पदासाठी काही नवीन सामाजिक व समांतर आरक्षण प्रवर्गांतील जागा उपलब्ध झाल्याने या पदांसाठी आता सुधारित जाहिरातीनुसार पदभरती होणार आहे. त्यानुसार इच्छुकांना ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे, अशी माहिती पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त एम.जे. प्रदीप चंद्रन यांनी दिली आहे.


राज्य शासन निर्णय दि. २७ फेब्रुवारी २०२४ नुसार सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग (SEBC) प्रवर्गासाठी १० टक्के आरक्षण लागू करण्यात आले आहे. त्यामुळे पदसंख्या वाढवून नव्याने सुधारित आरक्षण संरचना जाहीर करण्यात आली आहे. सुधारित जाहिरातीत काही नवीन सामाजिक व समांतर आरक्षण प्रवर्गातील जागा उपलब्ध झाल्याने इच्छुक उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे. इच्छुकांनी ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावेत. यापूर्वी अर्ज केलेल्या उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. तथापि, कोणी नव्याने अर्ज केला, तर पूर्वीचा अर्ज बाद होऊन नवीन अर्जच ग्राह्य धरला जाईल. अर्ज व सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी पुणे महानगरपालिकेच्या https://www.pmc.gov.in/b/recruitment या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेला इन्क्यूबेशन सेंटर म्हणून मान्यता

मुंबई: विदर्भातील नवउद्योग (स्टार्टअप) परिसंस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत,

नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; कृषीमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून, नमो

‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक’ विधानपरिषदेत मंजूर

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून चर्चेत असलेले आणि अत्यंत कडक तरतुदी असलेले ‘महाराष्ट्र

सिंधुदुर्गच्या विकासाला बुस्टर; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १०० टक्के 'व्हिजीएफ'ला मंजुरी

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला आणि अर्थव्यवस्थेला मोठी गती देणारा निर्णय मंगळवारी राज्य

नंदूरबार,छत्रपती संभाजीनगरमधील गैरव्यवहारासाठी 'एसआयटी स्थापन; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधान परिषदेत घोषणा

​मुंबई: नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर येथील भूसंपादन गैरव्यवहार आणि छत्रपती संभाजीनगरमधील ब्रिजवाडी येथील ५४

रब्बी हंगामातील 'ई-पीक पाहणी'ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

- ४५ टक्के शेतकरी अजूनही प्रक्रियेबाहेर; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील रब्बी