शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड, पूरग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार दिवाळीपूर्वी मदत, अजित पवारांनी दिली ग्वाही

मुंबई: राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देणार असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले. राज्य सरकारने जाहीर केलेल्या मदतीबाबत वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता यांना सूचना दिल्या असून शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी मदत पोहचणार अशी ग्वाही अजित पवारांनी दिली आहे.


पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत बैठक घेण्यात आली होती. याबाबत राज्याच्या संकटात केंद्र सरकार पूर्ण सहकार्य करणार असल्याचा विश्वास अजित पवारांनी स्पष्ट केला. अतिवृष्टीसंदर्भातील अहवाल लवकरच पूर्ण होणार असून अंतिम अहवाल केंद्र सरकारला पाठविला जाणार आहे. त्यानुसार केंद्र सरकार मदत करणार असल्याची ग्वाही गृहमंत्री अमित शाह यांनी दिली असल्याचे अजित पवारांनी सांगितले. शेतकऱ्यांना जाहीर केलेले पॅकेज हे आजवरचे सर्वांत मोठे पॅकेज असल्याचेही अजित पवार म्हणाले.


ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे खूप नुकसान झाले. काही ठिकाणी संपूर्ण शेती पुराच्या पाण्यात वाहून गेली. तर काही ठिकाणी पिकाचे नुकसान झाले. यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला राज्य सरकारने ३१ हजार कोटींची मदत जाहीर करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र जाहीर केलेल्या रकमेतील थोडीच मदत शेतकऱ्यांना मिळणार, अशी अफवा विरोधकांनी निर्माण केली आहे. यावर राज्य सरकार करत असलेल्या चांगल्या कामाबद्दल विरोधक कधीही चांगले बोलणार नाहीत, अशी टीका पवारांनी केली आहे.

Comments
Add Comment

महापालिका शाळांमध्ये वर्षातून दोनदा भरवा विज्ञान प्रदर्शन

मुंबई : विद्यार्थ्यांमधील चिकित्सक वृत्तीला वाव देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने आयोजित केलेले ‘विज्ञान

भारताचा विजय, पुढील फेरीची आशा कायम; दक्षिण आफ्रिका सेमी फायनलमध्ये आणि झिम्बाब्वेचे आव्हान संपले

चेन्नई : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ मध्ये सुपर एट फेरीचे आजचे दोन्ही सामने सुपरहिट झाले. दक्षिण

भारताने झिम्बाब्वे विरूद्धच्या सामन्यात उभारला धावांचा डोंगर

चेन्नई : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ मध्ये झिम्बाब्वे विरूद्धच्या सुपर एट फेरीतील सामन्यात भारताने

मुंबईतील फेरीवाला माफियाराज कायमचेच उखडून टाका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील वाढत्या फेरीवाल्यांवरील कारवाई सध्या प्रशासनाने कडक केली असली तरी या

तुमच्यापेक्षा सभागृहात गोंधळ घालण्यात आम्ही एक्सपर्ट

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेचे सर्व पक्षांच्या नगरसेवकांना सोबत घेवून चांगल्याप्रकारे कामकाज क

शाळा दत्तक धोरण रद्द करण्याची काँग्रेस आमदार पुत्राची मागणी नामंजूर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेने खासगी संस्था, स्वयंसेवी संस्था आदींना महापालिकेच्या दिलेल्या दत्तक