मुंबईतील जन्म, मृत्यू प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेचे ऑडिट, भाजपाने का केली मागणी?

मुंबई: मुंबईत बोगस जन्म प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे प्रकार निदर्शनास आल्याने जन्म नोंदणी व जन्म प्रमाणपत्र वितरण प्रक्रियेची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेचे नियमित लेखापरीक्षण (ऑडिट) करण्यात यावे, अशी ठाम मागणी आता जोर धरु लागली आहे. जेणेकरून परदेशी नागरिकांचे अवैध वास्तव्य रोखण्यासही मदत होईल, आणि पर्यायाने देशाच्या सुरक्षाही अबाधित राखली जाईल असे बोलले जात आहे.


भाजपचे नगरसेवक नील सोमय्या यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे ही मागणी केली आहे. महापालिका सभागृहात याप्रकारचा ठराव मांडताना सोमय्या यांनी मुंबईतील काही भागांमध्ये परदेशी नागरिकांचे अवैधरित्या वास्तव्याचे प्रमाण वाढत आहे. महापालिकेच्या काही कार्यालयांमधून अशा व्यक्तींना बोगस जन्म दाखले देण्यात आल्याचे निदर्शनास आल्याचे सांगितले. त्यामुळे मुंबईच्या सुरक्षेच्या आणि प्रशासकीय विश्वासार्हतेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर व चिंताजनक ही बाब असल्याचे सांगितले. त्यामुळे या पार्श्वभूमीवर, जन्म नोंदणी, प्रमाणपत्रांचे वितरण, अभिलेख व्यवस्थापन आणि संबंधित नियमांचे काटेकोर पालन होत आहे का, याची खात्री करण्यासाठी विशेष तपासणी मोहीम राबविण्याची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी यामध्ये मांडले आहे.


तपासणीदरम्यान प्रक्रियेत असलेल्या त्रुटी, अनियमितता, विलंब आणि नियमभंग झालेल्या प्रकरणांचा शोध घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे असून या संपूर्ण प्रक्रियेचे नियमित लेखापरीक्षण (ऑडिट) करण्यात यावे, अशी ठाम भूमिका मांडली आहे. यामुळे प्रशासनातील पारदर्शकता वाढेल आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे होणाऱ्या गैरप्रकारांना आळा बसण्यास मदत होईल,असेही नमुद केले आहे. यामाध्यमातून अशाप्रकारच्या उपाययोजना राबवल्यास परदेशी नागरिकांचे अवैध वास्तव्य रोखण्यासही मदत होईल, असेही नमुद केले आहे.

Comments
Add Comment

Bandra Encroachment Removal Campaign : वांद्रे स्थानकाबाहेर अतिक्रमण हटाव मोहीम; अनधिकृत मशिदीवर महापालिकेची कारवाई

मुंबई : मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेरील परिसरात आज सकाळी मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. या

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तेजस नेटवर्क्स आणि महाआयटीमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दूरसंचार तंत्रज्ञानाचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार मुंबई :

Virat Kohli : ९ वर्षांत कुणी विचारलंच नाही – तू कसा आहेस ? कसोटी कर्णधारपद सोडण्यावरून विराट कोहलीचा भावनिक खुलासा ..

बेंगळुरू : विराटने कसोटी कर्णधारपद सोडून आज ४ वर्षे उलटून गेली आहेत तरीही त्याच्या त्या निर्णयावर अजूनही बऱ्याच

Minister Nitesh Rane : राज्यातील जलवाहतूक सेवा होणार डिजिटल

 मंत्री नितेश राणे यांचे निर्देश; ऑनलाईन तिकीट व्यवस्थेची अंमलबजावणी करणार मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील