मुंबईतील हवेची गुणवत्ता पुन्हा खालावली

मुंबई : शहरातील हवेची गुणवत्ता झपाट्याने खालावत आहे. मुंबईचा एकूण वायू गुणवत्ता निर्देशांक ९ ऑक्टोबरपर्यंत, १०५ वर होता आता तो तिप्पट वाढला असून १३९ च्या आसपास पोहोचला आहे. तसेच वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स आणि देवनार येथे अनुक्रमे २२१ आणि २३५ वायू गुणवत्ता निर्देशांक नोंदवले गेले आहे. ज्यामुळे हवेच्या गुणवत्तेत सातत्याने घट होत असून येणाऱ्या हिवाळ्यात प्रदूषणाचे प्रमाण आणखी वाढून 'अत्यंत खराब' स्तरावर पोहोचू शकते.


हवामानशास्त्रज्ञ आणि वातावरण शास्त्रज्ञांनी मुंबईतील सध्याच्या हवामान घटनेला ला-निना हवामान पद्धतीचा परिणाम असल्याचे म्हटले आहे. तसेच मान्सून काळात वारंवार झालेल्या पावसामुळे धूलिकण धुऊन निघाल्याने प्रदूषणाचे प्रमाण नियंत्रणात होते. मात्र, पावसाचे प्रमाण घटल्याने वाढलेले तापमान आणि स्थिर हवामानामुळे वातावरणात धूर व धूळ साचू लागले आहेत.


पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, वाऱ्याच्या दिशेत झालेला बदल आणि सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पांमुळे निर्माण होणारी धूळ, तसेच आगामी दिवाळीतील फटाक्यांचा धूर या कारणांमुळे हवेची गुणवत्ता आणखी खालावण्याची
शक्यता आहे

Comments
Add Comment

मुंबई महापालिकेत विरोधकांची हवा गुल... काय आहे कारण जाणून घ्या

मुंबई: मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता आली असली तरी उबाठा आणि काँग्रेसच्या रुपात सक्षम विरोधी पक्ष असतानाही

मुंबईतील जन्म, मृत्यू प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेचे ऑडिट, भाजपाने का केली मागणी?

मुंबई: मुंबईत बोगस जन्म प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे प्रकार निदर्शनास आल्याने जन्म नोंदणी व जन्म प्रमाणपत्र

कडक शिस्तीच्या महापौर बाई, जेव्हा सभागृहात किशोरी पेडणेकर यांना चिडीचूप करतात तेव्हा...

मुंबई: मुंबई महापालिकेत उबाठाला आता २५ वर्षांनंतर विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली आहे. मात्र, या विरोधी बाकांवर

इराणप्रश्नी भारताने ठाम भूमिका घ्यायला हवी होती; राज ठाकरेंचे वक्तव्य

मुंबई: "इराणने दीर्घकाळ भारताला साथ दिली. आता त्या देशावर हल्ले होत असताना भारतानेही ठामपणे पाठिंबा द्यायला हवा

दिल्लीत झळकलेला महाराष्ट्राचा मानाचा चित्ररथ आता गिरगावात!

- कर्तव्यपथावर झळकलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा मुंबईकरांना प्रत्यक्ष अनुभव मुंबई : नवी दिल्ली

गुढीपाडव्याच्या दिवशी बीकेसी पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत बीकेसीच्या पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी