मुंबईतील हवेची गुणवत्ता पुन्हा खालावली

मुंबई : शहरातील हवेची गुणवत्ता झपाट्याने खालावत आहे. मुंबईचा एकूण वायू गुणवत्ता निर्देशांक ९ ऑक्टोबरपर्यंत, १०५ वर होता आता तो तिप्पट वाढला असून १३९ च्या आसपास पोहोचला आहे. तसेच वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स आणि देवनार येथे अनुक्रमे २२१ आणि २३५ वायू गुणवत्ता निर्देशांक नोंदवले गेले आहे. ज्यामुळे हवेच्या गुणवत्तेत सातत्याने घट होत असून येणाऱ्या हिवाळ्यात प्रदूषणाचे प्रमाण आणखी वाढून 'अत्यंत खराब' स्तरावर पोहोचू शकते.


हवामानशास्त्रज्ञ आणि वातावरण शास्त्रज्ञांनी मुंबईतील सध्याच्या हवामान घटनेला ला-निना हवामान पद्धतीचा परिणाम असल्याचे म्हटले आहे. तसेच मान्सून काळात वारंवार झालेल्या पावसामुळे धूलिकण धुऊन निघाल्याने प्रदूषणाचे प्रमाण नियंत्रणात होते. मात्र, पावसाचे प्रमाण घटल्याने वाढलेले तापमान आणि स्थिर हवामानामुळे वातावरणात धूर व धूळ साचू लागले आहेत.


पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, वाऱ्याच्या दिशेत झालेला बदल आणि सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पांमुळे निर्माण होणारी धूळ, तसेच आगामी दिवाळीतील फटाक्यांचा धूर या कारणांमुळे हवेची गुणवत्ता आणखी खालावण्याची
शक्यता आहे

Comments
Add Comment

Transport Minister Pratap Sarnaik's announcement : ठाणेकरांची हक्काची मेट्रो तीन महिन्यांत रुळावर

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा; घोडबंदर रोडचे पावसाळ्यापूर्वी रुंदीकरण मुंबई

Devendra Fadanvis : इतिहास घडविणाऱ्या खेळाडूंच्या आठवणी जपण्याचा उपक्रम अभिनव – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वानखेडे स्टेडियमवरील स्टँड व गेटच्या नामकरण सोहळ्यात क्रिकेट दिग्गजांचा मुख्यमंत्र्यांकडून गौरव मुंबई : ज्या

Jaykumar Gore : जयकुमार गोरे यांच्या मध्यस्थीला यश, बंजारा टायगर आंदोलन मागे; मागण्यांवर सकारात्मक भूमिका

मुंबई : बंजारा टायगर संघटनेच्या वतीने राज्यातील बंजारा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन सुरू

Mumbai Metropolitan Region : मुंबई महानगर प्रदेशसह विविध जिल्ह्यांना वीजपुरवठा अधिक सक्षम

महापारेषणची बाभळेश्वर–कुडूस ४०० के.व्ही. वीजवाहिनी कार्यान्वित मुंबई : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण

Eknath Shinde Opretion Tiger : 'उबाठा'च्या खासदारांची एकनाथ शिंदेंसोबत गुप्त बैठक?

'ऑपरेशन टायगर'ला पुन्हा वेग; ९ पैकी ८ खासदार हजर असल्याची चर्चा मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'उबाठा'

Bmc News : येत्या मे महिन्यापासून मुंबईकरांवर पाणीकपात

किमान १० टक्के होणार पाणी पुरवठ्यात कपात