कोल्ड्रिफ कफ सिरप कंपनीचा परवाना तामिळनाडू सरकारकडून रद्द

तामिळनाडू सरकारने कोल्ड्रिफ कफ सिरप बनवणारी कंपनी श्रीसन फार्मास्युटिकल्सचा उत्पादन परवाना पूर्णपणे रद्द करत, कंपनी कायमची बंद करण्याची घोषणा केली. श्रीसन फार्मा कारखान्यात ३५० हून अधिक गंभीर अनियमितता आढळल्या.


कोल्ड्रिफ सिरप प्यायल्याने मध्य प्रदेशात आतापर्यंत २५ मुलांचा मृत्यू झाला. चेन्नईतील अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोमवारी श्रीसन फार्माशी संबंधित सात ठिकाणी छापे टाकले. श्रीसन फार्माचे प्रमुख कर्मचारी आणि तामिळनाडू अन्न आणि औषध प्रशासन (टीएनएफडीए)चे अटक केलेले प्रभारी संचालक पी. यू. कार्तिकेयन यांच्या जागेवरही छापे टाकण्यात आले. कार्तिकेयन यांना जुलै २०२५ मध्ये लाचखोरीच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. भेसळयुक्त कोल्ड्रिफ सिरपच्या उत्पादन आणि विक्रीशी संबंधित आर्थिक व्यवहारांच्या संदर्भात पीएमएलए अंतर्गत ईडीकडून कारवाई केली.


दरम्यान, मध्य प्रदेश पोलीस रविवारी मुख्य आरोपी, श्रीसन फार्माचे मालक रंगनाथन गोविंदन यांना घेऊन तामिळनाडूला रवाना झाले. त्यांना ९ ऑक्टोबर रोजी चेन्नईमधून अटक करण्यात आली होती.

Comments
Add Comment

India's energy storage : भारताची ऊर्जा साठवणूक क्षमता २०३५-३६ पर्यंत दहा पटींनी वाढणार

नवी दिल्ली : भारताच्या विकासाच्या प्रवासात ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशाची वाढती वीज गरज आणि

CUTS International : बाईक टॅक्सींसाठी देशव्यापी सुसंगत धोरणाची गरज, 'कट्स इंटरनॅशनल'चा अहवाल

नवी दिल्ली : देशातील बाईक टॅक्सी सेवांसाठी सध्या असलेल्या विसंगत राज्यनिहाय नियमांऐवजी, एक सुसंगत आणि

Jagannath Rath Yatra Stampede : जगन्नाथ रथयात्रेदरम्यान प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

भुवनेशवर : ओडिसातील पुरी येथे गुरुवारी जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती

Strait of Hormuz : होर्मुज सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर भारतीय नाविकांच्या तैनातीला मनाई

अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर डीजीएमएचा मोठा निर्णय नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण यांच्यात वाढलेल्या

Narendra Modi : पंतप्रधान मोदी शुक्रवारी देशातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनला दाखवणार हिरवा झेंडा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी हरियाणातील जिंद रेल्वे स्थानकावरून जिंद आणि सोनीपत दरम्यान

Solar Eclipse : ऑगस्टमध्ये खग्रास सूर्यग्रहण; भारतातून दिसणार की नाही ? युरोपमधून दिसेल दुर्मिळ खगोलीय दृश्य !

नवी दिल्ली : तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा खग्रास सूर्यग्रहणाचे साक्षीदार होण्याची संधी जगाला मिळणार आहे.