कोल्ड्रिफ कफ सिरप कंपनीचा परवाना तामिळनाडू सरकारकडून रद्द

तामिळनाडू सरकारने कोल्ड्रिफ कफ सिरप बनवणारी कंपनी श्रीसन फार्मास्युटिकल्सचा उत्पादन परवाना पूर्णपणे रद्द करत, कंपनी कायमची बंद करण्याची घोषणा केली. श्रीसन फार्मा कारखान्यात ३५० हून अधिक गंभीर अनियमितता आढळल्या.


कोल्ड्रिफ सिरप प्यायल्याने मध्य प्रदेशात आतापर्यंत २५ मुलांचा मृत्यू झाला. चेन्नईतील अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोमवारी श्रीसन फार्माशी संबंधित सात ठिकाणी छापे टाकले. श्रीसन फार्माचे प्रमुख कर्मचारी आणि तामिळनाडू अन्न आणि औषध प्रशासन (टीएनएफडीए)चे अटक केलेले प्रभारी संचालक पी. यू. कार्तिकेयन यांच्या जागेवरही छापे टाकण्यात आले. कार्तिकेयन यांना जुलै २०२५ मध्ये लाचखोरीच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. भेसळयुक्त कोल्ड्रिफ सिरपच्या उत्पादन आणि विक्रीशी संबंधित आर्थिक व्यवहारांच्या संदर्भात पीएमएलए अंतर्गत ईडीकडून कारवाई केली.


दरम्यान, मध्य प्रदेश पोलीस रविवारी मुख्य आरोपी, श्रीसन फार्माचे मालक रंगनाथन गोविंदन यांना घेऊन तामिळनाडूला रवाना झाले. त्यांना ९ ऑक्टोबर रोजी चेन्नईमधून अटक करण्यात आली होती.

Comments
Add Comment

Andhra Pradesh Accident : आंध्र प्रदेशात खासगी ट्रॅव्हलची डंपरला जोरदार धडक; १३ जणांचा होरपळून मृत्यू

आंध्र प्रदेशातील मार्कापुरम जिल्ह्यात आज पहाटेच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली आहे. रायवरमजवळ एका खासगी

PM Narendra Modi : जगात मोदींचीच हवा! पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा बनले जगातील सर्वात लोकप्रिय नेते

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जागतिक स्तरावर सर्वाधिक लोकप्रिय नेते म्हणून समोर आले आहेत.

खराब जेवण देणं पडलं महागात, भारतीय रेल्वेने आकारला ६० लाख रुपयांचा दंड

मुंबई: भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. निकृष्ट दर्जाचे अन्न

रशियाकडून ६ कोटी बॅरल तेल खरेदी, एप्रिल महिन्यात होणार पुरवठा

नवी दिल्ली : आखाती देशातील युद्धस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताने रशियाकडून तब्बल ६ कोटी बॅरल तेलाची खरेदी केली

देशामध्ये १०० नवीन विमानतळ, २०० हेलीपॅड उभारणार, केंद्रीय मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत देशाच्या विमान वाहतूक, इमिग्रेशन आणि

देशभरात पेट्रोल-डिझेल, एलपीजीचा पुरवठा सुरळीत, सर्वपक्षीय बैठकीत सरकारची स्पष्टोक्ती

नवी दिल्ली  : पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठकीचे