ला निनामुळे नोव्हेंबरपासून तीव्र थंडीचा अंदाज

राज्यातून मान्सून माघारी परतलाय, पण ऑक्टोबर हीटमुळे सध्या अंगातून घामाच्या धारा निघत आहे. पहाटे हवेत प्रचंड गारवा जाणवायला लागलाय. तर दुपारी कडाक्याचे ऊन पडलेले असते. परंतु, दिवाळीनंतर राज्यात थंडीची लाट येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ला निना तापमानात प्रचंड घट होऊन यंदा तीव्र हिवाळा जाणवणार असे हवामान विभागाने सांगितले आहे.


सध्या दिल्ली एनसीआरमध्ये कडाक्याची थंडी पडायला सुरूवात झाली आहे. हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमधील उंच भागात बर्फवृष्टी सुरू झाली आहे. त्यामुळे दिल्ली आणि उत्तरेकडील मैदानी भागातही तापमान घट होतेय. त्यामुळे यंदा लवकर हिवाळ्याला सुरूवात होईल, असा अंदाज आहे. सध्या हिमाचल प्रदेश आणि पंजाब या दोन्ही ठिकाणी तापमानात घट झाली. मध्य आणि पूर्व पॅसिफिक महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानात घट झाल्यामुळे ला निना परिस्थिती निर्माण झाली आहे, याचा परिणाम हवामानावर होईल, असे हवामान तज्ज्ञांनी सांगितले.


ऑक्टोबर अखेरनंतर 'ला निना'चा प्रभाव सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अतिप्रमाणात थंडीचा अंदाज मांडण्यात येत आहे. आयएमडीचा अंदाज आहे की, काही दिवसात ला निना प्रभाव सुरू होईल. या थंडीची तीव्रता नेमकी किती असेल, याचा अंदाज नोव्हेंबरमध्येच येणार आहे. जर ला निना प्रभाव ऑक्टोबरमध्ये सक्रिय झाला तर डिसेंबर आणि जानेवारीत तापमान अति प्रमाणात कमी होऊ शकते.

Comments
Add Comment

आयएनएस ‘अरिदमन’ आणि ‘तारगिरी’ नौदलात दाखल

विशाखापट्टणम : आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणम येथे आयोजित नेत्रदीपक सोहळ्यात स्वदेशी बनावटीची आयएनएस अरिदमन ही

West Bengal : पश्चिम बंगाल : मालदा हिंसाचाराच्या सूत्रधाराला अटक

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील कालियाचक इथल्या हिंसाचाराचा सूत्रधार आणि एआयएमआयएम नेते

जन विश्वास विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर; वाहतूक कोंडी, ड्रायव्हिंग लायसन्सच्या नूतनीकरणात होणारा विलंब हे आता गुन्हे नाहीत

नवी दिल्ली : संसदेच्या दोन्ही सभागृहांनी जन विश्वास विधेयकाला मंजुरी दिली. राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली की

संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते विशाखापट्टणममध्ये अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीचे आणि स्टेल्थ फ्रिगेटचे जलावतरण

विशाखापट्टणम : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज (शुक्रवार ३ एप्रिल २०२६) विशाखापट्टणममध्ये

PM Kisan Yojana 23rd Instalment: पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता 'या' महिन्यात मिळण्याची शक्यता

मुंबई: भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे लाखो लोक शेती करतात. त्यांच्यापैकी अनेकांना शेतीतून फारसे उत्पन्न

Summer Special Train: उन्हाळ्यात घरी परतणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मुंबई-पुणे दरम्यान २१०० हून अधिक विशेष गाड्या धावणार

मुंबई: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी घरी परतण्याची योजना आखणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मध्य रेल्वेने