IND vs WI:चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात, भारताला विकेटची प्रतीक्षा

नवी दिल्ली: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात झाली आहे. वेस्ट इंडिज संघ दुसऱ्या डावात खेळ करत आहे. वेस्ट इंडिजने २०० धावांचा टप्पा पार केला असून त्यांचे २ गडी बाद केले आहेत.


भारतीय संघाने या सामन्यात पहिला डाव ५ बाद ५१८ धावांवर घोषित केला होता. यानंतर वेस्ट इंडिजने आपल्या पहिल्या डावात २४८ धावा के्या. भारताला पहिल्या डावाच्या आधारावर २७० धावांची आघाडी मिळाली आणि त्यांनी वेस्ट इंडिजला फॉलोऑन दिला. टीम इंडियाने अहमदाबादमध्ये खेळवण्यात आलेल्या मालिकेत एक डाव आणि १४० धावांनी विजय मिळवला होता. शुभमन गिलच्या नेतृत्वात टीम इंडिया १-०ने पुढे आहे.


दिल्ली कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या भारताने पाच बाद ५१८ धावा करुन पहिला डाव घोषीत केला. नंतर विंडीजचा डाव २४८ धावांत आटोपला. फॉलोऑन मिळाल्यामुळे पुन्हा फलंदाजीसाठी आलेल्या वेस्ट इंडिजने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दोन बाद १७३ धावा केल्या. अद्याप वेस्ट इंडिज ९७ धावांनी पिछाडीवर आहे. शाई होप ६६ आणि जॉन कॅम्पबेल ८७ धावांवर खेळत आहे. मोहम्मद सिराजने टी. चंदरपॉलला (१० धावा) शुभमन गिलकरवी झेलबाद केले तर अ‍ॅलिक अथानाझे सात धावा करुन वॉशिंग्टन सुंदरच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला.


भारताने पहिल्या डावात पाच बाद ५१८ धावा केल्या आणि डाव घोषीत केला. भारताकडून यशस्वी जयस्वालने १७५, केएल राहुलने ३८, साई सुदर्शनने ८७, कर्णधार शुभमन गिलने १२९नितीश रेड्डीने ४३, यष्टीरक्षक ध्रुव जुरेलने ४४ धावांचे योगदान दिले. वॉरिकनने तीन आणि चेसने एक बळी घेतला.

Comments
Add Comment

ICC Women's Cricket World Cup 2025 : जीत लिया जहां... PM मोदींनी केले अभिनंदन, तर 'मास्टर ब्लास्टर' सचिनला आठवली '१९८३' ची गाथा!

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने (Indian Women's Cricket Team) रविवारी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर (Dr. DY Patil Stadium) एक ऐतिहासिक

Rohit Sharma : महिला संघाच्या ऐतिहासिक विजयानंतर रोहित शर्माचे डोळे पाणावले; 'त्या' भावूक क्षणाचा फोटो होतोय व्हायरल!

नवी मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने (Indian Women's Cricket Team) अखेर आपला पहिला वनडे वर्ल्ड कप (First ODI World Cup) जिंकून इतिहास रचला आहे.

भारताच्या मुलींची कमाल, वर्ल्डकप जिंकून केली धमाल; फक्त १० मुद्यात वाचा टीम इंडियाच्या विजयाची गोष्ट

नवी मुंबई : भारताच्या महिला क्रिकेट संघाने आयसीसी महिला विश्वचषक २०२५ (ICC Women World Cup 2025) जिंकला

अखेर स्वप्न पूर्ण, भारताने जिंकला महिला विश्वचषक; दीप्तीने घेतल्या ५ विकेट

नवी मुंबई : अखेर भारताचे स्वप्न साकार झाले. भारताच्या महिला संघाने आयसीसी वर्ल्डकप पहिल्यांदाच जिंकला. नाणेफेक

अजित पवार सलग चौथ्यांदा राज्याच्या ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची सलग चौथ्यांदा राज्याच्या

IPL 2026 मिनी ऑक्शन परदेशात ? मोठी बातमी समोर आली!

मुंबई : आयपीएल २०२६ हंगामाची तयारी आता जोरात सुरू झाली आहे. सर्व संघांनी रणनिती आखायला सुरुवात केली असून, या वेळी