एसटी कर्मचाऱ्यांना सरकारकडून दिवाळी बोनस, संप टळला!

मुंबई : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विविध विभागातील कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर केला होता. मात्र, सुरुवातीला एसटी कर्मचाऱ्यांना या यादीत स्थान नव्हते. त्यामुळे नाराज एसटी कर्मचारी संघटनांनी संपाचं इशारा दिला होता. आता सरकारने त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत बोनस जाहीर केला आहे, ज्यामुळे संप टळला असून कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात साजरी होणार आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एसटी कर्मचारी संघटनांसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. झालेल्या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांसाठी काही महत्त्वाचे निर्णय जाहीर केले. यामध्ये दिवाळी बोनस म्हणून प्रत्येकी ६००० रुपयांचं सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


तसेच, १२,५०० रुपयांची उचल घेण्याची सुविधा कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिवाय, प्रत्येक महिन्याला ६५ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, जो पुढील ४८ आठवड्यांपर्यंत लागू राहणार आहे.


एसटी महामंडळ अनेक वर्षांपासून आर्थिक अडचणीत असून, वेळेवर पगार मिळण्यात अडथळे येत होते. अनेक वर्षांपासून एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये सामावून घेण्याची मागणी सुरू आहे, मात्र त्यावर अजून तोडगा निघालेला नाही.


सरकारने दिवाळीपूर्वीच ही आर्थिक मदत आणि बोनस जाहीर करून कामगारांच्या रोषाला थोपवले आहे. त्यामुळे संभाव्य संप टळला असून, एसटी कर्मचाऱ्यांसाठी यंदाची दिवाळी खरंच गोड ठरणार आहे.

Comments
Add Comment

महापालिका सभागृहात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाहिली श्रध्दांजली

मुंबई: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानिमित्त महापालिका सभागृहात शोक प्रस्तावाद्वारे

Drink and Drive New Rules Maharashtra: दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर...; परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील महामार्गांवर होणारे अपघात रोखण्यासाठी परिवहन विभागाने आता कंबर कसली आहे. विशेषतः समृद्धी

आर्थिक बेशिस्तीला मुख्यमंत्री फडणवीसांचा लगाम

११ हजार ९९५ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर; वित्तीय शिस्त राखताना अत्यावश्यक बाबींना दिले प्राधान्य मुंबई :

गरजूंपर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पोहचविणे हीच खरी देशसेवा

मुंबई : देशातील गरीब व्यक्तींपर्यंत विनासायास व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा पोहोचविणे हे आपले प्रमुख ध्येय

अलमुरी रत्नमाला इन्स्टिट्यूटमधील गैरव्यवहाराची चौकशी होणार

मुंबई : अलमुरी रत्नमाला इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, सापगाव (ता. शहापूर जि. ठाणे) मधील

मंत्री नितेश राणे यांच्या बंदरे खात्याची उल्लेखनीय कामगिरी

इंडिया मेरिटाईम वीक २०२५ मधील ५६ हजार कोटींचे करार राज्यासाठी ऐतिहासिक यश; आमदार प्रवीण दरेकर बंदरे विभागातील