मुंबईत गॅस तुटवडा नाही, महापौरांनी केले 'हे' मुंबईकरांना आवाहन

मुंबई: मुंबईत गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण केल्याचे चित्र निर्माण केले जात असून ही अफवा केवळ काँग्रेस आणि उबाठाकडून केली जात असल्याचा आरोपच महापौर रितू तावडे यांनी केला आहे. मुंबईमध्ये गॅस सिलिंडरचा तुडवटा नसून ही कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे. त्यामुळे मुंबईच्या जनतेने कोणत्याही परिस्थितीत घाबरुन जावून तासनतास गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी रांगा लावू नये तसेच अधिक दराने गॅस सिलिंडरही खरेदी करू नये असे आवाहन केले आहे.


मुंबईतील अनेक उपहारगृहांमध्ये गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे काहींना कोळशाच्या चुली निर्माण केल्या आहेत, तर काहींनी इलेक्ट्रीक शेगड्यांचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. तसेच काही बेकऱ्यांनी लाकडे वापरुन भट्टी चालवण्याची मागण केली आहे. याबाबत पत्रकारांशी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना महापौर रितू तावडे यांनी मुंबईत कशाप्रकारची आपत्कालिन परिस्थिती निर्माण झालेली नाही. जिथे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र निर्माण केली जाते, ती केवळ काँग्रेस आणि उबाठाच्यावतीने अफवा पसरवल्यामुळे होते. अशाप्रकारच्या अफवा पसरवल्यामुळे गॅस मिळवण्यासाठी लोक चार ते पाच तास रांगेत उभे राहून सिलिंडर मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच यासाठी अधिकही पैसे मोजण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु मुंबईमध्ये २५ दिवस आणि ग्रामीण भागात ४५ दिवसांमध्ये गॅस सिलिंडर उपलब्ध होतो. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत नागरिकांनी रांगेत उभे राहून गॅस सिलिंडर मिळवण्याचा प्रयत्न करू नये. तसेच या अफवांवर विश्वासही ठेवू नये. या अशा अफवांमुळे गॅसचा काळा बाजार होत आहे. त्यामुळे प्रसार माध्यमांनीही याची काळजी घ्यावी आणि लोकांना अशाप्रकारच्या काळा बाजार होण्यापासून रोखले जावे अशी सूचना केली. तसेच मुंबईकरांनी अशाप्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये असेही आवाहन केले.

Comments
Add Comment

BMC Waste Management : मोठ्या प्रमाणात कचरा निर्मिती: महानगरपालिकेकडे नोंदणी न करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आयुक्तांचे आदेश

मुंबई : घनकचरा व्यवस्थापन नियमांनुसार मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या संस्था व व्यक्तींनी

BMC News : एकही मॅनहोल्स उघडे राहता कामा नये

महापालिका आयुक्तांनी दिले संबंधित खात्यांसह सहायक आयुक्तांनाही निर्देश मुंबई : सध्या सुरू असलेली सर्व

Devendra Fadnavis : कला, संस्कृती अन् खाद्यसंस्कृतीची ओळख पटवून देणारा 'माटी ९ पूर्वांचल महोत्सव' : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारतीय संस्कृती महान असून ही संस्कृती समृद्ध करण्यासाठी महाराष्ट्राने anj पूर्वांचलने महत्त्वपूर्ण

Rain Update : वेळेआधीच मान्सून अंदमानात, महाराष्ट्रात २ ते ५ जून दरम्यान पावसाच्या आगमनाचा अंदाज

मुंबई : देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदा 'अल निनो'चे

Weather Alert : मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये उष्णतेची लाट

मुंबई : राज्यात सध्या एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे कडाक्याचे ऊन अशी दुहेरी हवामान स्थिती पाहायला मिळत आहे. याच

मुलुंड कालिदास नाट्य गृह परिसरातील टर्फसह अनधिकृतरित्या बांधकामांवर कारवाई

महापौरांचे आदेश आणि दुसऱ्याच दिवशी कारवाईला सुरुवात मुंबई :मुलुंड येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रीडा