जलजीवनच्या कामांसाठी ३१ हजार कोटींच्या निधीची गरज

मंत्री गुलाबराव पाटील यांची विधानसभेत माहिती; रखडलेल्या कामांवरून लोकप्रतिनिधींनाही सुनावले


मुंबई : "वर्षाला ७०० कोटी रुपये खर्च करण्याची सवय असलेल्या विभागावर अचानक हजारो कोटींच्या कामांचा भार पडला. १० किलो वजन उचलायची सवय असलेल्याला १०० किलोचा भार दिल्यावर जी अवस्था होते, तीच आमची झाली," अशी कबुली देत, रखडलेल्या योजना पूर्ण करण्यासाठी सुमारे ३१ हजार कोटींच्या निधीची आवश्यकता असल्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सोमवारी विधानसभेत सांगितले.


विधानसभेत जलजीवन मिशनच्या रखडलेल्या कामांवरून सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही बाजूंच्या आमदारांनी प्रश्नांचा भडिमार केला. त्यावर उत्तर देताना गुलाबराव पाटील यांनी निधीच्या निकडीवर भाष्य केले. योजना रखडण्याला केवळ प्रशासन जबाबदार नसल्याचे सांगत मंत्र्यांनी आमदारांनाही टोला लगावला. "डीपीआर (प्रकल्प अहवाल) तयार करताना तालुका समितीचे अध्यक्ष आमदार होते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री. जर आमदारांनी वेळीच लक्ष घातले असते, तर आज योजना रखडल्या नसत्या. भूजल सर्वेक्षण विभागाच्या काही चुका झाल्या आहेत, त्या आम्ही दुरुस्त करत आहोत," असे पाटील म्हणाले. ४६ टक्के मनुष्यबळासह विभाग रात्रंदिवस काम करत असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.


दरम्यान, निधी अभावी योजनेची कामे रखडल्याची कबुलीही मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. राज्यात जलजीवनचे एकूण ५१ हजार ५६० प्रकल्प आहेत. त्यापैकी २६ हजार ४९९ पूर्ण झाले आहेत. तर, ७५ ते ९९ टक्क्यांमध्ये असलेल्या प्रकल्पांची संख्या ६ हजार ४०९ इतकी असून त्यांच्यासाठी १२ हजार १८६ कोटींचा निधी लागणार आहे. तर, ५१ ते ७५ टक्के पूर्णत्वाला पोहचलेल्या ८ हजार ३२४ योजना आहेत. त्यासाठी १२ हजार ६५० कोटींचा निधी लागेल. तर, २६ ते ५० टक्के दरम्यानचे १ हजार ७८२ योजना असून त्यांच्यासाठी ५ हजार ४२२ कोटी इतका निधी लागणार आहे, अशी माहिती गुलाबराव पाटील यांनी दिली.

Comments
Add Comment

Chandrakant-dada Patil : पॉलीटेक्निक प्रवेशासाठी अर्ज करण्यास ६ जुलैपर्यंत मुदतवाढ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा विद्यार्थीहिताच्या निर्णय

मुंबई  : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील(Chandrakant Patil) यांनी विद्यार्थीहिताला सर्वोच्च प्राधान्य देत

Pandharpur Wari : आषाढी वारीसाठी मानाच्या १ हजार ४०० दिंड्यांना प्रत्येकी २० हजारांचे अनुदान

मुंबई : आषाढी एकादशी वारीसाठी मानाच्या पालख्यांसोबत पंढरपूरला जाणाऱ्या १ हजार ४०० दिंड्यांना प्रत्येकी २० हजार

Sakinaka Manhole Accident : साकीनाका मॅनहोल दुर्घटनेप्रकरणी चार अधिकाऱ्यांचे निलंबन

- विधानसभेत नगरविकास राज्यमंत्र्यांचे निवेदन; मृताच्या कुटुंबीयांना १० लाखांची मदत, उच्च स्तरीय समिती

Dattatray Bharne : महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर

विशेष सवलतींची तरतूद; शेतमजूर, निराधार महिलांना मिळणार शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता मुंबई : राज्यातील

Devendra Fadnavis : माहिती अधिकार कायद्यांमधील बदलांच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांची स्थगिती

राज्य माहिती आयोगाला पत्र; अण्णा हजारेंनी दिला होता उपोषणाचा इशारा मुंबई : माहिती अधिकार (

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मुंबई मेट्रो-३ मार्ग

सार्वजनिक वाहतूक दिवसानिमित्त अ‍ॅक्वा लाईनच्या प्रवाशांसाठी बीकेसी मध्ये मोफत फीडर बस सेवा मुंबई: मुंबई