मृणालताई गोरे विस्तारित उड्डाणपूल एप्रिलपर्यंत होणार वाहतूकीसाठी खुला

मुंबई: मृणालताई गोरे रेल्वे उड्डाणपुलाला जोडणाऱ्या राम मंदिर रोड ते गोरेगाव पश्चिम पर्यंतच्या रिलीफ रोड पर्यंत विस्तारित पुलाच्या कामाचा खर्च तब्बल ४० कोटींनी वाढला गेला. आतापर्यंत या विस्तारित पुलाच्या वाढीव खर्च तीन वेळा वाढवला गेला आहे. २०९ कोटी रुपयांवरून या प्रकल्पाचा खर्च २४८ कोटी रुपयांवर पोहोचला गेला आहे. या पुलाचे काम आता पूर्णत्वास आले असून ३० एप्रिल २०२६ पर्यंत ही कामे पूर्ण होऊन प्रत्यक्ष वाहतुकीसाठी हा मार्ग खुला होणार आहे.


महापालिकेच्या पुल विभागामार्फत या विस्तारित पुलाच्याकाम हाती घेण्यात आले आहे. या पुलाच्या कामाला २०१८ मध्ये मंजुरी प्राप्त झाली होती आणि २२ मार्च २०१९ मध्ये या कामाला सुरुवात झाली आहे. या कामासाठी एम इ पी एल - ग्यान या संयुक्त भागीदारीत कंपनीची निवड करण्यात आली होती.


सुरुवातीला या प्रकल्पाची कंत्राट खर्च सुमारे २०९ कोटी रुपये एवढा होता. होती. पावसाला वगळता २४ महिन्यांचा कालावधीत हे काम पूर्ण करणे अपेक्षित होते.पण पुढे कोविडचा आजार यांमुळे काम थांबले आणि पुढे २०२३ मध्ये याचा वाढवण्याचा प्रस्ताव सादर करून विविध करांसह २०९ कोटींवरून याचा खर्च २४० कोटी रुपये एवढा करण्यास मान्यता देण्यात आली. महापालिका पूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कामाला प्रत्यक्ष सुरुवात केल्यानंतर काही तांत्रिक अडचणी व अतिरिक्त कामांची गरज निर्माण झाली. त्यामुळे प्रशासकीय मंजुरी घेऊन कंत्राट रकमेत सुधारणा करण्यात आली असून कामाचा कालावधीही वाढवण्यात आला आहे. सध्या या प्रकल्पाचे सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. सुधारित कालावधीनुसार हे काम ३० एप्रिल २०२६ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.


मृणाल गोरे रेल्वे उड्डाणपुलाचा मुख्य पूल २०१६ मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. सध्या या पुलाच्या दोन्ही बाजूंना सुमारे ३९० मीटर लांबीचा ‘आर्म’ पूल उभारण्याचे काम सुरू आहे. यामुळे परिसरातील वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. तसेच पुलाच्या बांधकामासोबत पादचारी सुविधा, रंगकाम, सुरक्षा उपाययोजना आणि ध्वनिरोधक भिंती (नॉईज बॅरिअर) उभारण्याचाही प्रस्ताव आहे.या अतिरिक्त कामांमुळे प्रकल्पाच्या खर्चात वाढ झाली असून विविध करांसह हा खर्च एकूण २४८ कोटी रुपयांवर जाऊन पोहोचला आहे.


या प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर मृणालताई गोरे पुलाच्या मार्गातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

Bandra Encroachment Removal Campaign : वांद्रे स्थानकाबाहेर अतिक्रमण हटाव मोहीम; अनधिकृत मशिदीवर महापालिकेची कारवाई

मुंबई : मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेरील परिसरात आज सकाळी मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. या

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तेजस नेटवर्क्स आणि महाआयटीमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दूरसंचार तंत्रज्ञानाचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार मुंबई :

Virat Kohli : ९ वर्षांत कुणी विचारलंच नाही – तू कसा आहेस ? कसोटी कर्णधारपद सोडण्यावरून विराट कोहलीचा भावनिक खुलासा ..

बेंगळुरू : विराटने कसोटी कर्णधारपद सोडून आज ४ वर्षे उलटून गेली आहेत तरीही त्याच्या त्या निर्णयावर अजूनही बऱ्याच

Minister Nitesh Rane : राज्यातील जलवाहतूक सेवा होणार डिजिटल

 मंत्री नितेश राणे यांचे निर्देश; ऑनलाईन तिकीट व्यवस्थेची अंमलबजावणी करणार मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील