करूर चेंगराचेंगरी प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाचा १३ ऑक्टोबरला निर्णय

चेन्नई : करूर येथील चेंगराचेंगरीच्या घटनेच्या स्वतंत्र चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकांवर १३ ऑक्टोबर रोजी सुप्रीम कोर्ट आपला निर्णय जाहीर करणार आहे. या दुर्घटनेत ४१ जणांचा मृत्यू झाला होता. न्यायमूर्ती जे. के. माहेश्वरी आणि न्यायमूर्ती एन. व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठाने या याचिकांवर सुनावणी केली असून, निर्णय राखून ठेवला होता.


सर्वोच्च न्यायालयाने मद्रास उच्च न्यायालयाने या घटनेच्या चौकशीसाठी एसआयटी गठीत केल्यावर प्रश्न उपस्थित केला आणि आश्चर्य व्यक्त करत विचारले की, हायकोर्टाने या प्रकरणात पुढे कार्यवाही कशी केली? कोर्टाने म्हटलं,“आम्हाला समजत नाही की हे आदेश कसे पारित झाले. जेव्हा मदुराई खंडपीठ या प्रकरणावर विचार करत होतं, तेव्हा चेन्नईमधील एकल पीठाने या प्रकरणात हस्तक्षेप कसा केला?”


तामिळ अभिनेते विजय यांच्या “तमिळगा वेत्री कळगम” (टीव्हीके) या राजकीय पक्षातर्फे ज्येष्ठ वकील गोपाल सुब्रमण्यम यांनी युक्तिवाद सादर केला. त्यांनी सांगितले की, उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका ही केवळ राजकीय सभांसाठी मानक कार्यपद्धती तयार करण्यासाठी होती. पण त्यांनी यावर आक्षेप घेत सांगितले की, हायकोर्टाने पहिल्याच दिवशी एसआयटीची स्थापना केली, आणि न्यायालयाने पक्षाचा (टीव्हीके आणि विजय यांचा) बाजू ऐकून न घेता त्यांच्या विरोधात प्रतिकूल टिप्पण्या केल्या.

Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला