करूर चेंगराचेंगरी प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाचा १३ ऑक्टोबरला निर्णय

चेन्नई : करूर येथील चेंगराचेंगरीच्या घटनेच्या स्वतंत्र चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकांवर १३ ऑक्टोबर रोजी सुप्रीम कोर्ट आपला निर्णय जाहीर करणार आहे. या दुर्घटनेत ४१ जणांचा मृत्यू झाला होता. न्यायमूर्ती जे. के. माहेश्वरी आणि न्यायमूर्ती एन. व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठाने या याचिकांवर सुनावणी केली असून, निर्णय राखून ठेवला होता.


सर्वोच्च न्यायालयाने मद्रास उच्च न्यायालयाने या घटनेच्या चौकशीसाठी एसआयटी गठीत केल्यावर प्रश्न उपस्थित केला आणि आश्चर्य व्यक्त करत विचारले की, हायकोर्टाने या प्रकरणात पुढे कार्यवाही कशी केली? कोर्टाने म्हटलं,“आम्हाला समजत नाही की हे आदेश कसे पारित झाले. जेव्हा मदुराई खंडपीठ या प्रकरणावर विचार करत होतं, तेव्हा चेन्नईमधील एकल पीठाने या प्रकरणात हस्तक्षेप कसा केला?”


तामिळ अभिनेते विजय यांच्या “तमिळगा वेत्री कळगम” (टीव्हीके) या राजकीय पक्षातर्फे ज्येष्ठ वकील गोपाल सुब्रमण्यम यांनी युक्तिवाद सादर केला. त्यांनी सांगितले की, उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका ही केवळ राजकीय सभांसाठी मानक कार्यपद्धती तयार करण्यासाठी होती. पण त्यांनी यावर आक्षेप घेत सांगितले की, हायकोर्टाने पहिल्याच दिवशी एसआयटीची स्थापना केली, आणि न्यायालयाने पक्षाचा (टीव्हीके आणि विजय यांचा) बाजू ऐकून न घेता त्यांच्या विरोधात प्रतिकूल टिप्पण्या केल्या.

Comments
Add Comment

दिल्ली विमानतळावरुन एकाच फॉर्च्युनरमधून मोदी आणि पुतिन रवाना

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन गुरुवारी संध्याकाळी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले. नवी

Rasgulla Fight Cancels Bihar Wedding : रसगुल्ल्यामुळे झाला कुस्ती हल्ला! लग्नात दिसेल ते फेकून मारलं; नवरदेव-नवरीची गाठ पडण्याआधीच पाहुण्यांमध्ये 'डब्ल्यू डब्ल्यू इ'!

बिहार : लग्न समारंभ हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अत्यंत आनंदाचा आणि संस्मरणीय क्षण असतो. हा क्षण खास

भाडेकरूंना दिलासा! घरभाड्याबाबत नवा निर्णय लवकरच होणार लागू, केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली: वाढत्या महागाईमुळे घरांच्या किमतीमध्ये सुद्धा लक्षणीय वाढ झाली असल्याने देशातील लाखो लोक

Doctor Death News : युवा डॉक्टरांचे स्वप्न भंगले; भरधाव कारची ट्रकला धडक, वेगामुळे झालेल्या अपघातात चौघांचा दुर्दैवी अंत

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यामध्ये बुधवारी (३ डिसेंबर २०२५) रोजी एक हृदय पिळवटून टाकणारी आणि

८७ बेकायदेशीर 'लोन ॲप'वर कारवाई : केंद्र सरकारची लोकसभेत माहिती

नवी दिल्ली : डिजिटल फसवणुकीचे वाढते प्रमाण आणि अवैध ऑनलाइन कर्ज व्यवहारांच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक लूट

आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टी बांधकामात मशि‍दीचा अडथळा

कोलकाता: सर्वाधिक व्यस्त विमानतळांपैकी एक असणाऱ्या कोलकात्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ