Diwali 2025 : Elite Marque कंपनीने कर्मचाऱ्यांना दिली सलग ९ दिवसांची सुट्टी !

दिवाळीत ईमेल बंद ठेवा, मिठाई खा आणि निवांत झोपा – सीईओ रजत ग्रोवर यांचा सल्ला


नवी दिल्ली : दिवाळीच्या सणाला बहुतेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना २ - ३ दिवस सुट्टी देतात, पण Elite Marque या पब्लिक रिलेशन कंपनीने यंदा कर्मचाऱ्यांसाठी एक खास भेट दिली आहे. कंपनीने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना सलग ९ दिवसांची सुट्टी देण्याची घोषणा केली आहे, जी अनेकांना आश्चर्यचकित करणारी आणि आनंददायी ठरली आहे.


कंपनीचे संस्थापक आणि सीईओ रजत ग्रोवर यांनी सर्व कर्मचाऱ्यांना एक खास ईमेल पाठवला आहे. त्या ईमेलमध्ये त्यांनी लिहिले आहे, “या दिवाळीत ईमेल बंद ठेवा, रात्र हसत-खेळत वेळ घालवा, मिठाई खा आणि आरामात झोपा ” तसेच त्यांनी सुट्टीच्या काळात कोणताही ऑफिस ईमेल किंवा वर्क चॅट उघडण्यास मनाई केला आहे, म्हणजे कर्मचाऱ्यांना पूर्णवेळ विश्रांती आणि कौटुंबिक वेळ मिळावा.


आजच्या कॉर्पोरेट युगात, जिथे अनेक कंपन्या वर्क फ्रॉम होम पॉलिसी कमी करत आहेत आणि कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये परत येण्याचे कडक नियम लागू करत आहेत, अशा काळात Elite Marque चा हा निर्णय कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने खूप सकारात्मक आणि प्रेरणादायी मानला जात आहे.


कंपनीत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने LinkedIn वर लिहिले की, “सगळेच वर्क कल्चरवर बोलतात, पण खरं वर्क कल्चर तेच जेथे कंपनी कर्मचाऱ्यांच्या आरोग्य आणि आनंदाला प्राधान्य देते. Elite Marque ने आम्हाला आमच्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करण्याची संधी दिली, ही खरी दिवाळीची भेट आहे.”


सीईओ रजत ग्रोवर यांनी आपल्या संदेशात कर्मचार्‍यांना मानसिक आणि शारीरिक दोन्ही दृष्टिकोनातून विश्रांती घेण्याचे आवाहन केले आहे, ज्यामुळे ते सुट्टीनंतर ताज्या ऊर्जा आणि नवी प्रेरणा घेऊन कामाला परत येतील.


Elite Marque चा हा निर्णय इतर कंपन्यांसाठी एक उदाहरण ठरू शकतो की, वर्क-लाइफ बॅलन्स राखणं आणि कर्मचारी कल्याणाला महत्त्व देणं यामध्ये किती फरक पडतो.

Comments
Add Comment

भारताचे आतापर्यंतचे सर्वात मोठे संरक्षण बजेट

नवी दिल्ली : यंदाच्या बजेटमध्ये संरक्षण विभागासाठी ७.८ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. संरक्षणासाठी

भूतान, नेपाळ, श्रीलंका याविश्वासू मित्रांसाठी मदतीचा हात, संबंधातील कडवटपणामुळे बांगलादेशला आर्थिक झटका

नवी दिल्ली  : केंद्रातील मोदी सरकारने २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना आपल्या परराष्ट्र धोरणाचे

इतर देशांच्या तुलनेत किती मोठे आहे देशाचे संरक्षण बजेट

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत बजेट सादर केले. यंदाच्या बजेटमध्ये भारताच्या

Budget 2026 : ‘विकसित भारताच्या दिशेने दमदार पाऊल’; केंद्रीय अर्थसंकल्पावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

मुंबई : देशाचा २०२६-२७ चा केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2026 ) सादर झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र

Budget 2026 : मच्छिमारांसाठी आनंदाची बातमी! खुल्या समुद्रातील मासेमारी आता 'करमुक्त'; निर्यातीला मिळणार मोठी गती

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात देशातील ग्रामीण

Budget 2026 : कोकणचा काजू-नारळ सातासमुद्रापार जाणार! अर्थमंत्र्यांचा 'हाय-व्हॅल्यू' शेतीवर भर; कोकणकर होणार मालामाल

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यांनी १ फेब्रुवारी २०२६ रोजी सादर केलेल्या ऐतिहासिक नवव्या