गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन मोबदला प्रक्रियेत सावळागोंधळ

चिपळूण : गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या जमिनी, विहिरी व बांधकामे ताब्यात घेण्यात आली होती. दीर्घकाळ प्रलंबित असलेला मोबदला अखेर पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्तक्षेपानंतर मार्गी लागला. मंत्रालयात झालेल्या विशेष बैठकीनंतर संबंधित शेतकऱ्यांना मोबदला देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तलाठी कार्यालयामार्फत शेतकऱ्यांकडून बँक तपशील, छायाचित्रे व आवश्यक कागदपत्रे घेतली जात असून, मोबदला थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. यामुळे अनेक वर्षे प्रलंबित असलेला प्रश्न सुटणार असल्याची अपेक्षा आहे. मात्र, या प्रक्रियेत मोठा घोळ निर्माण झाला आहे.


सन २००० पासून प्रलंबित रक्कम, शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला व्याजासह दिला जात आहे, परंतु त्याचवेळी जमीन ताब्यात घेताना अस्तित्वात असलेली घरे, शेड किंवा इतर आस्थापना यांच्या मोबदल्यावर व्याजाचा लाभ देण्यात आलेला नाही. त्यामुळे शेतकरी नाराज आहेत. अनेक शेतकऱ्यांनी सामायिक जमिनीत स्वतःच्या खर्चाने घरे उभारली होती. या घरांचा मोबदला मूळ मालकास न देता सामायिक हिस्सेदारांमध्ये विभागणी केली जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.


“घर ज्याने बांधले, तर तुटलेल्या घराचा मोबदला त्यालाच मिळाला पाहिजे,” अशी मागणी जोर धरू लागली आहे. स्थानिक शेतकऱ्यांचा आरोप आहे की, उतारे आणि असेसमेंट रेकॉर्डच्या आधारे घराची खरी मालकी ठरवून मोबदला दिला पाहिजे होता. पण त्याकडे दुर्लक्ष झाल्याने अनेक ठिकाणी अनागोंदी कारभार झाला आहे. भूसंपादन प्रक्रियेत निर्माण झालेल्या या सावळ्या गोंधळामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. “हरकती नोंदवण्यासाठी सरकारने मुदत वाढवावी आणि घरे आस्थापनांच्या मोबदल्यावर व्याजासकट रक्कम द्यावी,” अशी मागणीही शेतकरी संघटनांकडून होत आहे.

Comments
Add Comment

संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार; पहिल्या टप्प्यातील संकल्पचित्राचे सादरीकरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक

जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठी आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून मोठ्या प्रमाणात काजू निर्यात व्हावी यासाठी संबधित विभागांनी

Narayan Rane : 'कोण आदित्य ठाकरे?' "बाळासाहेबांनंतर शिवसेना राहिली नाही! नारायण राणेंचा उद्धव गटावर हल्लाबोल

चिपळूण : भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज चिपळूण दौऱ्यादरम्यान शिउबाठा नेतृत्वावर अत्यंत कडक शब्दांत टीका

साळीस्ते खून प्रकरणात नवा ट्विस्ट! मृतदेह डॉक्टर पेशातील व्यक्तीचा असल्याची चर्चा ?

कणकवली: साळीस्ते येथे गुरुवारी दुपारी १२:३० एका पुरुषाचा मृतदेह काहीसा कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ माजली

Rain Alert : दिवाळीच्या उत्साहात पावसाचं विघ्न? मुंबई-कोकण किनारपट्टीवरील हवामान बदलणार, कसा असेल अंदाज?

मुंबई : महाराष्ट्रासह देशातील बहुतांश राज्यांतून मान्सूनने आता माघार घेतली असली तरीही, अनेक ठिकाणी अद्याप

दिवाळीच्या सुट्टीत मुंबई-गोवा महामार्ग ठप्प! प्रवाशांचा खोळंबा; 'खड्ड्यांतील प्रवास कधी थांबणार?'

मुंबई/महाड: दिवाळीच्या सुट्ट्या तोंडावर आल्या असतानाच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर (NH-66) आज, १७ ऑक्टोबर रोजी