गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन मोबदला प्रक्रियेत सावळागोंधळ

चिपळूण : गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या जमिनी, विहिरी व बांधकामे ताब्यात घेण्यात आली होती. दीर्घकाळ प्रलंबित असलेला मोबदला अखेर पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्तक्षेपानंतर मार्गी लागला. मंत्रालयात झालेल्या विशेष बैठकीनंतर संबंधित शेतकऱ्यांना मोबदला देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तलाठी कार्यालयामार्फत शेतकऱ्यांकडून बँक तपशील, छायाचित्रे व आवश्यक कागदपत्रे घेतली जात असून, मोबदला थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. यामुळे अनेक वर्षे प्रलंबित असलेला प्रश्न सुटणार असल्याची अपेक्षा आहे. मात्र, या प्रक्रियेत मोठा घोळ निर्माण झाला आहे.


सन २००० पासून प्रलंबित रक्कम, शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला व्याजासह दिला जात आहे, परंतु त्याचवेळी जमीन ताब्यात घेताना अस्तित्वात असलेली घरे, शेड किंवा इतर आस्थापना यांच्या मोबदल्यावर व्याजाचा लाभ देण्यात आलेला नाही. त्यामुळे शेतकरी नाराज आहेत. अनेक शेतकऱ्यांनी सामायिक जमिनीत स्वतःच्या खर्चाने घरे उभारली होती. या घरांचा मोबदला मूळ मालकास न देता सामायिक हिस्सेदारांमध्ये विभागणी केली जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.


“घर ज्याने बांधले, तर तुटलेल्या घराचा मोबदला त्यालाच मिळाला पाहिजे,” अशी मागणी जोर धरू लागली आहे. स्थानिक शेतकऱ्यांचा आरोप आहे की, उतारे आणि असेसमेंट रेकॉर्डच्या आधारे घराची खरी मालकी ठरवून मोबदला दिला पाहिजे होता. पण त्याकडे दुर्लक्ष झाल्याने अनेक ठिकाणी अनागोंदी कारभार झाला आहे. भूसंपादन प्रक्रियेत निर्माण झालेल्या या सावळ्या गोंधळामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. “हरकती नोंदवण्यासाठी सरकारने मुदत वाढवावी आणि घरे आस्थापनांच्या मोबदल्यावर व्याजासकट रक्कम द्यावी,” अशी मागणीही शेतकरी संघटनांकडून होत आहे.

Comments
Add Comment

Shaktipeeth Mahamarg : शक्तीपीठ महामार्गाचा नवा मार्ग निश्चित; कोकणातील 'या' ९ गावांतून सुसाट धावणार गाड्या!

मुंबई : राज्यातील प्रस्तावित 'शक्तीपीठ महामार्गा'बाबत (शेतकऱ्यांनी दर्शवलेला तीव्र विरोध लक्षात घेता, राज्य

Ratnagiri : संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे मंदिरात आकर्षक फुलांची सजावट; भाविकांची मोठी गर्दी

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात संकष्टी चतुर्थी निमित्त अत्यंत देखणी आणि मनमोहक

मुंबई-विजयदुर्ग 'रोरो' सेवेचा आजपासून श्रीगणेशा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई: कोकणची लाल माती आणि अथांग अरबी समुद्र यांचे नाते आता अधिक घट्ट होणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून ज्या

Narayan Rane : "आमच्यात कटुता असली तरी जिव्हाळा कायम!" भास्कर जाधवांनी व्यक्त केली राणे साहेबांबद्दलची कृतज्ञता;

'त्या' घटनेनंतर जुन्या आठवणींना उजाळा चिपळूण : राजकारणात एकमेकांवर तुटून पडणारे नेते, वैयक्तिक आयुष्यात

फोंडाघाटचा ‘किऱ्याचा आंबा’ होणार जमीनदोस्त

कणकवली : फोंडाघाट, हवेलीनगर येथील शेकडो वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक अधिष्ठान आणि मार्गदर्शक आख्यायिका, तसेच

कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

उद्यापर्यंत ब्लॉक रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले असून पुढील