प्रायोगिक तत्वावर बदलापूर-अक्कलकोट बससेवा

बदलापूर  : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बदलापूर ते अक्कलकोट दरम्यान थेट बससेवा सुरु केली आहे. परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांच्या उपस्थितीत शुक्रवार ते रविवारपर्यंत प्रायोगिक तत्वावर ही बससेवा स्वामी भक्तांच्या सेवेसाठी सुरु करण्यात आली आहे. या तीन दिवसांत प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यास सेवा पुढेही सुरु ठेवता येईल असे सांगण्यात आले आहे.


बदलापूर आणि परिसरातून स्वामी समर्थ महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने जातात. बदलापूरवरून थेट सेवा नसल्याने तसेच रेल्वे आरक्षण बहुतेकवेळा मिळत नसल्याने बहुतांश ज्येष्ठ नागरिक , महिला व लहान मुलांना अडचणी येत होत्या मात्र सध्या तरी ही अडचण दूर झाल्याने स्वामी भक्तानी आनंद व्यक्त केला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने 'आवडेल तेथे प्रवास' ही सवलत योजना सुरु असून बदलापूर बस स्थानकातसुध्दा ही सेवा राबविली जात आहे.

Comments
Add Comment

भिवंडीत शनिवारी २४ तास पाणीपुरवठा बंद

भिवंडी (वार्ताहर) : जुनी भिवंडीला पाणीपुरवठा करणारी मानसरोवर येथील मेन लाईन शिफ्टींगचे काम हाती घेण्यात येणार

बदली आदेशानंतरही ठामपाचे १७० कर्मचारी त्याच विभागात

ठाणे (प्रतिनिधी) : ठाणे महापालिकेचा अनागोंदी कारभार वारंवार उघड होत आहे. ठामपाच्या अतिक्रमण विभागातील १७०

ठाणे-घोडबंदरच्या वाहतूक कोंडीवर मराठी अभिनेत्याची मिश्कील पोस्ट

ठाणे - मुंबई आणि उपनगरांमध्ये माणसांप्रमाणेच वाहनांमध्येही वाढ होत आहे. तसेच शहरांमध्ये सुरू असलेल्या

आजपासून ९ ऑक्टोबरपर्यंत ठाण्यात १० टक्के पाणीकपात

पाण्याचा काटकसरीने वापर करा : ठामपाचे आवाहन ठाणे (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेतर्फे पिसे, पांजरापूर येथील

ठाणे, नवी मुंबई, रायगडमधील कोळी बांधवांचे आर्थिक गणित कोलमडले

ठाणे (प्रतिनिधी) : यंदा पावसाळी मासेमारीबंदी संपुष्टात आल्यानंतर १ ऑगस्टपासून सुरू झालेल्या मासेमारीच्या नव्या

डिझाइन इंजिनीअर बनली मेट्रो पायलट

मुरबाड (वार्ताहर) : मेट्रो रेल्वेने दळणवळणाचा चेहरामोहरा बदलला आहे आणि या आधुनिक प्रवासाचे नेतृत्व आता एका