प्रायोगिक तत्वावर बदलापूर-अक्कलकोट बससेवा

बदलापूर  : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बदलापूर ते अक्कलकोट दरम्यान थेट बससेवा सुरु केली आहे. परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांच्या उपस्थितीत शुक्रवार ते रविवारपर्यंत प्रायोगिक तत्वावर ही बससेवा स्वामी भक्तांच्या सेवेसाठी सुरु करण्यात आली आहे. या तीन दिवसांत प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यास सेवा पुढेही सुरु ठेवता येईल असे सांगण्यात आले आहे.


बदलापूर आणि परिसरातून स्वामी समर्थ महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने जातात. बदलापूरवरून थेट सेवा नसल्याने तसेच रेल्वे आरक्षण बहुतेकवेळा मिळत नसल्याने बहुतांश ज्येष्ठ नागरिक , महिला व लहान मुलांना अडचणी येत होत्या मात्र सध्या तरी ही अडचण दूर झाल्याने स्वामी भक्तानी आनंद व्यक्त केला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने 'आवडेल तेथे प्रवास' ही सवलत योजना सुरु असून बदलापूर बस स्थानकातसुध्दा ही सेवा राबविली जात आहे.

Comments
Add Comment

भिवंडीत श्वानदंश झालेल्या मुलाचा मृत्यू

भिवंडी : श्वानदंश झालेल्या १२ वर्षीय हमीद खान याचा उपचारादरम्यान मृत्यूची घटना भिवंडीत घडली आहे. १० जानेवारीला

ठाण्यातील भव्य त्रिमंदिर भाविकांसाठी खुले; तीन दिवसांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर दर्शनास सुरुवात

ठाणे : ठाणे शहरात उभारण्यात आलेले भव्य त्रिमंदिर अखेर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. तीन दिवस चाललेल्या

ठाणे-घोडबंदर रोडचे रुंदीकरण होणार?

मीरा-भाईंदर (वार्ताहर): ठाणे-घोडबंदर रस्ता ६० मीटर रुंद करण्यासाठी आवश्यक असणारी भूसंपादनाची प्रक्रिया

कोयना प्रकल्पग्रस्त सुविधांपासून वंचित

ठाणे ( प्रतिनिधी): साडेसहा दशकांपूर्वी सातारा जिल्ह्यातील कोयना धरण प्रकल्पात बाधित झालेल्या सुमारे ८०हून अधिक

ठाणे शहरात उभारणार १९ ई-वाहन चार्जिंग स्टेशन्स

ठाणे (प्रतिनिधी) : महापालिका क्षेत्रातील इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शहरात ई-वाहन वापराला

सायबर दृष्टी सेलचा डिजिटल साक्षरता प्रवास

कल्याण (प्रतिनिधी) : बी. के. बिर्ला नाईट कॉलेज, कल्याण येथील सायबर दृष्टी सेल यांच्या विद्यमाने नागरिकांमध्ये