प्रायोगिक तत्वावर बदलापूर-अक्कलकोट बससेवा

बदलापूर  : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बदलापूर ते अक्कलकोट दरम्यान थेट बससेवा सुरु केली आहे. परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांच्या उपस्थितीत शुक्रवार ते रविवारपर्यंत प्रायोगिक तत्वावर ही बससेवा स्वामी भक्तांच्या सेवेसाठी सुरु करण्यात आली आहे. या तीन दिवसांत प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यास सेवा पुढेही सुरु ठेवता येईल असे सांगण्यात आले आहे.


बदलापूर आणि परिसरातून स्वामी समर्थ महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने जातात. बदलापूरवरून थेट सेवा नसल्याने तसेच रेल्वे आरक्षण बहुतेकवेळा मिळत नसल्याने बहुतांश ज्येष्ठ नागरिक , महिला व लहान मुलांना अडचणी येत होत्या मात्र सध्या तरी ही अडचण दूर झाल्याने स्वामी भक्तानी आनंद व्यक्त केला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने 'आवडेल तेथे प्रवास' ही सवलत योजना सुरु असून बदलापूर बस स्थानकातसुध्दा ही सेवा राबविली जात आहे.

Comments
Add Comment

कल्याणमधील रिंगरोड प्रकल्प लवकर होणार पूर्ण! आयुक्तांचे आश्वासन

कल्याण: शहरातील वाहतूककोंडीवर पर्याय म्हणून कल्याणमध्ये रिंगरोड तयार करण्यात येत आहे. या प्रस्तावित रिंगरोडचे

फ्रॅक्चर होऊनही जिद्द कायम!

राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पटकावला १५ वा क्रमांक मुरबाड  : अपयश आणि संघर्षाने खचून न जाता, प्रत्येक

बदलापूरमध्ये १२ व्या मजल्यावरून पडून कामगाराचा दुर्दैवी अंत

ट्रायडेंट एव्हलॉन प्रकल्पात घडली भीषण दुर्घटना; ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे ५२ वर्षीय रामप्रकाश मोलहू यांचा

थंडीत डोळ्यांची काळजी घ्या...

ठाणे : थंडी वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून या काळात शरीरासोबतच डोळ्यांचीही विशेष काळजी घेणे

ठाण्यातील निवासी डॉक्टरांचा संप सुरूच!

ओपीडी, वॉर्ड सेवा, निवडक शस्त्रक्रिया आणि शैक्षणिक उपक्रम बंद ठाणे  : साताऱ्यातील डॉ. संपदा मुंडे प्रकरणी

कल्याण रेल्वे स्टेशनवरून ८ महिन्यांच्या बाळाचे अपहरण

मुंबई : कल्याण रेल्वे स्थानकावर काळ धक्कादायक घटना घडली. स्टेशनवर झोपले असताना एका दाम्पत्याच्या ८ महिन्याच्या