कर्नाटक सरकारचा ऐतिहासिक निर्णय! महिला कर्मचाऱ्यांना मिळणार मासिक पाळीची भरपगारी सुट्टी

बेंगळुरू : महिलांच्या आरोग्याचा व कामाच्या ठिकाणी त्यांच्या सुसंवादाचा विचार करत कर्नाटक सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व महिला कर्मचाऱ्यांना आता मासिक पाळीच्या काळात दरमहा एक दिवसाची भरपगारी सुट्टी मिळणार आहे. या निर्णयामुळे कर्नाटक हे संपूर्ण भारतातील पहिले असे राज्य ठरले आहे,जिथे सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही क्षेत्रांतील महिलांना मासिक पाळीची सुट्टी देण्यात आली आहे. महिलांना मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक त्रासाचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. कार्यालयीन कामकाजात सतत व्यस्त असणाऱ्या महिलांसाठी ही योजना मोठा दिलासा ठरणार आहे. या नव्या धोरणानुसार वर्षभरात महिलांना एकूण १२ भरपगारी सुट्ट्या मिळतील.


कर्नाटकचे राज्यमंत्री संतोष लाड यांनी या निर्णयाची घोषणा करताना सांगितले की, “महिलांच्या आरोग्याशी संबंधित गरजांकडे संवेदनशीलतेने पाहण्याची ही वेळ आहे. महिलांसाठी सुसह्य व आदरयुक्त कामाचे वातावरण निर्माण करणे हे सरकारचे कर्तव्य आहे.” या धोरणाचा लाभ केवळ सरकारी कर्मचाऱ्यांनाच नव्हे, तर कारखाने, आयटी कंपन्या, बहुराष्ट्रीय कंपन्या, आणि इतर खाजगी क्षेत्रांतील महिला कर्मचाऱ्यांनाही मिळणार आहे. त्यामुळे या निर्णयाचे स्वरूप सर्वसमावेशक ठरले आहे. यापूर्वी भारतातील काही राज्यांमध्ये मासिक पाळीच्या सुट्टीचे धोरण अस्तित्वात आहे, मात्र ती मर्यादित प्रमाणात आहे:




  • बिहारमध्ये १९९२ पासून महिला सरकारी कर्मचाऱ्यांना दरमहा दोन दिवसांची सुट्टी मिळते.

  • केरळमध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) मध्ये शिकणाऱ्या सर्व महिला विद्यार्थिनींना दरमहा दोन दिवसांची रजा मिळते.

  • ओडिशामध्ये महिला सरकारी कर्मचाऱ्यांना दरमहा एक दिवसाची पगारी रजा दिली जाते.

  • मात्र कर्नाटक सरकारचा निर्णय या सर्वांपेक्षा व्यापक असून, तो सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील सर्व महिलांना समान लाभ देणारा आहे.


या उपक्रमामुळे महिला कर्मचाऱ्यांच्या आरोग्याबरोबरच त्यांच्या कामकाजातील कार्यक्षमता आणि समाधान वाढण्यास मदत होईल, असा तज्ञांचा अंदाज आहे. समाजातील महिला सक्षमीकरणाच्या दिशेने हे धोरण एक प्रेरणादायी आणि कौतुकास्पद पाऊल ठरत आहे.


Comments
Add Comment

पहलगाम अतिरेकी हल्ला, एनआयएने ५८ मार्ग आणि शेकडो किमी. जंगलात तपास करुन दाखल केले आरोपपत्र

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सात जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले.

मणिपूरमध्ये १४ दहशतवाद्यांना अटक, मोठा शस्त्रसाठा जप्त

इंफाळ : भारतीय लष्कर, आसाम रायफल्स आणि मणिपूर पोलीस यांनी डोंगराळ भागात संयुक्त कारवाई केली. या कारवाईत सुरक्षा

मोदी सरकार १२५ दिवसांची रोजगार गॅरेंटी देणारी योजना आणणार

दिल्ली : केंद्र सरकार मनरेगाच्या जागी नवीन रोजगार योजना आणण्याच्या तयारीत आहे. नरेंद्र मोदी सरकार महात्मा गांधी

देवाला एक मिनीटही विश्रांती घेऊ देत नाहीत...

'पैसेवाल्यांसाठी देवतेला जास्त त्रास' वृंदावनच्या बांके बिहारी मंदिर व्यवस्थापनावर सर्वोच्च न्यायालयाचा

पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सात जणांविरोधात आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सात जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले.

मिरा भाईंदर वसई विरार पोलिसांची कारवाई, उत्तर प्रदेशमधून गुंड सुभाष सिंह ठाकूरला अटक

फतेहगढ : विरारमधील चाळ बिल्डर समय चौहान याच्या हत्या प्रकरणात मिरा भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे