‘गोदावरी’तील समावेश कलाटणी देणारा

टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल


गौरी नलावडे या अभिनेत्रीचा ‘वडा पाव’ हा चित्रपट रिलीज झाला आहे. गौरीचे शालेय शिक्षण नवी मुंबईच्या भारती विद्यापीठ स्कूलमध्ये झाले तसेच तिचे कॉलेजचे शिक्षण देखील त्याच भारती विद्यापीठामध्येच झाले. शालेय जीवनामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये तिने भाग घेतला होता. तिने फार्मसी केले. त्या वेळेला तिला कला शाखेत प्रवेश घ्यायचा होता, परंतु घरच्यांच्या सांगण्यावरून तिने विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतला. तिने आईला सांगितले होते की, तिला अभिनयाच्या क्षेत्रात जायचे आहे. फार्मसीच्या शेवटच्या वर्षी असताना तिने ऑडिशन द्यायला सुरुवात केली. कॉलेजच्या दरम्यान तिच्या एका मैत्रिणीच्या डान्स शोला ती गेली होती. त्यावेळी झी वाहिनीने तिला एका जाहिरातीसाठी विचारले. त्यानंतर तिला ‘अवघाची संसार’ या मालिकेमध्ये काम करण्यास मिळाले, तर स्टार प्रवाह वाहिनीवर ‘स्वप्नांच्या पलीकडले’ ही मालिका तिला मिळाली. या मालिकेमध्ये वैदेही नावाची व्यक्तिरेखा तिने साकारली होती. ती श्रीमंत घराण्यातून आलेली असते.


तिचे एका गरीब मुलाशी प्रेम होते. शेवटी त्यांच लग्न होतं. लग्नानंतर त्याचं आयुष्य कसं असतं हे सारं त्या मालिकेमध्ये पहायला मिळाले. ती एक लव स्टोरी होती, वैदेहीला काही वाईट वाटले, श्रेयसला काही वाईट वाटले, तर प्रेक्षकांना देखील वाईट वाटायचे. त्यामुळे प्रेक्षकांचा त्या मालिकेला भरपूर प्रतिसाद मिळाला. आज देखील लोक तिला वैदू या नावाने हाक मारतात. तिला प्रेक्षकांचं मिळालेलं प्रेम आज देखील आठवत आहे. एक ८० वर्षांची आजारी आजीबाई तिला भेटायला लांबून सेटवर आल्या होत्या, तिला पाहताच त्या म्हणाल्या, “वैदू तू मला खूप आवडतेस” असे सांगून त्यांनी तिचे लाड केले. त्यानंतर तिने चंद्रकांत कुलकर्णीचा फॅमिली कट्टा चित्रपट केला. त्यानंतर कान्हा, फ्रेंड, अधम हे चित्रपट तिने केले. त्यानंतर तिने गोदावरी हा चित्रपट केला. दिग्दर्शक निखिल महाजनांच्या गोदावरी चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेला आहे. हा चित्रपट तिच्या जीवनातील टर्निंग पॉइंट ठरला.


त्यानंतर तिला वडापाव चित्रपट मिळाला. अभिनेता व दिग्दर्शक प्रसाद ओकचा हा शंभरावा चित्रपट आहे. त्याचा एकदा गौरीला फोन आला होता की, मी एक वडापाव नावाचा चित्रपट करीत आहे आणि त्यामध्ये एक आव्हानात्मक भूमिका आहे, यापूर्वी अशा प्रकारची भूमिका तू केली नसल्याने, ती भूमिका करायला तुला आवडेल का? गौरीला प्रसाद सोबत काम करायचे होते, त्यामुळे तिने लगेच होकार दिला.
या चित्रपटातील तुझ्या भूमिकेविषयी तू काय सांगशील, असे विचारले असता ती म्हणाली की, यामध्ये मी गौरी नावाची व्यक्तिरेखा साकारीत आहे. जी नवीन जनरेशनचे नेतृत्व करीत आहे आणि तिचा प्रेमावर पूर्ण विश्वास आहे. आजच्या काळातील ती मुलगी आहे आणि प्रेमासाठी वाटेल ते करायची तिची तयारी आहे.


या चित्रपटाचे लंडनमध्ये शूटिंग झाले. तिथे कमी वेळेत, जास्त काम करावयाचे होते, दिग्दर्शक प्रसाद ओकने शूटिंगचे चांगले नियोजन केल्यामुळे चित्रपट चांगला तयार झाला आहे. तिथले वातावरण खूप चांगले असल्यामुळे, सगळ्यांन काम करण्यात फ्रेशनेस जाणवला. या चित्रपटामध्ये सोनू निगमने एक गाणे गायले आहे. बेला शेंडे, सावनी रवींद्र यांनी देखील गाणी गायली आहेत. कुणाल करण यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे.


मराठी चित्रपटाला थिएटर मिळत नाही याविषयी तुला काय वाटतं असे विचारल्यावर ती म्हणाली की, या चित्रपटाचे निर्माते अमेय खोपकर यांनी म्हटल्याप्रमाणे निर्मात्यांनी चित्रपट रिलीज करण्याच्या अगोदर आपसामध्ये चर्चा कराव्यात. दोन मराठी चित्रपट एकाच वेळी रिलीज करू नये. त्यामुळे सर्व मराठी चित्रपटांना थिएटर मिळतील.

Comments
Add Comment

Entertainment : मनोरंजन विश्वात ऐन उन्हाळ्यात गारवा...

सध्या उष्णतेच्या लाटेमुळे सर्वत्र होरपळ सुरू असताना, मनोरंजनाच्या माध्यमातून चार घटका करमणूक करणाऱ्या

Vaishnavi Kalyankar : वैष्णवीची पुढील चाल ‘घबाडकुंड’ !

घबाडकुंड’ हा रहस्यमय चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये एका महत्त्वपूर्ण

Case Study : बदल घडवणारी केस स्टडी ‘पुढच्या शुक्रवारी ७ वाजता’ !

आम्हां जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या मुलांना व्यसनाधिनता म्हणजे काय? हे वेगळे सांगण्याची गरज नाही. ऐंशीच्या दशकात

पुस्तकांनी असे घडवले

स्मृतीगंध : लता गुठे नुकताच पुस्तक दिन सर्वांनी साजरा केला. १९७२ ची गोष्ट. मी बालवाडीत जात होते. त्यावेळी

'देऊळ' पुन्हा उघडतंय...

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत सतत काही ना काही घडत असते आणि त्यायोगे हे क्षेत्र कायम 'समथिंग हॅपनिंग' या पद्धतीत

इथे सगळेच रंगकर्मी...

राजरंग : राज चिंचणकर ट्यगृहात सर्वसाधारणतः रंगमंच आणि प्रेक्षागृह, असे दोन भाग असतात. रंगमंचावर रंगकर्मी नाटक