खामला निबंधक कार्यालयात भ्रष्टाचाराचा पर्दाफाश, महसूलमंत्र्यांच्या धाडीनंतर अधिकारी निलंबित

नागपूर : राज्यातील नोंदणी कार्यालयांमधील भ्रष्टाचाराच्या तक्रारी अनेक वेळा समोर आल्या आहेत. नागपूरच्या खामला परिसरातील दुय्यम निबंधक कार्यालयातही अशाच प्रकारच्या तक्रारी सातत्याने येत होत्या. या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतः अचानक या कार्यालयावर धाड टाकत कार्यप्रणालीची पाहणी केली. या धाडीत, एका अधिकाऱ्याच्या टेबलच्या ड्रॉवरमध्ये पाच हजार रुपयांची रोकड सापडली. विशेष म्हणजे, ही कारवाई पत्रकार आणि कॅमेऱ्यांच्या उपस्थितीत झाली, त्यामुळे संपूर्ण प्रकार जनतेसमोर उघड झाला. ही कारवाई महसूल विभागातील पारदर्शकता राखण्यासाठी आणि भ्रष्टाचाराविरोधात कठोर पावले उचलण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरली आहे.


नागरिकांकडून या कार्यालयाबाबत भ्रष्टाचाराच्या तक्रारी वारंवार येत होत्या. या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष भेट देण्याचा निर्णय घेतला, असे महसूलमंत्र्यांच्यावतीने सांगण्यात आले. धाडीनंतर त्वरित पोलिस चौकशीचे आदेश देण्यात आले आणि दोषींवर कारवाईचा इशारा दिला.


या प्रकरणात आता सह दुय्यम निबंधक अ. तु. कपाले यांना निलंबित करण्यात आले आहे. सरकारने भ्रष्टाचाराविरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे. कोणीही लाच मागितल्यास, त्याची भीती न बाळगता तक्रार करावी. पारदर्शक आणि जनहितकारी प्रशासन हेच आमचे उद्दिष्ट आहे. राज्यातील महसूल विभाग अधिक उत्तरदायी आणि नागरिकांसाठी अधिक सोयीस्कर व्हावा यासाठी, आगामी काही दिवसांत सर्व उपनिबंधक कार्यालयांमध्ये विशेष तपास मोहीम राबविण्यात येणार असल्याचे संकेत बावनकुळे यांनी दिले आहेत.

Comments
Add Comment

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार

Rajya Sabha Election 2026: राज्यसभा निवडणुकीचा अर्ज भरायला फक्त सहा दिवस उरले, शरद पवार राज्यसभा लढवणार की नाही?

मुंबई: येत्या १६ मार्चला राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ३७ जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील