या वर्षीही हापूसची चव उशिराच; आंबा बागायतदार चिंतेत !

लांबलेल्या पावसाचा कोकणातील आंबा उत्पादनावर परिणाम


रत्नागिरी (वार्ताहर) : यंदा पावसाने मुक्काम वाढविला आहे. या लांबलेल्या पावसाचा परिणाम कोकणातील आंबा उत्पादनावर होण्याची शक्यता आहे. दरवर्षी जानेवारी महिन्यात हापूसची पहिली पेटी बाजारात येते. मात्र यावर्षी फेब्रुवारी-मार्चपर्यंत हापूसची प्रतीक्षा करावी लागेल, असे आंबा उत्पादकांकडून सांगण्यात येत आहे. या वर्षीही आंबा पिकावर हवामानाचा परिणाम होण्याची शक्यता असून आंबा उत्पादकांसाठी ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे यावर्षी खवय्यांना हापूस आंब्याची चव उशिराच चाखायला मिळणार आहे.


आंबा हे कोकणातील प्रमुख पारंपरिक बागायती पीक आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आंब्याची मोठ्या प्रमाणात लागवड आहे. आंबा उत्पादनात हापूस आंब्याला विशेष महत्त्व आहे. आंबा पिकाची हेक्टरी उत्पादकता २.५० मेट्रिक टन आहे. कोकणातील खास करून रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हापूस हा जगप्रसिद्ध आहे.


सुमारे २५ हजार मेट्रिक टन हापूस निर्यात होतो. दरवर्षी युरोपियन देशांसह दुबई, सिंगापूर आणि मध्य आशियातील इतर देशांमध्येही हापूस आंब्याची निर्यात होते. पणन मंडळाच्या सुविधांचा वापर करून अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान, न्यूझीलंड, मलेशिया इ. देशांमध्ये आंबा निर्यात होतो. कोकणातील आंबा उत्पादनाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर गेल्या काही वर्षात महत्त्व वाढले आहे. मात्र हाच हापूस आंबा सातत्याने हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीचा सामना करीत आहे.


त्यामुळे अवेळी पाऊस, वाढते तापमान याचा परिणाम उत्पादनावर होत आहे. हवामानातील बदलांचा परिणाम आंब्याच्या उत्पादनावर आणि गुणवत्तेवरही होत आहे. आंब्याला फुले, फळे येण्यासाठी आणि निरोगी फळांमध्ये परिपक्वता येण्यासाठी विशिष्ट हवामान परिस्थितीची आवश्यकता असते. मात्र सातत्याने हवामान बदलामुळे यंदा हापूसचे पीक धोक्यात आले आहे.

Comments
Add Comment

माणगावकरांची वाहतूक कोंडीतून सुटका

माणगाव-इंदापूर बायपासचे काम सुरू माणगाव (वार्ताहर): मुंबई-गोवा महामार्ग गेली अनेक वर्ष रखडला आहे. या रखडलेल्या

सिंधुदुर्ग -शिरोडा वेळागर समुद्रात नऊ पर्यटक बुडाले

तिघांचे मृतदेह हाती लागले असून, अन्य एकाचा शोध सुरू आहे शिरोडा : सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सिंधुदुर्ग -शिरोडा

संघाच्या शिस्तबद्ध संचलनात मंत्री नितेश राणे सहभागी; स्वयंसेवकांसोबत साजरा केला विजयादशमी उत्सव

देवगड (जि. सिंधुदुर्ग) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्ष पूर्ण झाल्याच्या ऐतिहासिक प्रसंगी मंत्री नितेश राणे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्ते होणार खड्डेमुक्त, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून निधी मंजूर

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खड्डे बुजून रस्त्यांची डागडुजी करावी, रस्ते सुस्थितीत व्हावे,

करूळ घाटात कोसळली दरड, वाहतूक काही काळ ठप्प

वैभववाडी: तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे करुळ घाटात दरड कोसळल्याने शुक्रवारी सायंकाळी या

सिंधुदुर्ग ठरणार एआय मॉडेल, मंत्री नितेश राणेंचे स्वप्न पूर्ण होणार

सिंधुदुर्ग : सध्याचं युग हे एआय युग आहे. प्रशासनही एआय तंत्रज्ञानाचा वापर करतंय आणि वेगाने विकास होतोय!