या वर्षीही हापूसची चव उशिराच; आंबा बागायतदार चिंतेत !

लांबलेल्या पावसाचा कोकणातील आंबा उत्पादनावर परिणाम


रत्नागिरी (वार्ताहर) : यंदा पावसाने मुक्काम वाढविला आहे. या लांबलेल्या पावसाचा परिणाम कोकणातील आंबा उत्पादनावर होण्याची शक्यता आहे. दरवर्षी जानेवारी महिन्यात हापूसची पहिली पेटी बाजारात येते. मात्र यावर्षी फेब्रुवारी-मार्चपर्यंत हापूसची प्रतीक्षा करावी लागेल, असे आंबा उत्पादकांकडून सांगण्यात येत आहे. या वर्षीही आंबा पिकावर हवामानाचा परिणाम होण्याची शक्यता असून आंबा उत्पादकांसाठी ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे यावर्षी खवय्यांना हापूस आंब्याची चव उशिराच चाखायला मिळणार आहे.


आंबा हे कोकणातील प्रमुख पारंपरिक बागायती पीक आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आंब्याची मोठ्या प्रमाणात लागवड आहे. आंबा उत्पादनात हापूस आंब्याला विशेष महत्त्व आहे. आंबा पिकाची हेक्टरी उत्पादकता २.५० मेट्रिक टन आहे. कोकणातील खास करून रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हापूस हा जगप्रसिद्ध आहे.


सुमारे २५ हजार मेट्रिक टन हापूस निर्यात होतो. दरवर्षी युरोपियन देशांसह दुबई, सिंगापूर आणि मध्य आशियातील इतर देशांमध्येही हापूस आंब्याची निर्यात होते. पणन मंडळाच्या सुविधांचा वापर करून अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान, न्यूझीलंड, मलेशिया इ. देशांमध्ये आंबा निर्यात होतो. कोकणातील आंबा उत्पादनाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर गेल्या काही वर्षात महत्त्व वाढले आहे. मात्र हाच हापूस आंबा सातत्याने हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीचा सामना करीत आहे.


त्यामुळे अवेळी पाऊस, वाढते तापमान याचा परिणाम उत्पादनावर होत आहे. हवामानातील बदलांचा परिणाम आंब्याच्या उत्पादनावर आणि गुणवत्तेवरही होत आहे. आंब्याला फुले, फळे येण्यासाठी आणि निरोगी फळांमध्ये परिपक्वता येण्यासाठी विशिष्ट हवामान परिस्थितीची आवश्यकता असते. मात्र सातत्याने हवामान बदलामुळे यंदा हापूसचे पीक धोक्यात आले आहे.

Comments
Add Comment

संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार; पहिल्या टप्प्यातील संकल्पचित्राचे सादरीकरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक

जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठी आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून मोठ्या प्रमाणात काजू निर्यात व्हावी यासाठी संबधित विभागांनी

Narayan Rane : 'कोण आदित्य ठाकरे?' "बाळासाहेबांनंतर शिवसेना राहिली नाही! नारायण राणेंचा उद्धव गटावर हल्लाबोल

चिपळूण : भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज चिपळूण दौऱ्यादरम्यान शिउबाठा नेतृत्वावर अत्यंत कडक शब्दांत टीका

साळीस्ते खून प्रकरणात नवा ट्विस्ट! मृतदेह डॉक्टर पेशातील व्यक्तीचा असल्याची चर्चा ?

कणकवली: साळीस्ते येथे गुरुवारी दुपारी १२:३० एका पुरुषाचा मृतदेह काहीसा कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ माजली

Rain Alert : दिवाळीच्या उत्साहात पावसाचं विघ्न? मुंबई-कोकण किनारपट्टीवरील हवामान बदलणार, कसा असेल अंदाज?

मुंबई : महाराष्ट्रासह देशातील बहुतांश राज्यांतून मान्सूनने आता माघार घेतली असली तरीही, अनेक ठिकाणी अद्याप

दिवाळीच्या सुट्टीत मुंबई-गोवा महामार्ग ठप्प! प्रवाशांचा खोळंबा; 'खड्ड्यांतील प्रवास कधी थांबणार?'

मुंबई/महाड: दिवाळीच्या सुट्ट्या तोंडावर आल्या असतानाच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर (NH-66) आज, १७ ऑक्टोबर रोजी