दिवाळीच्या सुट्टीत फिरण्याचे नियोजन करताय ? 'या' चार जागांना नक्की भेट द्या

मुंबई : पावसाळ्यातली हिरवळ अनुभवल्यानंतर आता गुलाबी थंडीची चाहुल सर्वांना लागली आहे. त्यामुळे छान थंड हवेच्या ठिकाणी जाऊन मनाला ताजेतवाने करण्यासाठी फिरायला जायचे नियोजन करत असाल तर दिवाळीच्या सुट्टीसारखा दुसरा योग्य पर्याय नाही. यावर्षी दिवाळीत लागोपाठ आलेल्या चार दिवस सुट्ट्या आणि जोडून आलेला वीकएंड यामुळे पर्यटनाची आवड असणाऱ्यांना चांगलीच संधी मिळाली आहे. त्यामुळे सुट्टीमध्ये फिरायला जाण्यासाठी वेगवेगळ्या जागांच्या शोधात असाल तर या ठिकाणांना नक्की भेट द्या!

कास पठार - महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात युनेस्कोच्या जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ म्हणून मान्यताप्राप्त असे कास पठार हे ठिकाण आहे. जे आश्चर्यकारक जैवविविधतेचे आकर्षण केंद्र आहे. जिथे ८५०हून अधिक प्रजातींच्या वन्यफुलांचा समावेश आहे. पावसाळ्यानंतर येथे फुलांना बहर येण्यास सुरुवात होते. ऑक्टोबर पर्यंत येथे हा बहर दिसतो. त्यामुळे दिवाळी सुट्टीत कास पठार फिरणे हा एक उत्तम पर्याय आहे.

मालवण - महाराष्ट्रातील मालवण हे समुद्र किनाऱ्याने वेढलेले बेट आहे. त्यामुळे पावसाळ्यात येथील पर्यटन स्थळे प्रामुख्याने बंद असतात. तर उन्हाळ्यात समुद्रकिनाऱ्यालगतच्या वाळूमुळे अति गरम होते. त्यामुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दरम्यान येथे फिरायला जाणे हा योग्य पर्याय आहे. मालवण येथे समुद्रातील जलक्रीडा करण्यासाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत. ज्यात स्कुबा डायविंग, बोट राईड, समुद्रात पॅरा डायविंग, रोप राईड अशा जलक्रीडांचा अनुभव घेता येतो. त्यामुळे ज्यांना समुद्राविषयी प्रेम आहे त्यांनी मालवणला भेट द्यावी.

पाचगणी - महाराष्ट्रात बरीच थंड हवेची ठिकाण आहेत. त्यापैकी पाचगणी हे एक. ज्यांना अति थंड वातावरण सहन होत नाही त्यांनी दिवाळी दरम्यान पाचगणीला भेट द्यावी. कारण, यावेळी पावसाळा नुकताच संपला असला तरी वातावरणात हिरवळ आणि हवा सौम्य असते. महत्त्वाचे म्हणजे ऑक्टोबर सरते शेवटी स्ट्रॉबेरी फळ येण्यास सुरुवात होते. त्यामुळे ताजी स्ट्रॉबेरी खायला मिळते. म्हणून पाचगणी हेदेखील फिरण्यासाठी उत्तम ठिकाण आहे.

औरंगाबाद - जर तुम्ही तीन किंवा चार दिवसांसाठी नियोजन करत असाल तर औरंगाबाद हा उत्तम पर्याय आहे. औरंगाबाद म्हटल्यावर डोळ्यासमोर येते ती अजिंठा-वेरुळ लेणी! या जागेला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाची मान्यता मिळाली आहे. इथे गेल्यावर अजिंठा-वेरुळसह बिबी-का-मकबरा, सोनेरी महाल, बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारे घृष्णेश्वर मंदिर, जायकवाडी धरण अशी विविध ठिकाणे एकाच प्रवासात पाहता येतात. ऑक्टोबरमध्ये इथेही हवामान सौम्य थंड असते. त्यामुळे या ठिकाणाला भेट द्यावी.
Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे