'आवडेल तेथे प्रवास', दिवाळीसाठी एसटीची आकर्षक योजना, कमी खर्चात प्रवासाची सुवर्णसंधी

मुंबई : अवघ्या काहीच दिवसांवर दिवाळी सण येऊन ठेपला आहे. त्यापूर्वीच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने म्हणजेच लालपरीने प्रवाशांना दिवाळी भेट दिली आहे. दिवाळी दरम्यान एसटीचा प्रवास करणाऱ्यांना फिरण्यासाठी असणाऱ्या विशेष तिकीट पासच्या दरात महामंडळाकडून कपात करण्यात आली आहे. त्यामुळे दिवाळीमध्ये ‘आवडेल तेथे प्रवास’ या योजनेअंतर्गत कमी खर्चात प्रवास करायला मिळणार आहे. यावर्षी दिवाळीमध्ये लागोपाठ आलेल्या चार दिवस सुट्ट्या आणि वीकएंडमुळे पर्यटकांनी फिरायला जाण्याचे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. त्यात एसटीने तिकीट दर कमी केल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

दिवाळी सुट्ट्यांच्या दरम्यान एसटीच्या विशेष तिकीट पास दरात कपात केल्याने पर्यटक इतर वाहनांपेक्षा लालपरीच्या प्रवासाला पसंती देतील, अशी आशा महामंडळाला आहे. साधी, जलद, शिवनेरी, शिवशाही, शिवाई, इ-शिवाई, रातराणी अशा सर्व बसगाड्यांमध्ये योजनेतील पास ग्राह्य आहे. या वेगवेगळ्या प्रकारांनुसार तिकीट दरात किमान २०० पासून कमाल १००० रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे. या पासवर अमर्यादित प्रवासाची मुभा प्रवाशांना आहे. जानेवारी २०२५ पासून आतापर्यंत जवळपास १५ टक्के भाडेवाढ महामंडळाने केली आहे. आगामी दिवाळी सुट्ट्यांच्या कालावधीसाठी १० टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला होता. मात्र राज्यातील पूरस्थिती लक्षात घेता महामंडळाने हंगामी दरवाढ रद्द केली असून दिवाळी दरम्यान विशेष तिकीट पासचा दरही कमी केला आहे. ज्यात पर्यटकांना चार आणि सात दिवसाचा प्रवास करता येणार आहे.

'आवडेल तेथे प्रवास' योजनेंतर्गत साधी, जलद आणि रात्रसेवा बसला चार दिवसासाठी प्रौढांना १,३६४ आणि लहानग्यांना ६८५ एवढे तिकीटदर आहे. तर सात दिवसासाठी प्रौढांना २,३८२ आणि लहानग्यांना १,१९४ एवढे तिकीटदर आहे. शिवशाही आसनी बससेवेमध्ये चार दिवसासाठी प्रौढांना १,८१८ आणि लहानग्यांना ९११ इतके पैसे मोजावे लागणार आहेत. तर सात दिवसासाठी प्रौढांना ३,१७५ आणि लहानग्यांना १,५९० इतके तिकीट आहे. यासोबतच १२ मीटर ई-शिवाई बसला चार दिवसासाठी प्रौढांना २,०७२ आणि लहानग्यांना १,०३८ एवढे प्रवासी भाडे आहे. तर सात दिवसासाठी प्रौढांना ३,६१९ आणि लहानग्यांना १,८१२ इतके पैसे मोजावे लागणार आहेत.
Comments
Add Comment

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार

Rajya Sabha Election 2026: राज्यसभा निवडणुकीचा अर्ज भरायला फक्त सहा दिवस उरले, शरद पवार राज्यसभा लढवणार की नाही?

मुंबई: येत्या १६ मार्चला राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ३७ जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील

Maharashtra Village: राज्य सरकारकडून सहा ग्रामपंचायतींचा सन्मान केला जाणार; कोकणातील 'हे' गाव पहिल्या क्रमांकावर

मुंबई: गावाचा विकास हाच देशाचा विकास असं म्हटलं जातं. सध्या आपल्या देश लोकल ते ग्लोबल अशा मार्गाने काम करीत आहे.