'आवडेल तेथे प्रवास', दिवाळीसाठी एसटीची आकर्षक योजना, कमी खर्चात प्रवासाची सुवर्णसंधी

मुंबई : अवघ्या काहीच दिवसांवर दिवाळी सण येऊन ठेपला आहे. त्यापूर्वीच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने म्हणजेच लालपरीने प्रवाशांना दिवाळी भेट दिली आहे. दिवाळी दरम्यान एसटीचा प्रवास करणाऱ्यांना फिरण्यासाठी असणाऱ्या विशेष तिकीट पासच्या दरात महामंडळाकडून कपात करण्यात आली आहे. त्यामुळे दिवाळीमध्ये ‘आवडेल तेथे प्रवास’ या योजनेअंतर्गत कमी खर्चात प्रवास करायला मिळणार आहे. यावर्षी दिवाळीमध्ये लागोपाठ आलेल्या चार दिवस सुट्ट्या आणि वीकएंडमुळे पर्यटकांनी फिरायला जाण्याचे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. त्यात एसटीने तिकीट दर कमी केल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

दिवाळी सुट्ट्यांच्या दरम्यान एसटीच्या विशेष तिकीट पास दरात कपात केल्याने पर्यटक इतर वाहनांपेक्षा लालपरीच्या प्रवासाला पसंती देतील, अशी आशा महामंडळाला आहे. साधी, जलद, शिवनेरी, शिवशाही, शिवाई, इ-शिवाई, रातराणी अशा सर्व बसगाड्यांमध्ये योजनेतील पास ग्राह्य आहे. या वेगवेगळ्या प्रकारांनुसार तिकीट दरात किमान २०० पासून कमाल १००० रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे. या पासवर अमर्यादित प्रवासाची मुभा प्रवाशांना आहे. जानेवारी २०२५ पासून आतापर्यंत जवळपास १५ टक्के भाडेवाढ महामंडळाने केली आहे. आगामी दिवाळी सुट्ट्यांच्या कालावधीसाठी १० टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला होता. मात्र राज्यातील पूरस्थिती लक्षात घेता महामंडळाने हंगामी दरवाढ रद्द केली असून दिवाळी दरम्यान विशेष तिकीट पासचा दरही कमी केला आहे. ज्यात पर्यटकांना चार आणि सात दिवसाचा प्रवास करता येणार आहे.

'आवडेल तेथे प्रवास' योजनेंतर्गत साधी, जलद आणि रात्रसेवा बसला चार दिवसासाठी प्रौढांना १,३६४ आणि लहानग्यांना ६८५ एवढे तिकीटदर आहे. तर सात दिवसासाठी प्रौढांना २,३८२ आणि लहानग्यांना १,१९४ एवढे तिकीटदर आहे. शिवशाही आसनी बससेवेमध्ये चार दिवसासाठी प्रौढांना १,८१८ आणि लहानग्यांना ९११ इतके पैसे मोजावे लागणार आहेत. तर सात दिवसासाठी प्रौढांना ३,१७५ आणि लहानग्यांना १,५९० इतके तिकीट आहे. यासोबतच १२ मीटर ई-शिवाई बसला चार दिवसासाठी प्रौढांना २,०७२ आणि लहानग्यांना १,०३८ एवढे प्रवासी भाडे आहे. तर सात दिवसासाठी प्रौढांना ३,६१९ आणि लहानग्यांना १,८१२ इतके पैसे मोजावे लागणार आहेत.
Comments
Add Comment

नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेला इन्क्यूबेशन सेंटर म्हणून मान्यता

मुंबई: विदर्भातील नवउद्योग (स्टार्टअप) परिसंस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत,

नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; कृषीमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून, नमो

‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक’ विधानपरिषदेत मंजूर

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून चर्चेत असलेले आणि अत्यंत कडक तरतुदी असलेले ‘महाराष्ट्र

सिंधुदुर्गच्या विकासाला बुस्टर; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १०० टक्के 'व्हिजीएफ'ला मंजुरी

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला आणि अर्थव्यवस्थेला मोठी गती देणारा निर्णय मंगळवारी राज्य

नंदूरबार,छत्रपती संभाजीनगरमधील गैरव्यवहारासाठी 'एसआयटी स्थापन; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधान परिषदेत घोषणा

​मुंबई: नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर येथील भूसंपादन गैरव्यवहार आणि छत्रपती संभाजीनगरमधील ब्रिजवाडी येथील ५४

रब्बी हंगामातील 'ई-पीक पाहणी'ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

- ४५ टक्के शेतकरी अजूनही प्रक्रियेबाहेर; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील रब्बी