बिलासपूरमध्ये भूस्खलनाचा भीषण अपघात; बसवर दरड कोसळल्याने १५ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू, बचाव कार्य सुरू





बिलासपूर: हिमाचल प्रदेशमधील बिलासपूर जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी एक भीषण अपघात झाला. मुसळधार पावसामुळे भूस्खलन  झाले आणि डोंगरावरून कोसळलेल्या प्रचंड मोठ्या दरडीखाली एक खासगी बस दबल्याने १५प्रवाशांचा मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, बिलासपूरमधील बल्लू पुलाजवळ (Bhallu Bridge) ही दुर्दैवी घटना घडली. एका खासगी बसमध्ये सुमारे ३० ते ३५ प्रवासी होते. ही बस मरोतनहून घुमारवीकडे  जात होती. सायंकाळच्या सुमारास जोरदार पाऊस पडत असतानाच अचानक पहाडीचा मोठा भाग कोसळला. मोठे दगड आणि मातीचा ढिगारा थेट बसवर कोसळल्याने बस पूर्णपणे ढिगाऱ्याखाली दबून गेली.


अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि पोलीस तसेच आपत्ती व्यवस्थापन दलाच्या मदतीने बचाव कार्य (Rescue Operation) सुरू करण्यात आले.


या अपघातात १५जणांचा मृत्यू झाला असून, अनेक प्रवासी जखमी अवस्थेत ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहेत आणि त्यांना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले आहे.



बसमध्ये अजूनही काही लोक अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ढिगारा मोठा असल्याने बचाव कार्यात अडथळे येत आहेत, पण अडकलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.


या अपघातामुळे संपूर्ण परिसरात शोकाकूल वातावरण निर्माण झाले आहे. सततच्या पावसामुळे भूस्खलनाचा धोका वाढत असून, प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.








Comments
Add Comment

लालू प्रसाद यादव यांच्यासह कुटुंबातील चौघांवर भ्रष्टाचाराचे आरोप निश्चित

नवी दिल्ली : दिल्लीतील राउज ॲव्हेन्यू न्यायालयाने शुक्रवारी राष्ट्रीय जनता दल पक्षाचे प्रमुख लालू प्रसाद यादव,

आईची माया, थंडी वाजू नये म्हणून म्हणून अशी घेतले मुलाची काळजी

जम्मू : जम्मूतील अर्निया परिसरात कडाक्याची थंडी आणि बर्फाळ वाऱ्यांदरम्यान एका चौकात उभ्या असलेल्या शहीद

Himachal Bus Accident : हिमाचलमध्ये ६० प्रवाशांनी भरलेली बस ६० मीटर खोल दरीत कोसळली; ८ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जखमी

नाहन : हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यातून एक अत्यंत दुःखद आणि भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. प्रवाशांनी

Delhi Airport Drug News:"विमानातून घेऊन जात होते ४३ कोटींचा गांजा" पोलींसांनी विमानतळावरच...

नवी दिल्ली: इंदिरा गांधी इंटरनॅशनल (IGI) एयरपोर्टवर कस्टम विभागाने ४३ करोड़ो रुपयांच्या नशेच्या पदार्थां गांजा और

India Post GDS Recruitment 2026 : ना परीक्षा, ना मुलाखत! भारतीय डाक विभागात मेगा भरती; केवळ १० वी पासवर केंद्र सरकारमध्ये व्हा भरती

नवी दिल्ली : नवीन वर्षात केंद्र सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी भारतीय डाक विभागाने (India Post) आनंदाची

रात्री उशिरा महिलेने केली ऑर्डर, Blinkit Delivery Boy ला जे आढळले, ते पाहून थरकाप उडेल

तामिळनाडू : तामिळनाडूमधील घटनेवरुन समजते की माणुसकी अजून जिवंत आहे...Blinkit च्या एका डिलिव्हरी बॅायला रात्री एक