बिलासपूरमध्ये भूस्खलनाचा भीषण अपघात; बसवर दरड कोसळल्याने १५ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू, बचाव कार्य सुरू





बिलासपूर: हिमाचल प्रदेशमधील बिलासपूर जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी एक भीषण अपघात झाला. मुसळधार पावसामुळे भूस्खलन  झाले आणि डोंगरावरून कोसळलेल्या प्रचंड मोठ्या दरडीखाली एक खासगी बस दबल्याने १५प्रवाशांचा मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, बिलासपूरमधील बल्लू पुलाजवळ (Bhallu Bridge) ही दुर्दैवी घटना घडली. एका खासगी बसमध्ये सुमारे ३० ते ३५ प्रवासी होते. ही बस मरोतनहून घुमारवीकडे  जात होती. सायंकाळच्या सुमारास जोरदार पाऊस पडत असतानाच अचानक पहाडीचा मोठा भाग कोसळला. मोठे दगड आणि मातीचा ढिगारा थेट बसवर कोसळल्याने बस पूर्णपणे ढिगाऱ्याखाली दबून गेली.


अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि पोलीस तसेच आपत्ती व्यवस्थापन दलाच्या मदतीने बचाव कार्य (Rescue Operation) सुरू करण्यात आले.


या अपघातात १५जणांचा मृत्यू झाला असून, अनेक प्रवासी जखमी अवस्थेत ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहेत आणि त्यांना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले आहे.



बसमध्ये अजूनही काही लोक अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ढिगारा मोठा असल्याने बचाव कार्यात अडथळे येत आहेत, पण अडकलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.


या अपघातामुळे संपूर्ण परिसरात शोकाकूल वातावरण निर्माण झाले आहे. सततच्या पावसामुळे भूस्खलनाचा धोका वाढत असून, प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.








Comments
Add Comment

US-India Trade Deal: वर्षभराच्या चर्चेनंतर भारत-अमेरिका व्यापार करारावर एकमत; ट्रम्प-मोदींच्या चर्चेनंतर 'टॅरिफ'मध्ये मोठी कपात

भारत युरोप मुक्त व्यापार करारानंतर आता भारत अमेरिका या दोन देशांमध्ये मुक्त करार झाला आहे. स्वतः पंतप्रधान

January : भारतीय मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची गरुडझेप; जानेवारीत 'PMI' मध्ये सुधारणा, पण उद्योजकांच्या मनात धाकधूक!

भारतीय अर्थव्यवस्था आणि उत्पादन क्षेत्रासाठी जानेवारी २०२६ हा महिना संमिश्र पण काहीसा दिलासादायक ठरला आहे.

Gold-Silver Rate: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं- चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या नवे दर

मुंबई: रविवार १ फेब्रुवारी रोजी भारताचा अर्थसंकल्प जाहीर झाला. यावेळी सोने आणि चांदीबाबत कोणतीही मोठी थेट घोषणा

‘आशियामध्ये शांततेसाठी अरब राष्ट्राची भूमिका कौतुकास्पद’

नवी दिल्ली : अरब देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी

भारताचे आतापर्यंतचे सर्वात मोठे संरक्षण बजेट

नवी दिल्ली : यंदाच्या बजेटमध्ये संरक्षण विभागासाठी ७.८ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. संरक्षणासाठी

भूतान, नेपाळ, श्रीलंका याविश्वासू मित्रांसाठी मदतीचा हात, संबंधातील कडवटपणामुळे बांगलादेशला आर्थिक झटका

नवी दिल्ली  : केंद्रातील मोदी सरकारने २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना आपल्या परराष्ट्र धोरणाचे