बिलासपूरमध्ये भूस्खलनाचा भीषण अपघात; बसवर दरड कोसळल्याने १५ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू, बचाव कार्य सुरू





बिलासपूर: हिमाचल प्रदेशमधील बिलासपूर जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी एक भीषण अपघात झाला. मुसळधार पावसामुळे भूस्खलन  झाले आणि डोंगरावरून कोसळलेल्या प्रचंड मोठ्या दरडीखाली एक खासगी बस दबल्याने १५प्रवाशांचा मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, बिलासपूरमधील बल्लू पुलाजवळ (Bhallu Bridge) ही दुर्दैवी घटना घडली. एका खासगी बसमध्ये सुमारे ३० ते ३५ प्रवासी होते. ही बस मरोतनहून घुमारवीकडे  जात होती. सायंकाळच्या सुमारास जोरदार पाऊस पडत असतानाच अचानक पहाडीचा मोठा भाग कोसळला. मोठे दगड आणि मातीचा ढिगारा थेट बसवर कोसळल्याने बस पूर्णपणे ढिगाऱ्याखाली दबून गेली.


अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि पोलीस तसेच आपत्ती व्यवस्थापन दलाच्या मदतीने बचाव कार्य (Rescue Operation) सुरू करण्यात आले.


या अपघातात १५जणांचा मृत्यू झाला असून, अनेक प्रवासी जखमी अवस्थेत ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहेत आणि त्यांना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले आहे.



बसमध्ये अजूनही काही लोक अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ढिगारा मोठा असल्याने बचाव कार्यात अडथळे येत आहेत, पण अडकलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.


या अपघातामुळे संपूर्ण परिसरात शोकाकूल वातावरण निर्माण झाले आहे. सततच्या पावसामुळे भूस्खलनाचा धोका वाढत असून, प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.








Comments
Add Comment

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात

'Nanda Devi' Ship : तब्बल ४६,५०० मेट्रिक टनहुन अधिक एलपीजी घेऊन ‘नंदा देवी’ जहाज भारतात दाखल

‘शिवालिक’नंतर आणखी एक एलपीजी टँकर भारतात दाखल झाला आहे. ‘नंदा देवी’ हे जहाज आज म्हणजेच मंगळवार १७ मार्च रोजी

एनआयएची मोठी कारवाई, युक्रेनच्या सहा आणि अमेरिकेच्या एका नागरिकाला अटक

नवी दिल्ली : कोलकाता विमानतळ येथे अमेरिकन नागरिकाला तर लखनऊ विमानतळ आणि दिल्ली विमानतळ येथे प्रत्येकी तीन

West Bengal ED Raid : पश्चिम बंगालमध्ये ईडीअँक्शन मोडवर; एकूण १० ठिकाणी छापेमारी

- अवैध कॉल सेंटरद्वारे फसवणुकीचे प्रकरण पश्चिम बंगालमध्ये अंमलबजावणी संचनालयाने (ईडी) सोमवारी (१६ मार्च) मोठी

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक, भाजपची १४४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने १४४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. शुभेंदू अधिकारी

बिहारमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीत एनडीएच्या पाच उमेदवारांचा दणदणीत विजय

पाटणा : बिहारमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीत एनडीएच्या पाच उमेदवारांचा दणदणीत विजय झाला आहे. विधानसभेनंतर