मनसे वरुन मविआत वादावादी


मुंबई : महाराष्ट्रातल्या युतीत मोठा भाऊ म्हणून बाळासाहेब ठाकरेंना कायम मान मिळाला. पण त्यांचेच पुत्र असलेल्या उद्धव ठाकरेंचे राजकारण वेगळ्या दिशेने जात आहे. एकेकाळी बाळासाहेबांच्या आवाजाने मुंबई बंद होत होती. आता उद्धव ठाकरेंनी आग्रही मागणी केली तरी आघाडीतले इतर घटक पक्ष त्याला वाटाण्याच्या अक्षता लावत आहेत.


राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अर्थात मनसेला महाविकास आघाडीत म्हणजेत मविआत सहभागी करुन घ्यावे असा उद्धव यांचा आग्रह आहे. पण काँग्रेसने मविआला नव्या सहकाऱ्याची आवश्यकताच नाही या शब्दात उद्धव यांचा प्रस्ताव केराच्या टोपलीत फेकला आहे. यामुळे मनसे वरुन मविआत वादावादी सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.


महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. आधी ग्रामीण भागातील निवडणुका आणि नंतर महानगरपालिकांच्या निवडणुका घेतल्या जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपसह सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. दुसरीकडे मविआत मनसेवरुन मतभेद निर्माण झाले आहेत.


परराज्यांतून रोजगारासाठी आलेल्यांना मारहाण करणाऱ्या मनसेसोबत आघाडी करायची नाही अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. त्यांनी मनसेला मविआत सहभागी करुन घेण्यास जाहीर विरोध दर्शविला आहे. कोणत्या निवडणुकीत कोणाकोणाला उमेदवारी द्यावी याचे निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक पातळीवरील नेत्यांना दिल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ म्हणाले. त्यांनी मनसेला सहभागी करुन मविआतील घटक पक्षांच्या लढण्याच्या जागा कमी करण्यास जाहीर विरोध केला आहे.


मागील तीन महिन्यांत उद्धव आणि राज ठाकरे वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने वारंवार एकत्र येत आहेत. यामुळे ठाकरे बंधूंचे पक्ष निवडणुकीआधीच युती करणार असल्याची जोर धरू लागली. पण काँग्रेसने मनसेला मविआत घेण्यास जाहीर विरोध केला आहे.


Comments
Add Comment

दक्षिण मुंबईतील बेलासीस पुलाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव; मंगलप्रभात लोढा यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

कॅबिनेट मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी मानले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार ब्रिटिशांच्या

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधानभवन येथे "जावे विनोदाच्या गावा" या कार्यक्रमाचे विशेष आयोजन

श्रेष्ठ लेखकांच्या साहित्यकृतींचे अभिवाचन "लोकसेवेचा लोकजागर" ग्रंथाचे प्रकाशन मुंबई : महाराष्ट्र

मुंबई महापालिकेचा महसूल वाढवण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार

ग्रीन ब्राँड्ससह सदनिकांची विक्री, करमणूक शुल्क, भूखंडाचा लिलावातून वाढवणार महसूलाची रक्कम मुंबई (विशेष

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

'मराठी भाषा गौरव दिन' आणि 'मराठी राजभाषा दिन' यात फरक काय ?

मुंबई : दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी 'मराठी भाषा गौरव दिन' आणि १ मे रोजी 'मराठी राजभाषा दिन' साजरा करतात. ज्येष्ठ कवी

देवनार येथे कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प जून २०२६ पासून होणार सुरु

मुंबई : मुंबईतील देवनार डम्पिंग ग्राऊंडवरील येथे ६०० टन प्रतिदिन महानगरपालिका घन कचऱ्यापासून ७ मेगावॅट वीज