मनसे वरुन मविआत वादावादी


मुंबई : महाराष्ट्रातल्या युतीत मोठा भाऊ म्हणून बाळासाहेब ठाकरेंना कायम मान मिळाला. पण त्यांचेच पुत्र असलेल्या उद्धव ठाकरेंचे राजकारण वेगळ्या दिशेने जात आहे. एकेकाळी बाळासाहेबांच्या आवाजाने मुंबई बंद होत होती. आता उद्धव ठाकरेंनी आग्रही मागणी केली तरी आघाडीतले इतर घटक पक्ष त्याला वाटाण्याच्या अक्षता लावत आहेत.


राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अर्थात मनसेला महाविकास आघाडीत म्हणजेत मविआत सहभागी करुन घ्यावे असा उद्धव यांचा आग्रह आहे. पण काँग्रेसने मविआला नव्या सहकाऱ्याची आवश्यकताच नाही या शब्दात उद्धव यांचा प्रस्ताव केराच्या टोपलीत फेकला आहे. यामुळे मनसे वरुन मविआत वादावादी सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.


महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. आधी ग्रामीण भागातील निवडणुका आणि नंतर महानगरपालिकांच्या निवडणुका घेतल्या जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपसह सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. दुसरीकडे मविआत मनसेवरुन मतभेद निर्माण झाले आहेत.


परराज्यांतून रोजगारासाठी आलेल्यांना मारहाण करणाऱ्या मनसेसोबत आघाडी करायची नाही अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. त्यांनी मनसेला मविआत सहभागी करुन घेण्यास जाहीर विरोध दर्शविला आहे. कोणत्या निवडणुकीत कोणाकोणाला उमेदवारी द्यावी याचे निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक पातळीवरील नेत्यांना दिल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ म्हणाले. त्यांनी मनसेला सहभागी करुन मविआतील घटक पक्षांच्या लढण्याच्या जागा कमी करण्यास जाहीर विरोध केला आहे.


मागील तीन महिन्यांत उद्धव आणि राज ठाकरे वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने वारंवार एकत्र येत आहेत. यामुळे ठाकरे बंधूंचे पक्ष निवडणुकीआधीच युती करणार असल्याची जोर धरू लागली. पण काँग्रेसने मनसेला मविआत घेण्यास जाहीर विरोध केला आहे.


Comments
Add Comment

सर्वसामान्यांसाठी सुरू केलेली एकही योजना बंद होणार नाही

राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क शेतकरी, महिला आणि युवकांचा बार्शी येथील सभेत आमदार दिलीप सोपल यांच्यावर

अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी १२ हेक्टर जागा मंजूर

देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय १०० विद्यार्थी प्रवेश ⁠४३०

पुणे एक्सप्रेस वे अपघात प्रकरणी महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेच्या १३९ फेऱ्या रद्द

मुंबई : पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून या

Shocking CCTV: मॉडेलच्या मैत्रिणीला ॲसिड अटॅकची धमकी; जाब विचारायला गेल्यामुळे मॉडेलवर जीवघेणा हल्ला

मुंबई : मुंबईचे उपनगर असलेल्या अंधेरी पश्चिम भागातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंधेरीमधील नावाजलेला परिसर

सरकारी सुट्टी पण बँकिंग सेवा सुरू राहणार, सरकारी व्यवहारांसाठी RBIचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई : आर्थिक वर्ष २०२५-२६ चा शेवटचा दिवस असलेल्या ३१ मार्च २०२६ रोजी सार्वजनिक सुट्टी असली तरी सरकारी

राहुल गांधींची वक्तव्ये देशहिताला धक्का पोहोचवणारी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल; लाडकी बहीण योजनेला अजित पवारांचे नाव देण्याबाबत चर्चेतून निर्णय