वसतिगृहातून १२ महिला पळाल्या; ७ सापडल्या

उल्हासनगर शासकीय वसतिगृहातील घटना


उल्हासनगर (वार्ताहर) : उल्हासनगरच्या शासकीय महिला सुधारगृहातून तब्बल १२ महिलांनी पळ काढल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उल्हासनगर पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी यातील ७ महिलांना शोधून काढले आहे. पाच महिलांचा अजूनही शोध लागलेला नाही. याप्रकरणी हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील महिन्यात याच परिसरातील मुलींच्या वसतिगृहातून ८ मुलींनी पळ काढला होता.


उल्हासनगर येथे ठाणे जिल्हा महिला बालविकास विभागाच्या माध्यमातून चालविण्यात येणारे महिलांचे आणि मुलींचे वसतिगृह आहे. काही महिन्यांत येथून मुलींचे पळून जाण्याचे प्रकार उघड झाले आहेत. तसेच येथील व्यवस्थेवर अनेकदा वसतिगृहातील महिलांनी आणि मुलींनी आरोपदेखील केले आहे. सप्टेंबरमध्ये सुधारगृहात राहत असलेल्या सहा मुलींनी पळ काढला. याबाबतची माहिती मिळताच जिल्हा महिला बाल विकास विभागाने पोलिसांच्या मदतीने या मुलींची शोध मोहीम राबविली. यातील मुलींना शोधण्यात उल्हासनगर पोलिसांना यश आले.


जानेवरीमध्येही सुधारगृहाची सुरक्षा भिंत ओलांडून आणि येथील लोखंडी गज वाकवून तब्बल आठ मुलींनी पळ काढला होता. पोलिसांना मुली सापडल्यानंतर सुधारगृहाच्या व्यवस्थापनावर त्यांनी बोट ठेवत येथील कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. ठाणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणेअंतर्गत पीटा कायद्यानुसार कारवाई केल्यानंतर या महिलांना उल्हासनगरच्या या शासकीय महिला सुधारगृहात आणून ठेवण्यात आले होते.


Comments
Add Comment

ठेकेदाराला हलगर्जीपणा नडला, रंगकाम करताना कोसळून मजूराचा जागीच मृत्यू

पुणे: पुण्यात कामाच्या ठिकाणी मजुरांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करणे एका कंत्राटदाराला चांगलेच महागात पडले

पोलिसांनी परवानगी नाकारली, तरीही मोर्चा काढणारच!

मराठी अभ्यास केंद्रासह विविध शैक्षणिक संघटनांचा आज मोर्चा मुंबई : मराठी शाळांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात

कोस्टल रोडसाठी ९ हजार खारफुटीच्या झाडांचा बळी!

मुंबई महापालिकेचा निर्णय मुंबई : २६.५ किमी लांबीच्या मुंबई कोस्टल रोड प्रकल्पासाठी मुंबई महापालिकेने परिसरातील

बांगलादेशच्या उच्चायुक्तांना भारताने बजावले समन्स

‘सेव्हन सिस्टर्स’ला वेगळे पाडण्याच्या धमकीबाबत व्यक्त केली तीव्र चिंता नवी दिल्ली : बांगलादेशातील ढाक्यातील

जनता काँग्रेसची कबर खोदेल!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हल्लाबोल मुंबई : देशावर दहशतवादी हल्ले होत असताना, भारतीय लष्कर दहशतवाद्यांचे

पत्र गहाळ झाली नसून ती सोनिया गांधींकडे आहेत

केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाची सोशल मीडियावर भूमिका स्पष्ट नवी दिल्ली : देशाचे पहिले पंतप्रधान पंडित