गैरवर्तणूक प्रकरणी दोन न्यायाधीश बडतर्फ

मुंबई (प्रतिनिधी) : सातारा जिल्हा न्यायाधीश धनंजय निकम आणि पालघर जिल्हा सत्र न्यायाधीश इरफान शेख या दोघांना सेवेतून गैरवर्तणूकप्रकरणी बडतर्फ करण्यात आले आहे. या दोघांनाही १ ऑक्टोबरपासून पदमुक्त होण्यास सांगितले होते.


याबाबत सविस्तर माहिती अशी की, जामीन देण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप सातारा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश निकम यांच्यावर होता. त्यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकपूर्व जामिनासाठी आधी सत्र न्यायालयात व नंतर उच्च न्यायालयात धाव घेतली होती; परंतु, दोन्ही न्यायालयांनी त्यांना दिलासा देण्यास नकार दिला. तथापि, त्यांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले नव्हते.


याप्रकरणी त्यांची उच्च न्यायालय प्रशासनाच्या शिस्तपालन समितीकडून चौकशी होऊन अहवाल सादर केला होता. दुसरीकडे, शेख यांच्यावर अशाच स्वरूपाचे आरोप होते आणि त्यांचीही समितीकडून चौकशी केली होती. बॅलार्ड पिअर न्यायालयात दंडाधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांच्याकडे अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्याची प्रकरणे सुनावणीसाठी होती. त्यावेळी, जप्त केलेल्या आणि मुद्देमाल म्हणून न्यायालयात सादर केलेल्या अमली पदार्थांची ते तस्करी करत होते, असा त्यांच्यावर आरोप होता.

Comments
Add Comment

मुरबाडच्या सरपंच डॉ. कविता वरे-भालके यांना प्रजासत्ताकदिनी दिल्लीत विशेष निमंत्रण

लोकसहभागातील विकासकामांची आणि प्रभावी नेतृत्वाची राष्ट्रीय स्तरावर दखल मुरबाड : मुरबाड तालुक्यातील

कुळगाव-बदलापूर नगरपालिकेत भाजपचा शिवसेनेला धक्का!

सत्ता गेली; शिवसेनेचे मोठे नेते प्रवीण राऊत यांचे भाजपमध्ये प्रवेशाचे संकेत बदलापूर : मुंबई महापालिकेसह

उल्हासनगर महापालिकेत भाजप-शिवसेनेची सत्तेसाठी 'सेटिंग'

वंचितचे नगरसेवक सुरक्षित स्थळी हलवले उल्हासनगर : महानगरपालिका निवडणुकीनंतर उल्हासनगरमध्ये सत्तेसाठी खऱ्या

भारताच्या मदतीने श्रीलंकेत तिसरा बेली ब्रिज पूर्ण

कँडी - नुवारा एलिया मार्ग खुला कोलंबो : श्रीलंकेत आलेल्या ‘दित्वाह’ वादळानंतर भारत सरकारकडून राबवण्यात येत

प्रजासत्ताक दिनासाठी सुरक्षा यंत्रणा सज्ज

दहशतवादी हल्ल्याचे सावट नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर गुप्तचर यंत्रणांनी देशभरातील सुरक्षा

भारत ब्रिक्स २०२६ अध्यक्षपदासाठी सज्ज

नवी दिल्ली : जागतिक राजकारणात भारताचे वजन सातत्याने वाढत असून, २०२६ मध्ये भारत ‘ब्रिक्स’ या समूहाचे अध्यक्षपद