मेट्रो-५ साठी एमएमआरडीए २२ गाड्या खरेदी करणार

२ हजार ६४० कोटी रुपये खर्च


मुंबई (प्रतिनिधी): 'ठाणे-कल्याण-भिवंडी मेट्रो ५' मार्गिकेसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) २२ गाड्या खरेदी करण्यासाठी फेब्रुवारी २०२४ मध्ये निविदा मागविल्या होत्या. अखेर दीड वर्षांनंतर एमएमआरडीएने गाड्यांच्या खरेदीसाठी कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे. टिटागढ रेल सिस्टीमला हे कंत्राट देण्यात आले असून २ हजार ६४० कोटी रुपये खर्च करून मेट्रो ५ साठी २२ गाड्या खरेदी करण्यात येणार आहेत.


एमएमआरडीएमार्फत मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) ३३७ किमी लांबीचे मेट्रोचे जाळे विणण्यात येत आहे. यापैकी २४.४५ किमी लांबीच्या मेट्रो ५ मार्गिकेचे काम एमएमआरडीए दोन टप्प्यात करीत आहे. अंदाजे ८५०० कोटी रुपये खर्चाच्या आणि १७ स्थानकांचा समावेश असलेल्या या मार्गिकेचे काम शक्य तितक्या लवकर पूर्ण करून ही मार्गिका सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. दरम्यान, या मार्गिकेच्या कापूरबावडी- धामणकर नाका दरम्यानच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू असून या टप्प्याचे ९० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे.


तर धामणकर नाका- कल्याण या दुसऱ्या टप्प्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. या मार्गिकेसाठी २२ गाड्या खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. गाड्यांच्या खरेदीसाठी एमएमआरडीएने फेब्रुवारी २०२४ मध्ये निविदा काढल्या होत्या. मात्र आतापर्यंत निविदा अंतिम झाली नव्हती. अखेर दीड वर्षानंतर निविदा अंतिम झाली आहे. टीटागढ रेल सिस्टीम या कंपनीला ही निविदा देण्यात आली आहे. यासंबंधीच्या प्रस्तावाला नुकतीच एमएमआरडीएच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

Comments
Add Comment

Kokan Railway: कोकणकरांसाठी आनंदाची बातमी! शिमग्यासाठी धावणार खास विनाआरक्षित 'ही' ट्रेन

मुंबई : कोकणकरांसाठी महत्वाचा सण म्हणजे शिमगा, राज्याच्या कानाकोपऱ्यातून चाकरमानी आपल्या गावी शिमग्यासाठी

दहिसर नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई : दहिसर नदीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे,

घर खरेदीत फसवणूक करणाऱ्या बिल्डरांची मालमत्ता जप्त होणार

मुंबई : राज्यात आपले गृहस्वप्न साकार करू पाहणाऱ्या हजारो सर्वसामान्यांची बिल्डरांकडून होणारी फसवणूक आता राज्य

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या! - भाजप आमदार प्रसाद लाड यांची विधान परिषदेत मागणी

सकारात्मक निर्णय घेण्याचे संसदीय कार्यमंत्र्यांचे आश्वासन मुंबई : भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील

मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाचे नामकरण; आता होणार 'पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर' पूल

- मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणी कामाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई :

अंगणवाडी बांधकामासाठी १५ लाखांचा निधी प्रस्तावित; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

मुंबई : राज्यातील अंगणवाड्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या 'स्मार्ट किट' खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणि गुणवत्तेचा