मेट्रो-५ साठी एमएमआरडीए २२ गाड्या खरेदी करणार

२ हजार ६४० कोटी रुपये खर्च


मुंबई (प्रतिनिधी): 'ठाणे-कल्याण-भिवंडी मेट्रो ५' मार्गिकेसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) २२ गाड्या खरेदी करण्यासाठी फेब्रुवारी २०२४ मध्ये निविदा मागविल्या होत्या. अखेर दीड वर्षांनंतर एमएमआरडीएने गाड्यांच्या खरेदीसाठी कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे. टिटागढ रेल सिस्टीमला हे कंत्राट देण्यात आले असून २ हजार ६४० कोटी रुपये खर्च करून मेट्रो ५ साठी २२ गाड्या खरेदी करण्यात येणार आहेत.


एमएमआरडीएमार्फत मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) ३३७ किमी लांबीचे मेट्रोचे जाळे विणण्यात येत आहे. यापैकी २४.४५ किमी लांबीच्या मेट्रो ५ मार्गिकेचे काम एमएमआरडीए दोन टप्प्यात करीत आहे. अंदाजे ८५०० कोटी रुपये खर्चाच्या आणि १७ स्थानकांचा समावेश असलेल्या या मार्गिकेचे काम शक्य तितक्या लवकर पूर्ण करून ही मार्गिका सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. दरम्यान, या मार्गिकेच्या कापूरबावडी- धामणकर नाका दरम्यानच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू असून या टप्प्याचे ९० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे.


तर धामणकर नाका- कल्याण या दुसऱ्या टप्प्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. या मार्गिकेसाठी २२ गाड्या खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. गाड्यांच्या खरेदीसाठी एमएमआरडीएने फेब्रुवारी २०२४ मध्ये निविदा काढल्या होत्या. मात्र आतापर्यंत निविदा अंतिम झाली नव्हती. अखेर दीड वर्षानंतर निविदा अंतिम झाली आहे. टीटागढ रेल सिस्टीम या कंपनीला ही निविदा देण्यात आली आहे. यासंबंधीच्या प्रस्तावाला नुकतीच एमएमआरडीएच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

Comments
Add Comment

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ड्रोन, फ्लाइंग कंदील उडविण्यास बंदी

मुंबई (वार्ताहर): दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची सुरक्षितता आणि शांतताभंग होऊ नये यासाठी पोलिसांनी

मेट्रो-१ चा प्रवास घाट्याचा! उत्पन्न वाढीचा एमएमआरडीएचा मास्टर प्लॅन तयार

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील पहिली मेट्रो असलेली अंधेरी-घाटकोपर ही मेट्रो-१ मार्गिका घाट्यात चालत आहे. त्यातून

खोकल्याच्या सिरपमुळे बालकांचा मृत्यू; खबरदारीसाठी राज्याने 'हा' टोल-फ्री क्रमांक केला जारी!

मुंबई: मध्य प्रदेश आणि राजस्थानसह देशातील काही राज्यांमध्ये 'कोल्ड्रिफ' (Coldrif) नावाच्या खोकल्याच्या सिरपमुळे काही

लाडक्या बहिणींची 'ई केवायसी'तील तांत्रिक अडचण लवकर दूर करणार, मंत्री आदिती तटकरेंचे आश्वासन

मुंबई(प्रतिनिधी): मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना आता 'ई-केवायसी' बंधनकारक केली आहे.

ठाकरे बंधूंची मात्रोश्रीवर भेट, राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांच्या शक्यता

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या जवळीकीच्या बातम्या चर्चेत आल्या आहेत. शिवसेना

रेल्वे , बेस्ट, एसटी , मेट्रो... आता एकाच कार्डवर फिरू मुंबई ...

मुंबई : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही एकाच प्लॅटफॉर्म आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न होते. त्याच