नवरात्र काळात महालक्ष्मी मंदिरास ५७.१९ लाख रुपयांचे दान

थेट देणगीद्वारे १८ लाख, तर लाडू विक्रीतून १७ लाख रुपये


कोल्हापूर : साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीला नवरात्र काळात लाखोंच्या संख्येने भक्त दर्शनासाठी येतात. दर्शनासाठी येणार्‍या भाविकांकडून २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत विविध भाविक-भक्तांकडून ५७ लाख १९ लाख ४४२ रुपयांचे दान प्राप्त झाले आहे.


यात धार्मिक विधीसाठी ८ लाख ९३ सहस्र ३७३ रुपये, देणगी रुपये म्हणून १८ लाख ४४ सहस्र ८५५ रुपये, अन्नदान देणगी म्हणून ५ लाख ८२ सहस्र ७४९ रुपये, लाडू विक्रीतून १७ लाख ७ सहस्र २४ रुपये, साडी देणगीतून २ लाख ५० सहस्र ७०१ रुपये, शाश्‍वत पूजेतून १ लाख ११ सहस्र १२ रुपये मिळाले आहे, अशी माहिती पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने दिली आहे.


२० लाखापेक्षा अधिक भाविकांनी घेतले देवीचे दर्शन !


यंदाच्या वर्षी भाविकांची संख्या प्रचंड प्रमाणात होती. मराठवाड्यात यंदा पूरस्थिती असल्याने श्री तुळजाभवानी देवीला जाणारे अनेक भाविक तिकडे जाऊ न शकल्याने ते कोल्हापूर येथे येत होते. प्रत्येक दिवशी हा आकडा दीड लाखांपेक्षा अधिक होता. ११ दिवसांत साधारणत: २० लाख पेक्षा अधिक भाविकांनी श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेतले. देवस्थान समितीने यंदा ‘ए.आय.’वापर केल्याने सी.सी.टि.व्ही.च्या माध्यमातून चोरांनाही पकडणे शक्य झाले.

Comments
Add Comment

आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी हरिष भांदिर्गे, बाजार - उद्यान समिती अध्यक्षपदी हेतल गाला

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समिती आणि बाजार व उद्यान समिती अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष

त्र्यंबक-नाशिक कुंभमेळ्यासाठी २२ हजार १८१ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता

मुंबई: त्र्यंबक- नाशिक मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन २०२७ मध्ये करण्यात येत असून या कुंभमेळ्यात

मांजरानं पोपटाचा पिंजरा पाडला, दोन शेजाऱ्यांतला वाद हाणामारीपर्यंत गेला

पुणे : पुणे तिथे काय उणे असं म्हणतात , हे अगदी बरोबर कारण आता तिथे गुन्हेगारीच्याही काही कमतरता उरलेल्या नाही आहेत.

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी: कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक

आपले सरकार सेवा केंद्र व्यवस्थापकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

मुंबई: राज्यातील 'आपले सरकार सेवा केंद्र' प्रकल्पात कार्यरत असलेल्या तालुका, जिल्हा आणि ब्लॉक व्यवस्थापकांच्या