नवरात्र काळात महालक्ष्मी मंदिरास ५७.१९ लाख रुपयांचे दान

थेट देणगीद्वारे १८ लाख, तर लाडू विक्रीतून १७ लाख रुपये


कोल्हापूर : साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीला नवरात्र काळात लाखोंच्या संख्येने भक्त दर्शनासाठी येतात. दर्शनासाठी येणार्‍या भाविकांकडून २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत विविध भाविक-भक्तांकडून ५७ लाख १९ लाख ४४२ रुपयांचे दान प्राप्त झाले आहे.


यात धार्मिक विधीसाठी ८ लाख ९३ सहस्र ३७३ रुपये, देणगी रुपये म्हणून १८ लाख ४४ सहस्र ८५५ रुपये, अन्नदान देणगी म्हणून ५ लाख ८२ सहस्र ७४९ रुपये, लाडू विक्रीतून १७ लाख ७ सहस्र २४ रुपये, साडी देणगीतून २ लाख ५० सहस्र ७०१ रुपये, शाश्‍वत पूजेतून १ लाख ११ सहस्र १२ रुपये मिळाले आहे, अशी माहिती पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने दिली आहे.


२० लाखापेक्षा अधिक भाविकांनी घेतले देवीचे दर्शन !


यंदाच्या वर्षी भाविकांची संख्या प्रचंड प्रमाणात होती. मराठवाड्यात यंदा पूरस्थिती असल्याने श्री तुळजाभवानी देवीला जाणारे अनेक भाविक तिकडे जाऊ न शकल्याने ते कोल्हापूर येथे येत होते. प्रत्येक दिवशी हा आकडा दीड लाखांपेक्षा अधिक होता. ११ दिवसांत साधारणत: २० लाख पेक्षा अधिक भाविकांनी श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेतले. देवस्थान समितीने यंदा ‘ए.आय.’वापर केल्याने सी.सी.टि.व्ही.च्या माध्यमातून चोरांनाही पकडणे शक्य झाले.

Comments
Add Comment

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी: कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक

आपले सरकार सेवा केंद्र व्यवस्थापकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

मुंबई: राज्यातील 'आपले सरकार सेवा केंद्र' प्रकल्पात कार्यरत असलेल्या तालुका, जिल्हा आणि ब्लॉक व्यवस्थापकांच्या

'सांगली-सातारा येथील सराफ व गलाई बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी गृह विभाग स्वतंत्र कक्ष स्थापन करणार'

मुंबई : देशभरात सोन्या-चांदीच्या व्यवसायात नाव लौकिक मिळवलेल्या सांगली आणि सातारा जिल्ह्यातील गलाई बांधव आणि

घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष स्थापन

मुंबई: इराण - इस्राईल युध्दाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या घरगुती व व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडर

'एआय' तंत्रज्ञानाच्या मदतीने गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवणार; मत्स्यव्यवसाय विकास मंत्री नितेश राणेंनी दिली माहिती

मुंबई: राज्यात गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर सुरू