नवरात्र काळात महालक्ष्मी मंदिरास ५७.१९ लाख रुपयांचे दान

थेट देणगीद्वारे १८ लाख, तर लाडू विक्रीतून १७ लाख रुपये


कोल्हापूर : साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीला नवरात्र काळात लाखोंच्या संख्येने भक्त दर्शनासाठी येतात. दर्शनासाठी येणार्‍या भाविकांकडून २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत विविध भाविक-भक्तांकडून ५७ लाख १९ लाख ४४२ रुपयांचे दान प्राप्त झाले आहे.


यात धार्मिक विधीसाठी ८ लाख ९३ सहस्र ३७३ रुपये, देणगी रुपये म्हणून १८ लाख ४४ सहस्र ८५५ रुपये, अन्नदान देणगी म्हणून ५ लाख ८२ सहस्र ७४९ रुपये, लाडू विक्रीतून १७ लाख ७ सहस्र २४ रुपये, साडी देणगीतून २ लाख ५० सहस्र ७०१ रुपये, शाश्‍वत पूजेतून १ लाख ११ सहस्र १२ रुपये मिळाले आहे, अशी माहिती पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने दिली आहे.


२० लाखापेक्षा अधिक भाविकांनी घेतले देवीचे दर्शन !


यंदाच्या वर्षी भाविकांची संख्या प्रचंड प्रमाणात होती. मराठवाड्यात यंदा पूरस्थिती असल्याने श्री तुळजाभवानी देवीला जाणारे अनेक भाविक तिकडे जाऊ न शकल्याने ते कोल्हापूर येथे येत होते. प्रत्येक दिवशी हा आकडा दीड लाखांपेक्षा अधिक होता. ११ दिवसांत साधारणत: २० लाख पेक्षा अधिक भाविकांनी श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेतले. देवस्थान समितीने यंदा ‘ए.आय.’वापर केल्याने सी.सी.टि.व्ही.च्या माध्यमातून चोरांनाही पकडणे शक्य झाले.

Comments
Add Comment

"नवाब मलिकांचे नेतृत्व भाजपला कदापि मान्य नाही", अमित साटम यांचा इशारा

नागपूर: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. भारतीय जनता

विधिमंडळात प्रवेशासाठी पासेसची दीड हजारात विक्री?; चौकशीचे आदेश

नागपूर : नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात अभ्यागतांना प्रवेश देणारे पास दीड हजार रुपयांत विकले जात आहेत,

वर्षभरात राज्यात पापलेटच्या उत्पादनात ३ हजार ५५ मेट्रिक टनांची वाढ

मंत्री नितेश राणेंची माहिती; कायदेशीर बाबींचे काटेकोर पालन करूनच मासेमारीला परवानगी मुंबई : राज्यात पापलेट

समृद्धी महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षेला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य; मानवी चुका टाळण्यासाठी उपाययोजनांवर भर

नागपूर : राज्याच्या विकासाची भाग्यरेषा ठरलेल्या 'समृद्धी महामार्गा'वर प्रवाशांचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर

शेतकऱ्यांना ‘बळीराजा रस्ते’ योजनेचा आधार; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

नागपूर : राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या शेत रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी

इंडिगोची उड्डाणं रद्द, शेतकऱ्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान

मुंबई : इंडिगो विमान कंपनीची शेकडो उड्डाणं रद्द झाली. या गोंधळाचा प्रवाशांना फटका बसला. पण फक्त प्रवासीच नाही तर