'अनिल परबांनी आठ हजार रहिवाशांना धमकावून घरे रिकामी केली'


मुंबई : विलेपार्ले येथील एका एसआरए योजनेतील आठ हजार रहिवाशांना घरे रिकामी करण्यासाठी अनिल परब यांनी धमकावले, असा गंभीर आरोप शिवसेना नेते रामदास कदम यांनी उद्धव समर्थक आमदार अनिल परब यांच्यावर केला आहे. उद्धव समर्थक अनिल परबांमुळेच मुंबईतले आठ हजार मराठी रहिवासी देशोधडीला लागले आहेत, असाही आरोप रामदास कदम यांनी केला आहे. पत्रकार परिषद घेऊन रामदास कदम यांनी हे आरोप केले.


शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीवर ठेवण्यात आला होता. त्यांच्या हाताचे ठसे घेण्यात आले,’ असा सनसनाटी आरोप कदम यांनी दसरा मेळाव्यात केला होता. आता रामदास कदम यांनी अनिल परबांवर नव्या आरोपाची तोफ डागली आहे.


‘विलेपार्ले येथील एसआरएच्या योजनेसंदर्भातील प्रतिज्ञापत्र माझ्याकडे आहे. ही योजना अजून पूर्ण झालेली नसून, परब यांनी आठ हजार मराठी माणसांना घरे रिक्त करण्यासाठी धमकी दिली. या योजनेतील रहिवाशांना फ्लॅट देईन, असे अनिल परब यांनी सांगितले होते. ‘या आठ हजार रहिवाशांना फक्त एक वर्षाचे भाडे दिले. ही मराठी माणसे नऊ वर्षांपासून मुंबईबाहेर आहेत. हे पैशासाठी बिल्डरांचे पाय चाटतात. उबाठाचे पदाधिकारी संजय कदम आणि अनिल परब यांनी कोट्यवधी रुपये कमावले. बिल्डरने यांना मर्सिडीज दिल्या. संजय कदमने बाइक वाटल्या. याबाबत तिथल्या रहिवाशांनी याबाबत प्रतिज्ञापत्रे दिली आहेत,’ असे रामदास कदम म्हणाले.


Comments
Add Comment

स्त्री-भ्रूणहत्या प्रकरणी राज्यभरात धडक मोहिम राबवणार - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

मासिक पाळीदरम्यान महिलांना सुट्टी देण्यासंदर्भात समिती नेमून अभ्यास करणार मुंबई : "स्त्री-भ्रूणहत्याप्रकरणी

Iran Helicopter Crash : लष्करी हेलिकॉप्टर कोसळून चौघांचा मृत्यू

अमेरिकेसोबत सुरू असलेल्या भीषण तणावाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (२४ फेब्रुवारी) इराणच्या मध्य भागात एक लष्करी

धक्कादायक! सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी ९ जणांनी विकली किडणी

- सहा सावकारांची संपत्ती गोठवणार; मुख्यमंत्र्यांनी दिले कठोर निर्देश मुंबई : खासगी सावकारांकडून घेतलेल्या

मुंबई ते विजयदुर्ग रो रो सेवा १ मार्चपासून सुरू होणार

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात मुंबई आणि कोकणाला जलवाहतुकीच्या माध्यमातून

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३% वाढ! ५.९६ लाख कर्मचाऱ्यांना दिलासा; वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची घोषणा

मुंबई: राज्य शासनाने राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ करण्याचा अत्यंत

शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्कांची वाढ

मुंबई : राज्य शासनाने राज्य शासकीय आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांची वाढ करण्याचा