भूखंड पालिकेचा की, खासगी विकासकांचा ?

पालिकेच्या नावाचे फलक बसवण्याची मागणी


मुंबई (प्रतिनिधी) : उपनगरात बहुतांश ठिकाणी मनपा प्रशासनाचे मोकळे भूखंड, राखीव भूखंड मोठ्या प्रमाणात आहेत परंतु त्या ठिकाणच्या भुखंडावर मनपा प्रशासनाकडून नामफलक बसवण्यात आलेले नसल्याने सर्व मोकळ्या, राखीव भूखंडावर पालिकेच्या नावाचे नामफलक लवकरात लवकर बसवण्यात यावीत, अशी मागणी समाजसेवक गणेश नारायण वराडे यांनी मुंबई महापालिकेत केली आहे. ज्या ठिकाणी मनपाच्या मोकळ्या व राखीव भूखंडावर फलक लावण्यात आलेले नाही त्या संबंधित अधिकाऱ्यांची सखोल चौकशी सुध्दा व्हायला हवी अशी देखील मागणी करण्यात आली.


मनपा एस विभाग हद्दीतील, भांडुप (प.) येथील जनता मार्केट परिसरातील महिंद्र सोसायटीच्या आवारात मनपाचे मोकळे व राखीव भूखंड असून त्यावर कोणत्याही प्रकारचा पालिकेच्या नावाचा फलक लावण्यात आला नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम पसरला असून हा भुखंड पालिकेचा की खासगी विकासकांचा ? असा सवालही गणेश वराडे यांनी केला आहे. हा भुखंड पालिकेच्या अखत्यारीत असेल तर पालिका प्रशासन या भुखंडावर फलक लावण्यात जाणीवपूर्वक दिरंगाई करत आहे. असा आरोपही वराडे यांनी केला आहे.


या मनपाच्या मोकळ्या आणि राखीव भुखंडावर पालिकेच्या नावाचे नामफलक लावणे गरजेचे आहे. अन्यथा असले भुखंड भविष्यात गिळंकृत होण्याची किंवा त्या ठिकाणी अतिक्रमणे होण्याची सुध्दा दाट शक्यता असल्याने मोकळ्या आणि राखीव भूखंडावर पालिकेच्या नावाचे फलक त्वरित लावण्यात यावेत अशी मागणी समाजसेवक वराडे यांनी मनपा एस विभागाकडे केली आहे.

Comments
Add Comment

Girija Oak Godbole : निळ्या साडीतील गिरिजा ओक बनली 'नॅशनल क्रश'! सोशल मीडियावर तुफान व्हायरल

मुंबई : सोशल मीडियाच्या जगात कधी काय व्हायरल होईल, हे सांगता येत नाही. गेल्या काही दिवसांपासून जर तुम्ही एक्स (X),

एटीएसची इब्राहिम अबिदी याच्या मुंब्रा अन् कुर्ला येथील घरावर धाड

नवी दिल्ली  : पुण्यातील अल कायदा प्रकरणाचे धागेदोरे आता मुंब्र्यापर्यंत पोहोचले आहेत. पुणे एटीएसने सॉफ्टवेअर

उद्या आणि परवा मुंबईत पाणीबाणी!

मुंबई : मुंबई महानगरपालिकेची १२०० मिलिमीटर व्यासाची जुनी तानसा, १२०० मिलिमीटर व्यासाची नवीन तानसा आणि ८००

महाराष्ट्रात केवळ मोजक्या पक्षांकडे राखीव निवडणूक चिन्ह

राष्ट्रीय, राज्यस्तरीय वगळता छोट्या पक्षांची होणार दमछाक मुंबई  : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या

माहिममध्ये उबाठाकडे मनसेची खुल्या प्रभागांची मागणी, पाच पैंकी तीन खुले प्रभाग आपल्याकडे घेण्याचा मनसेचा विचार

मुंबई (सचिन धानजी):  मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण प्रक्रिया पार पडल्यानंतर आता

पिसे पांजरापूर येथे ९१० दशलक्ष लिटर प्रतीदिन क्षमतेचे जलशुध्दीकरण केंद्र उभारणार, आता केंद्राची क्षमता होणार १८२० दशलक्ष लिटर

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबईकरांना शुध्द पाण्याचा पुरवठा करण्यासाठी धरणातून आलेल्या पाण्यावर भांडुप संकुल आणि