पथदर्शी धोरणानुसार मुंबई महापालिकेच्या शाळा १० मजली होणार

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेने आपल्या शाळांच्या जुन्या इमारतींचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. शाळेची नवी इमारत विविध सोयी-सुविधांनी सुसज्ज असावी यासाठी महापालिकेच्या शिक्षण विभागाने पथदर्शी धोरण आखले आहे. या धोरणानुसार शाळांच्या नव्या इमारती गगनचुंबी असणार आहेत. या इमारतींमध्ये विज्ञान, भूगोल, संगणक आदींसाठी प्रयोगशाळा, वाचनालय, मानसिकदृष्ट्या विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी वर्ग, बहुउद्देशीय सभागृह, कौशल्य विकास केंद्र आदी सुविधा उपलब्ध असणार आहेत.


मुंबई महापालिकेच्या अनेक शाळांच्या इमारती जुन्या झाल्या आहेत. या इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी विद्यार्थ्यांना अन्य शाळांमध्ये स्थलांतरित करण्यात येत आहे. पालिका नव्याने बांधत असलेल्या या इमारती सोयी-सुविधांनी सुसज्ज असणार आहेत. या शाळांमध्ये प्रत्येक मजल्यावर सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.


कुलाबा, जुहू येथील गांधी ग्राम, न्यू माहीम, साईबाबा पथ या चार शाळांच्या इमारतींचा त्यात समावेश असेल. यापैकी कुलाबा व जुहू येथील शाळांना अद्याप बहुमजली इमारत बांधण्यासाठी परवानगी मिळालेली नाही. या इमारती मुंबई महापालिकेच्या शाळा पायाभूत सुविधा कक्षातर्फे बांधण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. मुंबई महानगरपालिकेच्या अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या १५०० पेक्षा जास्त आहे.

Comments
Add Comment

चेंबूर-जेकब सर्कल मोनोरेल पुन्हा धावणार; सुरक्षा प्रमाणपत्र मिळालं, प्रवाशांची प्रतीक्षा लवकरच संपणार

मुंबई : मुंबईतील चेंबूर ते जेकब सर्कल मोनोरेल (Monorail) मार्गिका पुन्हा सुरू होण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या

Political News: दिलीप वळसे-पाटील यांनी घेतली शरद पवारांची भेट

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip

मालाडमध्ये बेस्ट बसचा अपघात; अनेक वाहनांना धडक, महामार्गावर वाहतूक कोंडी

मुंबई : मुंबईतील मालाड (Malad Accident) पूर्व परिसरात गुरुवारी सकाळी बेस्ट बसच्या अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण

BMC News : बेलगाम सल्लागार नियुक्ती बसणार आळा

सल्लागारांच्या निवडीबाबत तत्काळ धोरण बनवण्याचे स्थायी समिती अध्यक्षांनी दिले आदेश मुंबई : मुंबई महापालिकेत

High Tide : यंदाच्या पावसाळ्यात २४ वेळा समुद्राला येणार मोठी भरती

जून महिन्यात सलग ६ दिवस मोठ्या भरतीचे मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  यंदाच्या पावसाळ्यात म्हणजेच जून ते सप्टेंबर या ४

BJP-Shivsena : फेरीवाल्यांच्या मुद्यावरून भाजप शिवसेनेत श्रेयाची लढाई

आपल्या प्रयत्नांचे फळ दृष्टीपथात असल्याचा महापौरांचा दावा, शिवसेना म्हणते आमच्या प्रयत्नांना यश मुंबई :