दुर्गंधी पसरत नाही की कचरा दिसत नाही, मुंबईतल्या अनोख्या कचरापेट्या


सचिन धानजी, मुंबई : मुंबईत आज कुणालाच आपल्या घरासमोर कचरा नको असतो. तसेच सार्वजनिक कचरा पेट्या असल्यास त्या हटवण्याची मागणी केली जाते. तसेच रुग्णालय परिसरातील कचरा इतरत्र पडून त्यापासून पसरणारी दुर्गंधी आणि उघड्यावरील अस्वच्छता यावर उपाय म्हणून मुंबई महापालिकेने भूमिगत कचरा पेट्या बसवण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत मुंबई महापालिकेने केईएम, शीव, कस्तुरबासह इतर ठिकाणी भूमिगत कचरा पेट्या बसवून उघड्यावरील कचऱ्याचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न केला. त्यानुसार आतापर्यंत मुंबईत तब्बल ३८ भूमिगत कचरा पेट्या सध्या वापरात असल्याने जनतेला एक मोठ्याप्रमाणात दिलासा मिळालेला आहे.


मुंबईत अनेक सार्वजनिक ठिकाणी कचर्‍याचे डबे ठेवण्यात आले आहे. या उघड्यावर ठेवण्यात येणार्‍या कचर्‍यामुळे उग्रवास आसपासच्या परिसरात पसरतो. तसेच कचरा उघड्यावर असल्याने बर्‍याच ठिकाणी मोकाट जनावरे तसेच कचरा वेचकांकडून पेट्यांतून कचरा फेकला जातो. त्यामुळे कचरा पेट्यांचा परिसर अस्वच्छ होतो, शिवाय या कचर्‍यामुळे पादचार्‍यांनाही चालता अडचणी येत असतात. या तुलनेत भूमिगत कचर्‍याचे डबे जमिनीखाली बसवल्यास यामुळे कचर्‍यापासून होणारी दुर्गंधी कमी होईल. तसेच पादचार्‍यांना कचरा पेट्यांजवळून जातानाही कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवणार नाही. त्यामुळे मोकाट जनावरे तसेच कचरा वेचकांकडून जो कचरा अस्तवस्त पडला जातो, त्यावर नियंत्रण येवून आरोग्य चांगले जाईल, या हेतूने महापालिकेने प्रायोगिक तत्वावर ए, डी, पी/उत्तर व आर/मध्य या विभागातील या प्रत्येकी एका ठिकाणी अशा ठिकाणी एकूण चार ठिकाणी आधुनिक भूमिगत स्वरुपाचे २.२ घनमीटर क्षमतेचे डबे बसवले होते.


चार ठिकाणी बसवण्यात आलेल्या या भूमिगत कचरा पेट्यांच्या यशस्वी प्रयोगानंतर आता महापालिकेच्या उर्वरीत २० विभागांमध्ये ४० ठिकाणीआधुनिक स्वरुपाचे २.२ घनमीटर क्षमतेचे कचरा डबे बसवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आतापर्यंत केईएम रुग्णालयात सर्वांधिक म्हणजे ०६ भूमिगत कचरा पेट्या, शीव रुग्णालयात ०४, नायर रुग्णालयात ०२, कस्तुरबा रुग्णालयात ०२ आणि जीटीबी रुग्णालयात ०३ अशाप्रकारच्या रुग्णालय परिसरातच १७ भूमिगत कचरा पेट्या बसवल्या आहेत. महापालिकेच्या पाच रुग्णालयांमधील १७ भूमिगत कचरा पेट्यांसह एकूण ३८ भूमिगत कचरा पेट्या गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी, आक्सा चौपाटी, कुलाबा मच्छिमार नगर, शीव शक्तीनगर,गोराई जेटी, भायखळा राणीबाग, अफगाण चर्च, ओल्ड कस्टम हाऊस, संधू गार्डन, केडी गार्डन आदी ठिकाणी बसवण्यात आल्या असून याला चांगल्याप्रकारचा प्रतिसाद लाभत आहे. विशेष म्हणजे या पेट्यांची देखभालही योग्यप्रकारे राखली जात आहे.


उघड्यावरील कचऱ्यावर नागरिकांना होणारा त्रास तसेच त्यापासून पसरणारी दुर्गंधी यामुळे मुंबई महापालिकेने राबवलेल्या या निर्णयानंतर भूमिगत कचरा पेट्यांची संख्या वाढत जात आहे. एरव्ही सार्वजनिक कचरा पेट्यांना विरोध करणाऱ्या जनतेकडून या भूमिगत कचरा पेट्यांची संख्या वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे. मुंबईला कचरा मुक्त करण्यासाठी प्रशासनाने घेतलेल्या निर्णयामुळे भविष्यात या भूमिगत कचरा पेट्यांची संख्या वाढवली जाणार असल्याचे म्हटले जात आहे.


मुंबईत अशाप्रकारे बसवण्यात आल्या आहेत भूमिगत कचरा पेट्या


केईएम रुग्णालय : ०६


शीव रुग्णालय : ०४


कस्तुरबा रुग्णालय : ०२


जीटीबी रुग्णालय : ०३


घाटकोपर शीव मंदिर : ०२


घाटकोपर बानपाकोडे :०२


चर्नीरोड गिरगाव चौपाटी : ०१


फोर्ट ओल्ड कस्टम हाऊस : ०१


बोरीवली गोराई जेटी : ०१


मालाड आक्सा बिच : ०१


वीर माता जिजाबाई भोसले उद्यान : ०१


ए विभाग, अफगाण चर्च : ०१


मुंबई सेंटर नायर रुग्णालय : ०२


चेंबूर, संधू गार्डन, सातवा क्रॉस लेन : ०१


भांडुप अंकुर हॉस्पिटल, मेयर गार्डन समोर : ०३


कांदिवली के.डी. कंपाऊंड : ०२


जुहू बीच : ०२


कुलाबा मच्छिमार नगर : ०२


कुलाबा शिवशक्ती नगर : ०१


Comments
Add Comment

कबुतरांना दाणे घालणं पडलं महागात! बसला हजारोंचा दणका

मुंबई: कबुतरांमुळे सर्वसामान्यांच्या आरोग्याला धोका असल्याने कबुतरखाना बंद करण्याचा निर्णय मुंबई

New Year News Rules : नवं वर्ष, नवे नियम! १ जानेवारीपासून तुमचे आर्थिक गणित बदलणार; २०२६ मध्ये लागू होणारे 'हे' १० मोठे बदल!

मुंबई : वर्ष २०२५ ला निरोप देण्यासाठी आता अवघे ४ दिवस उरले असून, १ जानेवारी २०२६ पासून आपल्या दैनंदिन जीवनातील

कर्मचाऱ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने शासकीय सदनिकांचे वाटप

मुंबई : राज्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मुंबईतील शासकीय निवासस्थान वाटपावरून येणाऱ्या तक्रारींची

पश्चिम रेल्वेवर शनिवारी ३०० फेऱ्या रद्द

मध्य रेल्वेचा उद्या मेगा ब्लॉक जलद आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांचे हाल मुंबई : मुंबईकरांचे दैनंदिन आयुष्य

पद्म पुरस्कार, भारतरत्न उपाधी नव्हे; ते नावाआधी लावता येणार नाही

मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न हे नागरी

राज्यात जनसुरक्षा कायदा लागू

अध्यादेश जारी; कडव्या डाव्या संघटनांवर होणार कारवाई मुंबई : बहुचर्चित जनसुरक्षा कायदा अखेर राज्यात लागू झाला