सिंधुदुर्ग -शिरोडा वेळागर समुद्रात नऊ पर्यटक बुडाले

तिघांचे मृतदेह हाती लागले असून, अन्य एकाचा शोध सुरू आहे


शिरोडा : सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सिंधुदुर्ग -शिरोडा वेळागर समुद्रात नऊ पर्यटक बुडाले. यापैकी तिघांचे मृतदेह हाती लागले असून, पाच जणांना वाचवण्यात यश आले आहे. अन्य एकाचा शोध सुरू आहे.


शिरोडा - वेळागर येथील समुद्रकिनारी शुक्रवारी दुपारी ४:४५ दरम्यान बेळगाव व कुडाळ येथील दोन कुटुंबातील ९ जण फिरण्यासाठी आले होते. निळ्याशार समुद्राच्या लाटावर पाण्यात खेळण्याची त्यांना इच्छा झाली. त्यामुळे सगळेजण समुद्राच्या पाण्यात उतरले. मात्र समुद्राला तुफान असल्याने एका मोठ्या लाटेबरोबर हे सर्वजण पाण्यात खेचले जाऊन बुडाल्याची घटना घडली.


स्थानिकांमुळे सदर पर्यटकातील ५ जणांना समुद्रातून बाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र यातील ३ पर्यटकांचा मृत्यू झाला. अत्यवस्थ महिलेवर शिरोडा उपजिल्हा रुग्णालय उपचार सुरू आहेत. रात्र झाल्याने आणि समुद्र खवळलेला असल्याने पोलिसांनी बचाव कार्य थांबवले आहे. शनिवारी सकाळी पुन्हा बचावकार्य सुरू करून शोध घेतला जाणार आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी दिली.


बेळगाव येथील कित्तूर कुटुंब गुरुवारी बेळगाव येथून कुडाळ गुडीपूर येथील आपले नातेवाईक मणियार कुटुंबीयांकडे आले होते. शुक्रवारी त्यांनी फिरत फिरत शिरोडा समुद्रकिनारी दुपारी भेट दिली. मौज मजा करण्यासाठी समुद्राच्या पाण्यात उतरलेल्या या दोन्ही कुटुंबावर काळाने घाला घातला. बघता बघता होत्याचे नव्हते झाले. पाण्यात उतरलेले ९ जण समुद्राच्या पाण्यात बुडाले.


किनाऱ्यावर असलेल्या स्थानिकांनी त्यांना वाचवण्याचे शर्तीचे प्रयत्न केले. आजू अमरे, सूरज अमरे, समीर भगत तसेच राज स्पोर्ट्सचे राजेश नाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बुडत असलेल्या या पर्यटकांना पाण्याबाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न करून ९ जणांपैकी ५ जणांना बाहेर काढण्यात यश आले. घटनास्थळी पोलीस, महसूल व ग्रामीण विकास विभागाची यंत्रणा उपस्थित असून सदर प्रशासकीय यंत्रणा व स्थानिक शोध व बचाव पथकामार्फत बेपत्ता पर्यटकांचा शोध सुरू आहे. तरी कृपया नागरिकांनी कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये असे आवाहनही प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Chalisgaon : चाळीसगाव महावितरणाचा अजब कारभार: अधिकारी 'मस्तवाल', जनता 'बेहाल'!

Chalisgaon :  चाळीसगाव शहरासह परिसरात महावितरण विभागाचा मनमानी कारभार शिगेला पोहोचला असून, सध्या 'त्रस्त नागरिक आणि

BCCI SELECTION : BCCI कडून दोन मोठ्या स्पर्धांसाठी भारतीय संघांची घोषणा; श्रेयस अय्यरकडे नेतृत्व, तिलक वर्मा उपकर्णधार

MUMBAI : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आगामी इंग्लंड दौरा 2026 आणि आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 (जपान) यासाठी भारतीय पुरुष

BCCI SQUAD SELECTION : भारतीय क्रिकेट संघाच्या निवडीसाठी बीसीसीआयची बैठक सुरू; श्रेयस अय्यरकडे सोपवली जाणार धुरा?

BCCI : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) वरिष्ठ निवड समिती आज मुंबईतील मुख्यालयात महत्त्वाची बैठक घेत आहे. या बैठकीत

INDvsAFG TEST : भारत विरुद्ध अफगाणिस्तान; एकमेव कसोटी सामना

PANJAB : मुल्लांपूर (नवी चंदीगड) येथील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि

Beed Suicide : लग्नाचा १२ वा दिवस अन् नवरदेवाची आत्महत्या! बायकोच्या डायरीत दडलं होतं 'ते' भयानक सत्य

बीड : बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे एका तलाठ्याने लग्नानंतर अवघ्या 12 दिवसांत आत्महत्या (Suicide) केल्याच्या

Mumbai News: वाकोला-बीकेसी पुलाबाबत मोठी बातमी! ९८% काम पूर्ण, मुंबईकरांचा प्रवास होणार फक्त 10 मिनिटांत

मुंबई:मुंबई शहरातील वाहतूक कोंडी (Traffic) कमी करण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड (SCLR)