सिंधुदुर्ग -शिरोडा वेळागर समुद्रात नऊ पर्यटक बुडाले

तिघांचे मृतदेह हाती लागले असून, अन्य एकाचा शोध सुरू आहे


शिरोडा : सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सिंधुदुर्ग -शिरोडा वेळागर समुद्रात नऊ पर्यटक बुडाले. यापैकी तिघांचे मृतदेह हाती लागले असून, पाच जणांना वाचवण्यात यश आले आहे. अन्य एकाचा शोध सुरू आहे.


शिरोडा - वेळागर येथील समुद्रकिनारी शुक्रवारी दुपारी ४:४५ दरम्यान बेळगाव व कुडाळ येथील दोन कुटुंबातील ९ जण फिरण्यासाठी आले होते. निळ्याशार समुद्राच्या लाटावर पाण्यात खेळण्याची त्यांना इच्छा झाली. त्यामुळे सगळेजण समुद्राच्या पाण्यात उतरले. मात्र समुद्राला तुफान असल्याने एका मोठ्या लाटेबरोबर हे सर्वजण पाण्यात खेचले जाऊन बुडाल्याची घटना घडली.


स्थानिकांमुळे सदर पर्यटकातील ५ जणांना समुद्रातून बाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र यातील ३ पर्यटकांचा मृत्यू झाला. अत्यवस्थ महिलेवर शिरोडा उपजिल्हा रुग्णालय उपचार सुरू आहेत. रात्र झाल्याने आणि समुद्र खवळलेला असल्याने पोलिसांनी बचाव कार्य थांबवले आहे. शनिवारी सकाळी पुन्हा बचावकार्य सुरू करून शोध घेतला जाणार आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी दिली.


बेळगाव येथील कित्तूर कुटुंब गुरुवारी बेळगाव येथून कुडाळ गुडीपूर येथील आपले नातेवाईक मणियार कुटुंबीयांकडे आले होते. शुक्रवारी त्यांनी फिरत फिरत शिरोडा समुद्रकिनारी दुपारी भेट दिली. मौज मजा करण्यासाठी समुद्राच्या पाण्यात उतरलेल्या या दोन्ही कुटुंबावर काळाने घाला घातला. बघता बघता होत्याचे नव्हते झाले. पाण्यात उतरलेले ९ जण समुद्राच्या पाण्यात बुडाले.


किनाऱ्यावर असलेल्या स्थानिकांनी त्यांना वाचवण्याचे शर्तीचे प्रयत्न केले. आजू अमरे, सूरज अमरे, समीर भगत तसेच राज स्पोर्ट्सचे राजेश नाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बुडत असलेल्या या पर्यटकांना पाण्याबाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न करून ९ जणांपैकी ५ जणांना बाहेर काढण्यात यश आले. घटनास्थळी पोलीस, महसूल व ग्रामीण विकास विभागाची यंत्रणा उपस्थित असून सदर प्रशासकीय यंत्रणा व स्थानिक शोध व बचाव पथकामार्फत बेपत्ता पर्यटकांचा शोध सुरू आहे. तरी कृपया नागरिकांनी कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये असे आवाहनही प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

​Sawantwadi : सावंतवाडी शहराला वादळाचा तडाखा

रामेश्वर प्लाझा इमारतीचे पत्रे उडाले पंचम खेमराज महाविद्यालयाच्या जुने इमारतीचे अतोनात नुकसान सावंतवाडी :

Eknath Shinde : 'पात्र लाडक्या बहिणी लाभापासून वंचित राहणार नाहीत'

रायगड : बोरीचा माळ सारख्या छोट्या गावात लक्ष्मी नारायणाचे मंदिर उभे राहिले आहे. त्यामुळे आता तुम्हाला रोज

Ratnagiri : चार वाहनांना धडक देऊन ट्रक कोसळला विहिरीत

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे हातखंबा येथे चार वाहनांचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एक जण गंभीर

Shaktipeeth Mahamarg : शक्तीपीठ महामार्गाचा नवा मार्ग निश्चित; कोकणातील 'या' ९ गावांतून सुसाट धावणार गाड्या!

मुंबई : राज्यातील प्रस्तावित 'शक्तीपीठ महामार्गा'बाबत (शेतकऱ्यांनी दर्शवलेला तीव्र विरोध लक्षात घेता, राज्य

Ratnagiri : संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे मंदिरात आकर्षक फुलांची सजावट; भाविकांची मोठी गर्दी

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात संकष्टी चतुर्थी निमित्त अत्यंत देखणी आणि मनमोहक

मुंबई-विजयदुर्ग 'रोरो' सेवेचा आजपासून श्रीगणेशा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई: कोकणची लाल माती आणि अथांग अरबी समुद्र यांचे नाते आता अधिक घट्ट होणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून ज्या