राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव, माजी राष्ट्रपतींची उपस्थिती

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने यंदा नागपूरमध्ये भव्य विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूरच्या ऐतिहासिक रेशीमबाग मैदानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव आहे. या उत्सवाला यंदा विशेष अतिथी म्हणून माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित आहे. मंचावर माजी राष्ट्रपती कोविंद, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संघातील इतर मान्यवर आहेत. विशेष म्हणजे गडकरी आणि मुख्यमंत्री फडणवीस हे दोघे मूळचे संघाचे स्वयंसेवक असल्यामुळे विजयादशमी उत्सवासाठी संघाच्या गणवेशात मंचावर उपस्थित आहेत.


धर्माचे रक्षण आणि वाईटावर चांगल्याचा विजय याचे प्रतिक म्हणून दरवर्षी विजयादशमीला सरसंघचालकांनी शस्त्रपूजा करण्याची परंपरा संघात आहे. या परंपरेनुसार विजयादशमी उत्सवाची सुरुवात शस्त्रपूजा आणि संघाच्या शिस्तबद्ध संचलनाने झाली. सकाळी ७:३० वाजता कार्यक्रम सुरू झाला. सरसंघचालकांनी शस्त्रपूजा केली. योग प्रात्यक्षिके, नियुध्द, घोष आणि प्रदक्षिणा असे सांस्कृतिक कार्यक्रम झाले. यंदाच्या विजयादशमी उत्सवासाठी २१ हजारांपेक्षा जास्त संघ स्वयंसेवक संचलनात सहभागी झाले. यानंतर मान्यवरांची भाषणं झाली. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यानंतर सरसंघचालकांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.


माजी राष्ट्रपतींनी त्यांच्या आयुष्यावर दोन डॉक्टरांचा मोठा प्रभाव असल्याचे सांगितले. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पहिले सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार हे ते दोन डॉक्टर आहेत, असे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले. त्यांनी संघाच्या शिस्तबद्ध कार्याचे कौतुक केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशसेवेत मोठे योगदान दिल्याचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले. राष्ट्र उभारणीत संघाने मोलाची भूमिका बजावली असल्याचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सांगितले.



संघाचे शताब्दी वर्ष


संघाची स्थापना १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी केली. या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शताब्दी वर्षाचे औचित्य साधून देशभरात एक लाखांपेक्षा जास्त हिंदू संमेलनांचे आयोजन केले आहे.

Comments
Add Comment

Congress: काँग्रेसमधला वाद चव्हाट्यावर, नगरसेवक थेट दिल्लीत पोहोचले, बैठकीत नेमकं घडलं काय?

दिल्ली: चंद्रपूर महापालिकेत सर्वाधिक जागा जिंकूनही काँग्रेसमध्ये गटातील राजकारणामुळे सत्ता गमावण्याची वेळ

Ajit Pawar : विमान अपघाताआधी अजित पवारांनी सुनेत्रा वहिनींच्या नातलगाला केलेला शेवटचा फोन... काय होते अजित पवारांचे शेवटचे शब्द

धाराशिव : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या संदर्भात एक नवी

Eknath Shinde: कोकणात प्रदूषणकारी कंपन्यांना थारा नाही; जनतेच्या आरोग्याशी खेळ होऊ देणार नाही!

लोटे परशुराम एमआयडीसीतील ‘मितेनी’–‘लक्ष्मी ऑरगॅनिक’ कंपनीबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट

अजित पवारांचा अपघात झालेल्या 'व्हीएसआर व्हेंचर' विमान कंपनीचे ऑडिट करा; 'डीजीसीए'चे आदेश

मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर या घटनेच्या तपासाला गती देण्यात आली असून, नागरी

Nilesh Rane and Sanjay Raut : एवढा नीचपणा बरा नव्हे...घरातला कर्ता माणूस गेलाय ओ, निलेश राणेंनी बारामतीतून राऊतांचे काढले वाभाडे

बारामती : अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमान अपघातावरून राज्यात आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. अजित पवार

Sunetra Pawar : अजितदादांचा वारसा आता सुनेत्रा वहिनींच्या हाती! पुण्याच्या पालकमंत्रीपदी सुनेत्रा पवारचं; परिपत्रक जारी

मुंबई : अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी त्यांच्या पत्नी सुनेत्रा