उदयनराजेंचा शाही सीमोल्लंघन सोहळा रद्द, राजांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक

सातारा : राज्यातील महापूरामुळे निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यंदाचा साताऱ्यातील ऐतिहासिक शाही दसरा सोहळा साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतला आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शाही सीमोल्लंघन सोहळ्यासाठी मिळणारा शासकीय निधी थेट मदतकार्याला वळविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


राज्यात विशेषतः मराठवाडा, कोकण, तसेच साताऱ्याच्या पूर्व भागात पावसाने थैमान घातले असून, अनेक भागांत पिकांचे, घरेदारे व पशुधनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी अक्षरशः उघड्यावर आला आहे. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत पारंपरिक थाटात साजरा होणारा शाही विजयादशमी आणि सीमोल्लंघन सोहळा यंदा साधेपणात पार पडणार आहे.


खासदार उदयनराजे भोसले यांनी २ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या शाही सोहळ्यासंदर्भात समाजमाध्यमांद्वारे माहिती देताना सांगितले की, "राज्यातील पूरग्रस्त जनतेची अवस्था अतिशय गंभीर असून, अशा वेळी थाटामाटात सोहळा साजरा करणं आमच्या मनाला पटणारे नाही. त्यामुळे यंदाचा दसरा अत्यंत साधेपणाने साजरा केला जाणार आहे."


त्याचबरोबर त्यांनी नागरिकांना मुख्यमंत्री पूरग्रस्त सहाय्यता निधीमध्ये आर्थिक, वस्तू किंवा धान्य स्वरूपात शक्य तेवढी मदत करण्याचे आवाहन केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षामार्फत ही मदत पोहोचवता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.


उदयनराजेंनी राजघराण्याच्या सामाजिक बांधिलकीचे भान जपत हा निर्णय घेतला असून, संकटाच्या वेळी जनतेच्या पाठीशी उभं राहणं हीच खरी माणुसकी असल्याचे त्यांनी सांगितले. पूरग्रस्त भागांमध्ये मदतीची तीव्र गरज असल्याने, प्रत्येक नागरिकाने आपापल्या परीनं पुढे येणं गरजेचं आहे, असा भावनिक संदेशही त्यांनी दिला आहे.

Comments
Add Comment

Holi 2026 : रंग-पिचकाऱ्यांच्या किंमतीत सरासरी पाच टक्के वाढ, तरीही खरेदीला उत्स्फूर्त प्रतिसाद

अलिबागसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा रंगांनी न्हाऊन निघाल्या आहेत.

Pune: धक्कादायक! पुण्यात महिलेची गर्भाशयाची गाठ काढण्याऐवजी डॉक्टरांनी...

पुणे: पुण्यातील मांजरी परिसरातील एका खासगी रुग्णालयातून वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे.

Nagpur Blast : काटोलमध्ये स्फोटक कारखान्यात भीषण दुर्घटना; १२ ठार, १५ जखमी

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील राऊळगाव येथे असलेल्या SBL कंपनीत १ मार्च रविवारी सकाळी सुमारे ७

मुंबई-विजयदुर्ग 'रोरो' सेवेचा आजपासून श्रीगणेशा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई: कोकणची लाल माती आणि अथांग अरबी समुद्र यांचे नाते आता अधिक घट्ट होणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून ज्या

नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश

मुंबई: नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. व्यंकट बापुराव धुमाळे, शेळगाव

राज्यातील विमानतळांची विकासकामे कालबद्ध गतीने पूर्ण करावी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

- वाढवण व विरार परिसरात नवीन ग्रीनफिल्ड विमानतळ विकसित करण्यात येणार मुंबई : आशियातील सर्वात मोठे प्रस्तावित