उदयनराजेंचा शाही सीमोल्लंघन सोहळा रद्द, राजांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक

सातारा : राज्यातील महापूरामुळे निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यंदाचा साताऱ्यातील ऐतिहासिक शाही दसरा सोहळा साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतला आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शाही सीमोल्लंघन सोहळ्यासाठी मिळणारा शासकीय निधी थेट मदतकार्याला वळविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


राज्यात विशेषतः मराठवाडा, कोकण, तसेच साताऱ्याच्या पूर्व भागात पावसाने थैमान घातले असून, अनेक भागांत पिकांचे, घरेदारे व पशुधनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी अक्षरशः उघड्यावर आला आहे. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत पारंपरिक थाटात साजरा होणारा शाही विजयादशमी आणि सीमोल्लंघन सोहळा यंदा साधेपणात पार पडणार आहे.


खासदार उदयनराजे भोसले यांनी २ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या शाही सोहळ्यासंदर्भात समाजमाध्यमांद्वारे माहिती देताना सांगितले की, "राज्यातील पूरग्रस्त जनतेची अवस्था अतिशय गंभीर असून, अशा वेळी थाटामाटात सोहळा साजरा करणं आमच्या मनाला पटणारे नाही. त्यामुळे यंदाचा दसरा अत्यंत साधेपणाने साजरा केला जाणार आहे."


त्याचबरोबर त्यांनी नागरिकांना मुख्यमंत्री पूरग्रस्त सहाय्यता निधीमध्ये आर्थिक, वस्तू किंवा धान्य स्वरूपात शक्य तेवढी मदत करण्याचे आवाहन केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षामार्फत ही मदत पोहोचवता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.


उदयनराजेंनी राजघराण्याच्या सामाजिक बांधिलकीचे भान जपत हा निर्णय घेतला असून, संकटाच्या वेळी जनतेच्या पाठीशी उभं राहणं हीच खरी माणुसकी असल्याचे त्यांनी सांगितले. पूरग्रस्त भागांमध्ये मदतीची तीव्र गरज असल्याने, प्रत्येक नागरिकाने आपापल्या परीनं पुढे येणं गरजेचं आहे, असा भावनिक संदेशही त्यांनी दिला आहे.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये