उदयनराजेंचा शाही सीमोल्लंघन सोहळा रद्द, राजांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक

सातारा : राज्यातील महापूरामुळे निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यंदाचा साताऱ्यातील ऐतिहासिक शाही दसरा सोहळा साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतला आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शाही सीमोल्लंघन सोहळ्यासाठी मिळणारा शासकीय निधी थेट मदतकार्याला वळविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


राज्यात विशेषतः मराठवाडा, कोकण, तसेच साताऱ्याच्या पूर्व भागात पावसाने थैमान घातले असून, अनेक भागांत पिकांचे, घरेदारे व पशुधनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी अक्षरशः उघड्यावर आला आहे. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत पारंपरिक थाटात साजरा होणारा शाही विजयादशमी आणि सीमोल्लंघन सोहळा यंदा साधेपणात पार पडणार आहे.


खासदार उदयनराजे भोसले यांनी २ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या शाही सोहळ्यासंदर्भात समाजमाध्यमांद्वारे माहिती देताना सांगितले की, "राज्यातील पूरग्रस्त जनतेची अवस्था अतिशय गंभीर असून, अशा वेळी थाटामाटात सोहळा साजरा करणं आमच्या मनाला पटणारे नाही. त्यामुळे यंदाचा दसरा अत्यंत साधेपणाने साजरा केला जाणार आहे."


त्याचबरोबर त्यांनी नागरिकांना मुख्यमंत्री पूरग्रस्त सहाय्यता निधीमध्ये आर्थिक, वस्तू किंवा धान्य स्वरूपात शक्य तेवढी मदत करण्याचे आवाहन केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षामार्फत ही मदत पोहोचवता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.


उदयनराजेंनी राजघराण्याच्या सामाजिक बांधिलकीचे भान जपत हा निर्णय घेतला असून, संकटाच्या वेळी जनतेच्या पाठीशी उभं राहणं हीच खरी माणुसकी असल्याचे त्यांनी सांगितले. पूरग्रस्त भागांमध्ये मदतीची तीव्र गरज असल्याने, प्रत्येक नागरिकाने आपापल्या परीनं पुढे येणं गरजेचं आहे, असा भावनिक संदेशही त्यांनी दिला आहे.

Comments
Add Comment

District Annual Plan funds : अतिवृष्टीग्रस्तांना तात्काळ मदत! आता 'हा' निधी मदतीसाठी वापरणार; राज्य सरकारचे काय आहेत नवे आदेश?

मुंबई : राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy Rains) अनेक जिल्ह्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे

Maharashtra Rain News : IMD चा थेट इशारा! या जिल्ह्यांमध्ये पुढील ४ दिवस पाऊस; तुमचा भाग 'ऑरेंज' की 'यलो'?

मुंबई : महाराष्ट्रावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झाल्यामुळे आणि हे क्षेत्र

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्ते होणार खड्डेमुक्त, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून निधी मंजूर

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खड्डे बुजून रस्त्यांची डागडुजी करावी, रस्ते सुस्थितीत व्हावे,

'आरएसएस' कार्यक्रमाला सरन्यायाधीशांच्या मातोश्रींच्या उपस्थितीवरून मोठा सस्पेन्स!

ते पत्र खोटं! सरन्यायाधीशांच्या मातोश्री संघाच्या कार्यक्रमाला जाणार! राजेंद्र गवईंचा खुलासा अमरावती: देशाचे

पावसाचे कारण सांगून गैरहजर रहाणा-या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!

मुंबई : राज्यात परतीच्या पावसामुळे अतिवृष्टीचे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, अशा गंभीर परिस्थितीमध्ये

Maharashtra Rain Update : हवामान विभागाचा 'हाय अलर्ट', राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये मोठा धोका, घराबाहेर पडणे टाळाच!

राज्यात पूरस्थिती गंभीर : मुख्यमंत्री फडणवीसांकडून आढावा मुंबई : राज्यात सध्या पावसाने हाहाकार माजवला असून,