नक्षलवाद्यांसोबत शस्त्रसंधी अमान्य, अमित शाहांनी फेटाळला प्रस्ताव


नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वात सुरक्षा पथकांनी देशातील नक्षलवाद ३१ मार्च २०२६ पर्यंत संपवण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेला यश मिळू लागले आहे. मागील काही महिन्यांत देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये मोठ्या संख्येने नक्षलवादी मारले जात आहेत अथवा शरण येत आहेत. अलिकडेच नक्षलवाद्यांच्या प्रमुख नेत्यांपैकी काही जणांनी शरणागती पत्करली आहे. यामुळे नक्षलवाद्यांची स्थिती कमकुवत होत आहे. या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांनी शस्त्रसंधी प्रस्ताव सादर केला आहे. पण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हा प्रस्ताव फेटाळला आहे.


जीवंत असलेले सर्व नक्षलवादी शरण आले तर त्यांना सरकारी अभय योजनेचा लाभ होईल. पण शरण आले नाही तर त्यांना मरावे लागेल, या शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नक्षलवाद्यांचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव फेटाळला.


डाव्या पक्षांनीच डाव्या अतिरेकी विचारांना वैचारिक बळ दिले. समाजात वावरणाऱ्या लोकांनीच या विचारांचे समर्थन केले. माओवादी हिंसाचार हा अपुऱ्या विकासाशी संबंधित नाही. याउलट रक्तरंजित दहशतवादामुळेच देशातील अनेक भागांमध्ये काही दशकांपासून विकास पोहोचला नाही. जोपर्यंत समाजातूनच माओवादाला मिळणारे वैचारिक समर्थन, कायदेशीर साह्य आणि आर्थिक मदत रोखली जात नाही, तोपर्यंत माओवाद संपुष्टात येणार नाही; असेही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले.


Comments
Add Comment

Doctor Death News : युवा डॉक्टरांचे स्वप्न भंगले; भरधाव कारची ट्रकला धडक, वेगामुळे झालेल्या अपघातात चौघांचा दुर्दैवी अंत

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यामध्ये बुधवारी (३ डिसेंबर २०२५) रोजी एक हृदय पिळवटून टाकणारी आणि

८७ बेकायदेशीर 'लोन ॲप'वर कारवाई : केंद्र सरकारची लोकसभेत माहिती

नवी दिल्ली : डिजिटल फसवणुकीचे वाढते प्रमाण आणि अवैध ऑनलाइन कर्ज व्यवहारांच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक लूट

आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टी बांधकामात मशि‍दीचा अडथळा

कोलकाता: सर्वाधिक व्यस्त विमानतळांपैकी एक असणाऱ्या कोलकात्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ

रेल्वेचा नवीन नियम लागू; आता खिडकीवर तिकीट खरेदी करताना सुद्धा लागणार 'ओटीपी'

मुंबई: रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने तात्काळ तिकीट बुकिंगच्या

धक्कादायक! सौंदर्याच्या ईर्ष्येतून तरुणीने केली चार लहानग्यांची हत्या, विकृत मानसिकतेमुळे पोटच्या मुलीचाही केला नाही विचार

पानीपत: हरियाणातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.या प्रकरणात एका महिलेने केलेली कृती ऐकताच जगात किती

छत्तीसगडच्या बस्तर भागात जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक! १५ नक्षलवादी ठार तर ३ जवान शहीद

छत्तीसगड: छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त बस्तर विभागातील बीजापूर-दंतेवाडा सीमेवर भारतीय सुरक्षा दल आणि