कर्जबाजारीपणामुळे पत्नीची विहिरीत उडी, दुसऱ्या दिवशी पतीनेही घेतला गळफास !

छत्रपती संभाजीनगर : फुलंब्री तालुक्यातील आळंद गावात घडलेल्या दुर्दैवी घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. एका विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी तिच्या पतीनेही गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.


शुक्रवारी (२६ सप्टेंबर) रमाबाई जमधडे यांनी शेतातील विहिरीत उडी घेत जीवन संपवलं. दुसऱ्याच दिवशी त्यांच्या पतीने, विलास रामभाऊ जमधडे (वय ४३), पत्नीच्या अंत्यसंस्कारानंतर विहिरीजवळ कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली. त्यांनी मृत्यूपूर्वी व्हॉट्सअॅप ग्रुपवर मेसेज करून आपल्या टोकाच्या निर्णयाची माहिती दिली होती.


संदेशात त्यांनी लिहिले होते की, "माझ्यावर महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे पीक कर्ज आहे. काल माझ्या पत्नीने कर्जाच्या ओझ्यामुळे आत्महत्या केली आणि मीही त्याच कारणामुळे आत्महत्या करत आहे. माझी शेवटची इच्छा अशी आहे की माझी मुलं आळंद गावातूनच आपलं शिक्षण पूर्ण करावं. सुमित, अमित मला माफ करा."


मिळालेल्या माहितीनुसार, जमधडे हे अल्पभूधारक शेतकरी होते. त्यांच्या नावावर केवळ ४३ गुंठे जमीन असून शेतीतून पुरेसं उत्पन्न न मिळाल्याने ते पत्नीसमवेत मजुरी करून संसार चालवत होते. मात्र त्यांच्यावर बँक, सोसायटी आणि खासगी सावकारांचे मोठे कर्ज होते. पत्नी रमाबाई यांच्यावरदेखील बचत गटाचे कर्ज असल्याचे उघड झाले आहे.


गावकऱ्यांनी सांगितले की, विलास यांनी आत्महत्येपूर्वी शेतात जाऊन संदेश पाठवला. मात्र शेत गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असल्याने ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचेपर्यंत त्यांनी गळफास घेतला होता. वडोद बाजार पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवून पोस्टमार्टमसाठी फुलंब्री उपजिल्हा रुग्णालयात पाठवला.


या दुहेरी आत्महत्येमुळे आळंद परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात एक विवाहित मुलगी आणि दोन अविवाहित मुलं असा परिवार आहे.

Comments
Add Comment

मुख्यमंत्र्यांनी पोलखोल करताच संजय राऊतांची जीभ घसरली, वाहिली शिव्यांची लाखोली; पहा नेमकं काय झालं?

भोXXXX सरकार कोणाचं आहे? हXXXX लोक आहेत, संजय राऊतांची जीभ घसरली मुंबई : उद्धव ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र

पूरग्रस्तांसाठी दोन महिला अधिकारी ठरल्या देवदूत!

​पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना दिला आधार! लातूर : अहमदपूर तालुक्यात सुरु झालेल्या मुसळधार पावसाने

मराठवाड्यातील मदतकार्यावर मुख्यमंत्र्यांचा आढावा; अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष फिल्डवर राहण्याचे निर्देश

मुंबई : मराठवाड्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाने पुन्हा धुमाकू निर्देशळ घातला आहे. नद्या-नाले तुडुंब भरून

Rain updates : राज्यात पावसाचा कहर कायम! मराठवाड्यावर अस्मानी संकट, पुढील दोन दिवस धोक्याचे; वाचा पावसाचे सर्व अपडेट्स

मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने धुमाकूळ घातला असून, बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार

अजित पवार यांच्या हस्ते करंजे येथील विद्युत उपकेंद्राचे उद्घाटन

बारामती : कृषी धोरण २०२० अंतर्गत ३३/११ केव्ही करंजे १० एमव्हीए क्षमतेच्या नूतन उपकेंद्राचे उद्घाटन

अहिल्यानगरमध्ये लक्ष्मण हाकेंच्या वाहनावर अज्ञातांचा हल्ला

अहिल्यानगर : पाथर्डी तालुक्यातील आरनगाव बाह्यवळण रस्त्याजवळ अज्ञातांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या