कर्जबाजारीपणामुळे पत्नीची विहिरीत उडी, दुसऱ्या दिवशी पतीनेही घेतला गळफास !

छत्रपती संभाजीनगर : फुलंब्री तालुक्यातील आळंद गावात घडलेल्या दुर्दैवी घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. एका विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी तिच्या पतीनेही गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.


शुक्रवारी (२६ सप्टेंबर) रमाबाई जमधडे यांनी शेतातील विहिरीत उडी घेत जीवन संपवलं. दुसऱ्याच दिवशी त्यांच्या पतीने, विलास रामभाऊ जमधडे (वय ४३), पत्नीच्या अंत्यसंस्कारानंतर विहिरीजवळ कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली. त्यांनी मृत्यूपूर्वी व्हॉट्सअॅप ग्रुपवर मेसेज करून आपल्या टोकाच्या निर्णयाची माहिती दिली होती.


संदेशात त्यांनी लिहिले होते की, "माझ्यावर महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे पीक कर्ज आहे. काल माझ्या पत्नीने कर्जाच्या ओझ्यामुळे आत्महत्या केली आणि मीही त्याच कारणामुळे आत्महत्या करत आहे. माझी शेवटची इच्छा अशी आहे की माझी मुलं आळंद गावातूनच आपलं शिक्षण पूर्ण करावं. सुमित, अमित मला माफ करा."


मिळालेल्या माहितीनुसार, जमधडे हे अल्पभूधारक शेतकरी होते. त्यांच्या नावावर केवळ ४३ गुंठे जमीन असून शेतीतून पुरेसं उत्पन्न न मिळाल्याने ते पत्नीसमवेत मजुरी करून संसार चालवत होते. मात्र त्यांच्यावर बँक, सोसायटी आणि खासगी सावकारांचे मोठे कर्ज होते. पत्नी रमाबाई यांच्यावरदेखील बचत गटाचे कर्ज असल्याचे उघड झाले आहे.


गावकऱ्यांनी सांगितले की, विलास यांनी आत्महत्येपूर्वी शेतात जाऊन संदेश पाठवला. मात्र शेत गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असल्याने ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचेपर्यंत त्यांनी गळफास घेतला होता. वडोद बाजार पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवून पोस्टमार्टमसाठी फुलंब्री उपजिल्हा रुग्णालयात पाठवला.


या दुहेरी आत्महत्येमुळे आळंद परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात एक विवाहित मुलगी आणि दोन अविवाहित मुलं असा परिवार आहे.

Comments
Add Comment

Chhatrapati Sambhajinagar Murder : तलवारीने सपासप वार अन् ३० सेकंदांत…छत्रपती संभाजीनगरमध्ये दिवसाढवळ्या तरुणाचा खून

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहराच्या जुन्या भागातील शहाबाजार परिसरात शुक्रवारी (३१

Maharashtra Rain : मोंथाचा मुक्काम लांबला! तुळशीचं लग्न गाजणार, नोव्हेंबर महिनाही पावसाचा; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना IMD चा थेट इशारा!

नोव्हेंबर महिना (November) उजाडला असला तरी, अद्याप पाऊस जाण्याचं नाव घेत नाहीये. मे महिन्यापासून सुरू झालेला हा पाऊस

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मुख्यमंत्र्यांच्या सल्लागारांच्या अध्यक्षतेखाली ‘उच्चाधिकार समिती’ गठीत

मुंबई : शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळख्यातून कायमस्वरुपी सोडवणूक करण्यासाठी, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी

राष्ट्रीय सागरी मत्स्यव्यवसाय जनगणना २०२५ ला प्रारंभ

मुंबई : भारतातील सागरी मत्स्य व्यवसायाला अधिक बळकटी देण्यासाठी व मच्छीमार समुदायाच्या सर्वांगीण विकासासाठी

“आजच्या तुलनेत आठ महिन्यांनी होणारी कर्जमाफी अधिक फायद्याची” – बच्चू कडू

नागपूर : राज्यातील शेतकऱ्यांकडून तात्काळ कर्जमाफीची मागणी होत असताना, आजच्या तुलनेत 8 महिन्यांनी जाहीर होणारी

कार्तिकीसाठी राज्यातील विविध मार्गावरून ५५० एसटी बसेस धावणार

सोलापूर : सावळ्या विठ्ठलाचे भक्त असलेल्या वारकऱ्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून सोलापूरसह सांगली, सातारा,