कल्पना एक...’चे  अस्तित्त्व अंतिम टप्प्यात...


एकांकिकांच्या विश्वात विशेष स्थान राखून असलेल्याअस्तित्त्व’ या संस्थेच्या ‘कल्पना एक आविष्कार अनेक’ या स्पर्धेचा प्रवास आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. ‘कल्पना एक आविष्कार अनेक’ ही स्पर्धा महाविद्यालयीन विद्यार्थी; तसेच हौशी आणि व्यावसायिक रंगकर्मींना त्यांचा कलाविष्कार सादर करण्यासाठी दरवर्षी रंगमंच उपलब्ध करून देते. गेली तब्बल ३९ वर्षे ही स्पर्धा गाजत आहे आणि या व्यासपीठाच्या माध्यमातून अनेक रंगकर्मी उदयास आले आहेत. मात्र यंदाची स्पर्धा ही या प्रवासातली ‘शेवटापूर्वीची आवृत्ती’ असल्याचे सूतोवाच या स्पर्धेच्या आयोजकांकडून करण्यात आले आहे. ‘अस्तित्त्व’ या संस्थेला आता ३० वर्षे झाली आहेत आणि ‘कल्पना एक आविष्कार अनेक’ ही स्पर्धा आता चाळीशीच्या उंबरठ्यावर उभी असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे, ‘अस्तित्त्व’ या संस्थेतर्फे या संदर्भात स्पष्ट करण्यात आले आहे.


दरम्यान, यंदा या स्पर्धेची प्राथमिक फेरी २७ व २८ सप्टेंबर रोजी होत असून, अंतिम फेरी ४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. यंदा या स्पर्धेचे ‘कल्पना सूचक’ ज्येष्ठ रंगकर्मी अशोक सराफ आहेत. कविवर्य मंगेश पाडगांवकर यांच्या ‘विदूषक’ या कवितेतल्या काही ओळी कल्पना म्हणून त्यांनी सुचवल्या आहेत. अशोक सराफ यांनी या विषयाला अनुसरून कोणतीही विस्तृत प्रस्तावना दिलेली नाही. मात्र, हा विषय इतका प्रभावी आहे की तो लेखकांना आपोआप स्फूर्ती देईल, असा विश्वास त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. साहजिकच, आता या विषयावर सादर होणाऱ्या एकांकिका म्हणजे लेखक, दिग्दर्शक आणि कलाकारांसाठी आव्हानात्मक गोष्ट असून, सदर विषय नव्या दमाचे रंगकर्मी कशा पद्धतीने मांडतात; हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.  -राज चिंचणकर



Comments
Add Comment

‘मी अश्वत्थामा चिरंजीव’ नाटकामुळे वेगळीच अनुभूती

  टर्निंग पॉइंट-युवराज अवसरमल    मी अश्वत्थामा चिरंजीव’ नाटकामध्ये अश्वत्थामाचा ज्वलंत जीवनपट

एका रंगकर्मीची 'विठ्ठल वारी'...

राजरंग-राज चिंचणकर   पंढरीच्या वारीत असंख्य वारकरी सामील होत आषाढी एकादशीला विठुरायाच्या चरणी लीन होतात. या

उजळमाथ्याने फिरणाऱ्या प्रत्येक गॉसिपकारास...!

भालचंद्र कुबल-पाचवा वेद   नाटक उजळवणाऱ्या प्रत्येक प्रकाशयोजनाकारास मी नेहमी पहिलं वाक्य ऐकवतो, "रिस्पेक्ट

भारतातील पहिले एआय-आधारित तिकीट बुकिंग व्यासपीठ ‘थम्पएन’ सुरू

देशातील लाइव्ह मनोरंजन क्षेत्रासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित पहिले डिस्कव्हरी आणि तिकीट बुकिंग

रंगभूमी आणि बदलता विनोद...

मराठी नाट्यक्षेत्रात सुरू झालेला 'नाट्य निरंतर' हा उपक्रम अल्पावधीतच रसिकांच्या पसंतीस उतरत असल्याचे दिसून येत

आसमंताच्या रंगमंचावरचे 'आषाढ नाट्य'

राजरंग-राज चिंचणकर आषाढ महिन्याची चाहूल लागली की कवी कुलगुरू कालिदासाने 'मेघदूत' या महाकाव्यात वर्णन केलेल्या