प्रभादेवी पूलबाधितांचे नजीकच्या परिसरातच होणार पुनर्वसन

मुंबई : शिवडी ते वरळी उन्नत रस्ता प्रकल्पाअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या प्रभादेवी द्विस्तरीय पुलाच्या कामात बाधित होणाऱ्या दोन इमारतींमधील ८३ रहिवाशांसाठी अखेर म्हाडाने आसपासच्या परिसरातील ११९ घरे शोधली आहेत. या घरांची यादी नुकतीच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) सादर करण्यात आली आहे.


आता रहिवाशांच्या पसंतीनुसार घरे निश्चित करून त्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. रहिवाशांच्या पसंतीनुसार ११९ पैकी ८३ घरे एमएमआरडीएला वर्ग करण्यात येणार असून यासाठी एमएमआरडीएकडून शीघ्रगणकाच्या ११० टक्के दराने रक्कम घेण्याचा म्हाडाचा प्रस्ताव आहे. अटल सेतूला जोडणारा शिवडी- वरळी उन्नत रस्ता प्रभादेवी पूल ओलांडून जात आहे. त्यामुळे जुना पूल पाडून त्याजागी नवीन द्विस्तरीय पूल बांधण्यात येणार आहे. जुन्या पुलाचे पाडकाम सध्या एमएमआरडीए करीत आहे.


या पुलाच्या कामात हाजी नुरानी आणि लक्ष्मी या दोन इमारती बाधित होत असून यात ८३ घरे आहेत. या ८३ रहिवाशांचे पुनर्वसन म्हाडाच्या घरात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. म्हाडाला पुनर्विकासाच्या माध्यमातून उपलब्ध झालेली घरे या रहिवाशांना कायमस्वरुपी दिली जाणार आहेत.


Comments
Add Comment

फडणवीसांचा मोठा निर्णय! मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशीच ५ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : मागील काही महिन्यांपासून मोठ्या संख्येने राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या होत आहेत. गेल्याच

मुंबई महापालिका विक्रोळी पार्कसाईट येथील २८ इमारतींचा पुनर्विकास करणार

मुंबई (खास प्रतिनिधी) : विक्रोळी पार्कसाईट येथे असलेल्या महानगरपालिकेच्या २८ इमारतींचा पुनर्विकास

'बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’ ठरवणार'

मुंबई : राज्यात बिबट्यांकडून वाढत चाललेल्या मानवांवरील हल्ल्यांची समस्या राज्य आपत्ती म्हणून घोषित करण्याचा

अचानक डिजिटल ब्लॅकआउट; Cloudflare बंद पडताच अनेक अ‍ॅप्स ठप्प !

मुंबई : जगभरातील इंटरनेट वापरकर्त्यांना आज सकाळपासून अचानक अनेक डिजिटल सेवांमध्ये अडथळ्यांचा सामना करावा

Mumbai Metro : मुंबई मेट्रो लाईन ३ साठी पादचारी कनेक्टिव्हिटी मजबूत; वरळी व BKC येथे उभारले जाणार दोन मोठे सबवे

मुंबई : मुंबईतील ‘अक्वा लाईन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेट्रो लाईन ३ च्या प्रवाशांना अधिक सुलभ आणि सुरक्षित

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, छोटे भूखंड आता 'विनाशुल्क' नियमित होणार

मुंबई : तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून झालेले जमीन व्यवहार आता निःशुल्क नियमित व कायदेशीर करण्यासाठी आवश्यक