‘बॅड्स ऑफ बॉलिवूड’ याचिकेवर सुनावणीस नकार

समीर वानखेडेंना उच्च न्यायालयाचा दणका


मुंबई : आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांनी अभिनेता शाहरुख खान व गौरी खान यांच्या मालकीच्या रेड चिलिज एंटरटेनमेंटसह नेटफ्लिक्स व इतर पक्षांविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला आहे.


शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानने दिग्दर्शित केलेली वेबसीरिज ‘बॅड्स ऑफ बॉलिवूड’ नुकतीच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे. समीर वानखेडे यांनी दावा केला आहे, की या सीरिजमध्ये त्यांच्यासारखे दिसणारे एक पात्र दाखवण्यात आले आहे. दिल्ली न्यायालयाने वानखेडे यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे.


दिल्ली उच्च न्यायालयाने न्यायमूर्ती पुरुषेंद्र कुमार कौरव यांनी वानखेडे यांना विचारले की, ‘हे मुंबईतील प्रकरण असताना तुम्ही ही याचिका दिल्ली उच्च न्यायालयात का दाखल केली? दिल्लीत याची सुनावणी अपेक्षित असेल, तर कोणत्या आधारावर ही सुनावणी घेतली जावी, त्याची कारणे विषद करा. राष्ट्रीय राजधानीत कारवाईची अपेक्षा का व्यक्त करत आहात?’ समीर वानखेडे विरुद्ध रेड चिलीज एंटरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि इतर या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती पुरुषेंद्र कुमार कौरव यांनी याचिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.



वेबसीरिजवर बंदी घालण्याची मागणी


‘बॅड्स ऑफ बॉलिवूड’ या सीरिजमधील चित्रण हे खोटे व बदनामीकारक असल्यामुळे त्याविरोधात मनाई आदेश देण्यात यावा, तसेच नुकसानभरपाईच्या स्वरूपात दिलासा मिळावा, अशी मागणी समीर वानखेडे यांनी दिल्ली उच्च न्ययालयात केली होती. या वेबसीरिजवर बंदी घालावी आणि त्यांच्याशी संबंधित कथित दृष्य सीरिजमधून वगळावी अशी मागणी वानखेडे यांनी केली होती.

Comments
Add Comment

दहिसर नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई : दहिसर नदीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे,

घर खरेदीत फसवणूक करणाऱ्या बिल्डरांची मालमत्ता जप्त होणार

मुंबई : राज्यात आपले गृहस्वप्न साकार करू पाहणाऱ्या हजारो सर्वसामान्यांची बिल्डरांकडून होणारी फसवणूक आता राज्य

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या! - भाजप आमदार प्रसाद लाड यांची विधान परिषदेत मागणी

सकारात्मक निर्णय घेण्याचे संसदीय कार्यमंत्र्यांचे आश्वासन मुंबई : भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील

मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाचे नामकरण; आता होणार 'पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर' पूल

- मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणी कामाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई :

अंगणवाडी बांधकामासाठी १५ लाखांचा निधी प्रस्तावित; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

मुंबई : राज्यातील अंगणवाड्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या 'स्मार्ट किट' खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणि गुणवत्तेचा

मराठी भाषेचे संवर्धन ही केवळ सरकारचीच नाही, तर प्रत्येकाची जबाबदारी - मंत्री उदय सामंत

मुंबई : "मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी शासन स्तरावर मराठी भाषा विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र,